अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत ठेवण्याचा पुनर्विचार महायुतीने करावा, भाजप आणि शिंदेसेनेतील नेत्यांची मागणी…..
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | POLITICS | BJP | SHIV SENA (SHINDE GROUP) | NCP (AJIT PAWAR GROUP) | CHIEF MINISTER EKNATH SHINDE | DEVENDRA FADNAVIS | AJIT PAWAR | WHAT IS THE NEED FOR A THIRD PARTY IN THE GRAND ALLIANCE? | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला धक्का बसला आहे. राज्यात ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवलेल्या महायुतीला अवघ्या १७ जागा मिळाल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजप आणि शिंदेसेनेच्या उमेदवारांना अपेक्षित फायदा झालाच नसल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. दादा गटाचे आमदार असलेल्या बऱ्याच मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार पिछाडीवर पडल्याचे आकडेवारी सांगत आहे. त्यामुळे महायुतीत तिसऱ्या पक्षाची गरज काय ? असा दबाव आणण्यास भाजप नेत्यांनी सुरुवात केली आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत ठेवून उपयोग काय ?
भाजप आणि शिंदेसेनेतील काही नेत्यांनी अजित पवारांना सोबत ठेवण्याचा पुनर्विचार करावा अशी मागणी आपापल्या नेतृत्त्वाकडे केली आहे.अजित पवार गटाच्या आमदारांची मते भाजप आणि शिंदेसेनेकडे वळली नसल्याचा तर्क आकडेवारीच्या आधारे दिला जात आहे. जिथे अजित पवारांची राष्ट्रवादी लढत नव्हती तिथल्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काम केल्याचा संशय भाजप आणि शिंदेसेनेच्या नेत्यांना आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत ठेवून उपयोग काय, उलट त्यांच्यामुळे नुकसानच होत असल्याची भावना नेत्यांची आहे.