एम.आय.डी.सी. (MIDC) पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) या कंपन्या फक्त नावापुरताच उद्योग धंदे करत कारण एम.आय.डी.सी. (MIDC) पोलीस ठाण्याच्या हद्दीत उद्योग धंद्यांपेक्षा जास्त अवैध धंद्यांचा सुळसुळाट आहे. जुगार , मटका , वेश्याव्यवसाय , बनावट दारू अशा भरमसाठ अवैध धंद्यांनी स्थानिकांचे जगणे कठीण करून ठेवले आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
दारू पाजून मारले, ती दारू बनावट होती का ?
शुक्रवार दि. २३ फेब्रुवारी २०२४ संदीप शेळके या इसमाला आरोपींनी अनैर्सिंक संभोग करण्याचे उद्देशाने जास्त दारु पाजुन एमआयडीसी येथील बंद पडलेल्या सह्याद्री कंपनीच्या पडक्या इमारतीत नेवुन मयत संदीप शेळके याचे कपडे काढण्याचा जोरजबरदस्तीने प्रयत्न केला.मात्र संदीपने आरोपींच्या या कृत्याला विरोध केला. संदीपने विरोध करताच आरोपींनी जवळ असलेल्या नायलॉन पट्टीने संदीपचा गळा आवळुन व दगडाने डोके व चेहरा ठेचुन त्याला जिवे ठार मारले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. १६९/२०२४ भा.द.वि. ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हि दारू कोणती होती,आरोपींना ती दारू कुठून उपलब्ध झाली ? हि दारू बनावट दारू तर नव्हती न ? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
मयत शेळकेला पाजलेली दारू कोणती ? पुन्हा पांगरमल का ?
पांगरमल गावात १२ फेब्रुवारी २०१७ रोजी पार्टी आयोजित केली होती या पार्टीत विषारी दारू प्यायल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला होता. १३ जणांना त्रास झाला होता. अत्यवस्थ झालेल्या १३ जणांपैकी एकास अर्धांगवायूचा झटका आला होता. एकाला अंधत्व आले होते. या प्रकरणात १९ आरोपींविरुद्ध नगरमधील ‘एमआयडीसी’ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाग्यश्री गोविंद मोकाटे आणि मंगल महादेव आव्हाड या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार होत्या. निवडणुकीत मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी मोकाटे आणि आव्हाड यांनी पांगरमल गावात १२ फेब्रुवारी २०१७ रोजी पार्टी आयोजित केली होती. यापैकी १७ आरोपींना अटक करण्यात आली होती. निवडणुकीत आरोपी मोकाटे विजयी झाली होती. गेले सहा वर्ष ती फरारी होती. न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला होता. विशेष न्यायालयाने तिला वॉरंट बजावले होते. या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे सोपविण्यात आला होता.
स्त्रोत.सोशल मिडिया.
किच्चोरराजाचा सहभाग ?
एम.आय.डी.सी. (MIDC) पोलीस ठाण्याच्या हद्दीत होणाऱ्या अवैध धंद्यांना किच्चोरराजा हा लक्ष्मी दर्शनाने पाठीशी घालत आहे. लक्ष्मी दर्शनाची लालच असलेल्या किच्चोरराजामुळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे भयंकर गुन्हे घडत आहेत. किच्चोरराजाने जर लक्ष्मी दर्शनाची लालच सोडली तर अवैध धंदे लगेचच बंद होतील,अवैध धंद्यांमध्ये किच्चोरराजा देखील सहभागी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वरिष्ठ प्रशासन किच्चोरराजाची चौकशी करणार का हे मोठे कोडे आहे.
शुक्रवार दि. २३ फेब्रुवारी २०२४ संदीप शेळके या इसमाला आरोपींनी अनैर्सिंक संभोग करण्याचे उद्देशाने जास्त दारु पाजुन एमआयडीसी येथील बंद पडलेल्या सह्याद्री कंपनीच्या पडक्या इमारतीत नेवुन आरोपींनी जवळ असलेल्या नायलॉन पट्टीने संदीपचा गळा आवळुन व दगडाने डोके व चेहरा ठेचुन त्याला जिवे ठार मारले. मात्र हि दारू संशयास्पद असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्या दारूचा तपास पोलीस करणार का असा देखील सवाल उपस्थित होत आहे.