५ रुपयांचे कुरकुरे न आणल्याने पत्नीने दिला पतीला घटस्फोट……
TIMES OF AHMEDNAGAR | INDIA | UTTAR PRADESH | AGRA | THE WIFE DEMANDED A DIVORCE BECAUSE THE HUSBAND DID NOT BRING THE KURKURES | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
लग्न हे फार पवित्र आणि भावनिक नाते मानले जाते. लग्न झाल्यानंतर काही दिवस फार आनंदात, सुखात जातात. मात्र त्यानंतर अनेकदा काही पती- पत्नीमध्ये वैचारिक मतभेद आणि एकमेकांच्या सवयी न आवडीच्या होतात. अशा परिस्थितीत हे नाते टिकवणे अवघड होऊन बसते. यात हल्ली अगदी शुल्लक कारणावरुनही पती पत्नी घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत जाऊ पोहोचतात. सध्या अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील आग्रा शहरातून समोर आली आहे. यात फक्त ५ रुपयांच्या कुरकुऱ्याच्या पॅकेटसाठी पत्नीने पतीकडे घटस्फोटाची मागणी केली आहे. संतापलेल्या पत्नीने सासरचे घर सोडून पोलीस स्टेशन गाठून पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
मसालेदार पदार्थ खाण्याच्या सवयीवरुन दोघांमध्ये वाद.
समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधीत पत्नीला मसालेदार पदार्थ खाण्याची आवड होती. त्यामुळे रोज काहीतरी चटपटीत तिखट पदार्थ तिला खायला हवे असायचे. रोज ती तिच्या पतीला ५ रुपयांचे कुरकुरे आणायला सांगायची. पण तिचे हे रोजचे मसालेदार पदार्थ खाण्याच्या सवयीवरुन दोघांमध्ये वाद होत असत तरी रोज तो तिला कुरकुरे खायला घेऊन येत असत मात्र एकदिवस कामावरुन येताना तो कुरकुऱ्याचे पॅकेट घेऊन आला नाही. ज्यावरुन दोघांचे जोरदार भांडण झाले. हे प्रकरण नंतर हाणीमारीपर्यंत जाऊन पोहोचले. शेवटी संतापलेली पत्नी पतीचे घर सोडून माहेरी गेली. यानंतर पोलिसांकडे तक्रार केली पोलिसांनी हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे पाठवले आहे. शनिवारी दोन्ही पक्षांना कुटुंब समुपदेशन केंद्रात बोलावण्यात आले आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
तो माझ्याशी भांडण करून मारहाण करत…..
या पती पत्नीचे २०२३ मध्ये लग्न झाले होते. सुरुवातीचे काही महिने दोघांचे सुरळीत सुरु होते. मात्र त्यानंतर दोघांचे अनेक कारणांवरुन भांडण होऊ लागले. यात पत्नीची लग्नापूर्वीपासूनची कुरकुरे खाण्याची सवय लग्नानंतरही तशीच राहिल्याने पतीला चिंता वाटू लागली होती. रोज अशाप्रकारे ती बाहेरचे काहीतरी खायला आणायला सांगायची असे पतीने सांगितले आहे. यावर पत्नीने सांगितले की नवीन लग्न झाल्यानंतर सहा महिने पतीने खूप काळजी घेतली होती. पण त्यानंतर तो खूप वेगळाच वागू लागला. त्याचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला तो अनेक गोष्टी ऐकायचा नाही छोट्या छोट्या गोष्टींवरुन भांडण करायचा. यात दोन महिन्यांपूर्वी ५ रुपयांचे कुरकुरे आणण्यास सांगितले पण ते आणले नाही. यानंतर तो माझ्याशी भांडण करून मारहाण करायला लागला असा दावा महिलेने केला आहे. याप्रकरणी आता कौटुंबिक समुपदेशन केंद्राने दोघांना पुढील तारीख दिली आहे