कडवट शिवसैनिक विक्रम राठोड यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे महाविकास आघाडीची प्रशासनाकडे धाव. खोटा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप …
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | POLITICAL NEWS | AHMEDNAGAR CITY POLITICS | KIRAN KALE | VIKRAM RATHOD | SAMBHAJI KADAM | BALASAHEB BORAT | ABHISHEK KALAMKAR | BHAGWAN PHULSOUNDER | DILDAR SINGH BIR | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
युवासेनेचे महाराष्ट्र राज्य सहसचिव विक्रम राठोड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला आहे. दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा, या मागणीचे निवेदन महाविकास आघाडीच्यावतीने जिल्हा पोलीस उपधिक्षक अमोल भारती यांना देण्यात आले आहे. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) शहरप्रमुख संभाजी कदम, राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार गट) शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी महापौर भगवान फुलसौंदर,बाळासाहेब बोराटे, गिरिष जाधव, दिलदारसिंग बीर, प्रमोद वारुळे आदि उपस्थित होते.
स्त्रोत.सोशल मिडिया.
बड्या नेत्यांना थेट भिडणे राठोडांना पडले महागात ?
लोकसभेच्या निवडणुकांच्या दरम्यान विक्रम राठोड हे अनेक बड्या नेत्यांवर टीका करत होते. विक्रम राठोड यांच्या कडक भूमिकेमुळे दक्षिणेची दिवाळी गोड झाली असल्याचे बोलले जाते. विक्रम राठोड हे कट्टर शिवसैनिक आहेत.राठोडांच्या आक्रमक भूमिकेमुळे राठोड यांच्यावर द्वेषभावनेतून बड्या राजकीय नेत्याने षडयंत्र रचले असल्याचे सध्या बोलले जात आहे. मात्र राठोड यांच्या मदतीसाठी हातात मशाल घेऊन राठोडांच्या समर्थनात माणूस तुतारी वाजवत आहे. हा महाविकास आघाडीचा आवाज आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पाहायला मिळाला. यावेळी कॉंग्रेसचे किरण काळे बोलत होते. काळे म्हणाले कि मतदानासाठी जी शाई वापरली जाते ती शाई जर बाहेर उपलब्ध होत असेल तर हि गंभीर बाब आहे. निलेश लंकेंना लोकप्रियता मिळाली असल्याने महायुतीच्या उमेदवाराला पराभवाची खात्री पटली असल्याचा टोला यावेळी काळेंनी लगावला आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
निवेदनात म्हटले आहे की…….
नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी दि. १३ मे रोजी युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांच्यावर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा. मतदानाच्या दिवशी महायुतीच्या उमेदवाराकडून काही मतदारांना बोटाला शाई लावून पैसे देण्याचा प्रकार सुरु होता. तो महाविकास आघाडीच्यावतीने उधळून लावण्यात आला. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज सर्व तपासणी करुन याची सखोल चौकशी करण्यात यावी व खोटा दाखल गुन्हा मागे घेण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी संभाजी कदम म्हणाले कि लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना वेगवेगळे आमिष देण्यात येत होते काही ठिकाणी पैसे वाटण्याचेही प्रकार झाले. याबाबत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यास प्रतिबंद केला. त्यामुळे याचा राग मनात धरुन असे खोटे गुन्हे आमच्या पदाधिकाऱ्यांवर दाखल केले आहेत. संपूर्ण घटनांचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी तपासून, सत्य समोर आणावे, अशी आमची मागणी असल्याचे अभिषेक कळमकर यांनी सांगितले.