आगरकर मळा अर्बन बँक कॉलनी येथील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावा. – दत्ता जाधव.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | DATTA JADHAV NEWS | EX.CORPORATOR PRASHANT GAIKWAD | COMMISSIONER YASHWANT DANGE | PHOTOS USED IN THIS NEWS ARE ARCHIVAL FOOTAGE. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
नगर : आगरकर मळा, अर्बन बँक कॉलनी येथे गेल्या दोन वर्षापासून नळाद्वारे पाणी येत नसल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे, अनेक वेळा महापालिकेकडे पाठपुरावा करूनही पाणी प्रश्न मार्गी लागला नसल्यामुळे नागरिकांना पैसे देऊन टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे. तरी लवकरात लवकर अर्बन बँक कॉलनीतील पाणी प्रश्न मार्गी लावा अशी मागणी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते दत्ता जाधव यांनी दिली आहे.
(संग्रहित दृश्य.)
पिण्याच्या पाण्याच्या लाईनचे काम येत्या आठ ते दहा दिवसात सुरू होईल.
आगरकर मळा येथील मनपाची पाण्याची उंच टाकी व जमिनीवरील टाकी गेल्या एक वर्षापासून स्वच्छ केली नसून ती स्वच्छ करून द्यावी, सध्या आगरकर मळ्यामध्ये साथीचे आजार पसरत असून त्यावर उपाय योजना होणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष केशव खानदेशे यांनी केले.आगरकर मळा अर्बन बँक कॉलनी मधील पिण्याच्या पाण्याच्या लाईनचे काम मंजूर असून येत्या आठ ते दहा दिवसात सुरू होईल, तोपर्यंत या भागातील नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल असे आश्वासन आयुक्त यशवंत डांगे यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दत्ता जाधव, माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड, निसळ गुरुजी, केशव खानदेशे, नानासाहेब दळवी, विजय गायकवाड, धिरज रपारिया, अवानी रपारिया,सोनाली निसळ आदी उपस्थित होते.