मातोश्रीवर जाणारे नेते हे विरोधकांच्या भेटीला मध्यरात्री जात होते. – युवासेना उपशहर प्रमुख मुन्ना भिंगारदिवे
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | SHIVSENA (UDDHAV BALASAHEB THAKARE) | YUVA SENA SUB-CITY CHIEF MUNNA BHINGARDIVE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाची निवडणूक पार पडली. महायुतीकडून सुजय विखे तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके मैदानात होते. शिवसेना (उबाठा),राष्ट्रवादी (शरद पवार), आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निलेश लंकेंच्या विजयासाठी मोठे कष्ट घेतले. आणि लंकेंना खासदारकीच्या खुर्चीवर विराजमान केले.मात्र खासदार झाल्यानंतर निलेश लंकेंनी आज शनिवार (दिनांक .२२ जून ) रोजी शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. मात्र लंकेंसोबत मातोश्रीवर जाणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी सर्वसामान्य शिवसैनिकांना व पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता फक्त पुढाऱ्यांना सोबतीला घेऊन गेल्याने शहरात शिवसैनिकांची नाराजी पहायली मिळाली आहे.
येणाऱ्या विधानसभेला शिवसैनिक योग्य विचार करतील मुन्ना भिंगारदिवेंचा इशारा !
शहरात घडणाऱ्या बेकादेशीर घटनांच्या विरोधात शिवसैनिकांना बोलावले जाते,आंदोलनाला शिवसैनिकांना बोलावले जाते. मात्र वरिष्ठ नेत्यांना भेटायला जातांना किंवा पक्षाच्या महत्वाच्या कामकाजात सर्व सामान्य शिवसैनिकांना विश्वासात घेतले जात नाही. निलेश लंकेंना खासदार करण्यासाठी माजी. आमदार अनिल राठोड यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व शिवसैनिकांचा सिंहाचा वाटा होता आणि त्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलून नेते वेगळी भूमिका घेत असल्याने शहरात नाराजी वाढली आहे. आणि असेच जर वारंवार घडत असल्याने येणाऱ्या विधानसभेला शिवसैनिक योग्य विचार करतील असा थेट इशारा देखील भिंगारदिवे यांनी दिला आहे. टाईम्स ऑफ अहमदनगरशी बोलतांना मुन्ना भिंगारदिवे म्हणाले कि लंकेंच्या प्रचारासाठी सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहे. मातोश्रीवर जाणारे नेते हे विरोधकांच्या भेटीला मध्यरात्री जात असल्याचे आरोप देखील युवासेना उपशहर प्रमुख मुन्ना भिंगारदिवे यांनी केला आहे.
लंकेंच्या प्रचारातील शिवसैनिक कामापुरतेच ?
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत निलेश लंके हे राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उमेदवार होते. लंकेंच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या कार्यकर्ते,नेते ,पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे शिवसैनिक दावा करतात. मात्र शिवसेनेच्या याच कार्यकर्त्यांना शहरात सोडून शिवसेनेच्या नेत्यांनी एकटा चलोरे च्या भूमिकेमुळे शहरात शिवसेनेत दुफळी निर्माण झाली आहे.