पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांसाठी आमदार संग्राम जगताप यांचे गृहमंत्र्यांना निवेदन…..
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | HOME MINISTER DEVENDRA FADNAVIS | MLA SANGRAM JAGTAP | SANGRAM JAGTAP'S STATEMENT TO DEVENDRA FADNAVIS FOR POLICE RECRUITMENT CANDIDATES | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
नगर – महाराष्ट्र शासनामार्फत राज्यभरात १७ हजार ४७१ पदांसाठी मेगा पोलीस भरतीची मैदानी चाचणी प्रक्रिया नुकतीच सुरू झाली असून सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नवी मुंबई या ठिकाणी सतत पाऊस होत आहे. या पार्श्वभूमीवर इतर भागातील तरुण तरुणी यांच्या मैदानी चाचणीसाठी सदर ठिकाणी आल्यावर त्यांची निवाऱ्याची व आहाराची गैरसोय होत आहे. त्यामुळे मैदानी चाचणीच्या ठिकाणी निवारा, अल्पोपहार व उमेदवारांना चाचणी दरम्यान दुखापत झाल्यास वैद्यकीय सेवा इत्यादी व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवले आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
आमदार संग्राम जगताप यांचे देवेंद्र फडणवीस यांना निवेदन….
आमदार संग्राम जगताप यांनी निवेदनात असे म्हंटले आहे कि या सर्व बाबींचा आपण गांभीर्यपूर्वक विचार करून पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणीसाठी आलेल्या तरूण-तरूणी यांच्या मैदानी चाचणीच्या ठिकाणी निवारा, अल्पोपहार व उमेदवारास चाचणी दरम्यान दुखापत झाल्यास वैद्यकीय सेवा आदींसह व्यवस्था करावी जेणेकरून आलेल्या सर्व उमेदवारांस चाचणी देण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही. अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.