TIMES OF AHMEDNAGAR
अल्पसंख्याक मंत्री किरेण रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ अमेंडमेंट बिल सादर केलं. या विधेयकाला विरोधी पक्षातील खासदारांनी मोठा विरोध केला होतो. अशा प्रकारचं विधेयक सरकारला का आणायचं आहे ? असा प्रश्न विरोधी पक्षातील खासदारांनी उपस्थित केला आहे. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी या विधेयकाचं समर्थन केलं आहे. या विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरु झाली आहे. त्यादरम्यान एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकार मुस्लिम विरोधी आहे अशी टीका केली आहे.
(संग्रहित दृश्य)
विधेयकात काय तरतुदी आहेत ?
विधेयकाचा उद्देश गरीब मुस्लिमांना न्याय देणं आणि मुस्लिम महिलांना त्यांचा हक्क प्रदान करणं हा आहे.
दुरुस्ती विधेयकात केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ बोर्ड यांचं संलग्नीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. ज्यामुळे मुस्लिम महिलांना आणि बिगर मुस्लिमांनाही प्रतिनिधित्व मिळेल.
विधेयकातील तरतुदीनुसार वक्फ बोर्डाला त्यांच्या मालमत्तांमधून जे उत्पन्न मिळतं ते देणगीसाठी खर्च करावं लागणार आहे.
विधेयकात असाही प्रस्ताव आहे की जिल्हाधिकारी हे ठरवतील की कुठली मालमत्ता वक्फ बोर्डाची आहे ? ती जर सरकारी जमीन असेल तर त्यावर वक्फ बोर्डाचा हक्क नसेल.
रेल्वे मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय यानंतर देशातील मालमत्तांच्या बाबत वक्फ बोर्डाचा तिसरा क्रमांक लागतो.
देशात ३० वक्फ बोर्ड आहेत ज्यांच्याकडे ८ लाख एकरहून अधिक मालमत्ता आहेत.
बोहरा आणि आगाखान मुस्लिम यांच्यासाठी औकाफ बोर्ड तयार करण्यात यावं असाही प्रस्ताव विधेयकात आहे.
(संग्रहित दृश्य)