TIMES OF AHMEDNAGAR
भाग – ०४
अहमदनगर शहरात मागील काही महिन्यांपासून प्रचंड दहशत वाढली आहे असे बोलले जाते. मात्र कधीना कधी पोलीस आपल्या संरक्षणासाठी उभे राहतील आणि गुन्हेगारांच्या मुसक्या आवळतील या अपेक्षेत खरंतर नगरकर जगत आहेत.मात्र सध्याची स्तिथी पाहता नगरकरांचा कोणी वाली नसल्याचे बोलले जाते. त्याला कारणही तसेच आहे.काही दिवसांपूर्वी कोतवाली पोलीस ठाण्याच्या एका कर्मचाऱ्याने एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला चांगलेच बदडले होते पोलिसांनी आपल्याला मारहाण केली अशी तक्रार त्या पक्षाच्या कार्यकर्त्याने व पक्षाने पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली होती.
स्त्रोत.सोशल मिडिया.
पोलिसांकडून अपेक्षा संपली ?
अहमदनगर शहरात अनेक दिवसांपासून अवैध धंद्यांच्या चालकांनी धुमाकूळ माजवला आहे. पोलिसांचा देखील काही अवैध धंद्यांच्या चालकांना सपोर्ट असल्याचा आरोप एका वकिलाने दिलेल्या निवेदानात केला होता. काही कर्मचाऱ्यांचे आर्थिक उघड करण्याचा थेट इशारा त्या वकिलाने दिला होता. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीद घडलेला हा प्रकार जिल्हाभर गाजला होता. कोतवाली हद्दीत मागील काही दिवसांपूर्वी सोनेतारण प्रकरण चांगलेच गाजले होते. आरोपीने बनावट सोने देऊन बँकेची फसवणूक केली होती.