TIMES OF AHMEDNAGAR
अहमदनगर – आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे आचारसंहिता लागण्याची धाकधूक सुरु झाली आहे. त्यामुळे गृह विभागाने सतर्कता दाखवत राज्यभरातील बदलीच्या कक्षेत असलेले आणि आचार संहितेच्या नियमात बसणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरु केल्या आणि अनेकांची उचलबांगडी केली होती. शहरात सर्वच पोलीस ठाण्याला नवीन पोलीस निरीक्षक लाभले आहे. नवीन पोलीस निरीक्षक लाभल्याने स्थानिक रहिवास्यांना थोड्या दिवसांसाठी का होईना दिलासा मिळाला होता. मात्र सर्वच हद्दीत जैसे थे ची अवस्था आहे.त्यामध्ये तोफखाना पोलीस ठाण्याचा प्रथम क्रमांक असल्याचे समजते.