“सरकार कोंडीत सापडलेले नाही,उलट त्यांनीच ही आंदोलने उभी केली आहेत”, जरांगेंचा सरकारवर मोठा आरोप….
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | INTERVALI SARATI | STATE GOVERNMENT | MARATHA RESERVATION MOVEMENT | MANOJ JARANGE PATIL | LAXMAN HAKE | MANOJ JARANGE'S ACCUSATION AGAINST THE STATE GOVERNMENT | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
राज्यात चालू असलेली ओबीसी आंदोलने हे सरकार पुरस्कृत आहेत, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी या गावात पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. तर आंतरवाली गावच्या वेशीवर ओबीसी समुदायातील काही लोकांनी उपोषण सुरू केले आहे. लक्ष्मण हाके हे त्या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. तसेच राज्यात इतर ठिकाणी देखील ओबीसींची आंदोलने चालू आहेत. या आंदोलनावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील म्हणाले आहेत कि आम्ही जसे आंदोलन करत आहोत, तसाच ओबीसींना देखील आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही कोणाला रोखणार नाही, रोखू शकत नाही. त्यांनी त्यांचे आंदोलन करावे, आम्ही आमचे आंदोलन चालू ठेवू आणि मागण्या मांडू.
स्त्रोत सोशल मिडिया
मनोज जरांगेंचा सरकारवर निशाना….
ओबीसी आंदोलन सुरू झाल्यामुळे सरकार कोंडीत पकडले गेल्याची चर्चा आहे. सरकारने मराठा समाजाला जी आश्वासने दिली होती ती आता लांबणीवर पडू शकतात किंवा सरकारला मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यास वेळ लागू शकतो असे म्हटले जात आहे. सरकारने मराठा समाजाच्या बाजूने निर्णय घेतला तर ओबीसी समाज नाराज होईल आणि ओबीसींच्या बाजूने निर्णय घेतला तर मराठा समाज नाराज होईल. कोणा एकाच्या बाजूने निर्णय घेतला तर दुसरा समाज आक्रमक आंदोलन करू शकतो. त्यामुळे सरकारसमोरील आव्हाने वाढली आहेत. यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे म्हणाले, हे सरकार कोंडीत सापडलेले नाही, उलट त्यांनीच ही आंदोलने उभी केली आहेत. ही आंदोलने सरकार पुरस्कृत आहेत. त्यामुळे ते कोंडीत पकडले गेले आहेत असे आपण म्हणू शकत नाही. ही केवळ सरकारची नाटके आहेत. हे सरकार आम्हाला वेडे समजत आहे. सरकार आमच्या आमच्यात भांडणे लावून एका बाजूला स्वस्थ बसून पाहत आहे. मुळात गावखेड्यातले ओबीसी आणि मराठा बांधव एकच आहेत. परंतु सरकार त्यांच्यात भांडण लावून शांत बसतेय.
स्त्रोत सोशल मिडिया
मी माझे आंदोलन चालूच ठेवणार….
मनोज जरांगे पाटील म्हणाले सरकार या आंदोलनाला अधिक बळ देऊ शकते हे आंदोलन सरकार पुरस्कृत आहे असे वाटण्याची अनेक कारणे आहेत. आंदोलन अचानक कसे काय सुरू झाले हे त्यातले एक कारण आहे. मी भिती व्यक्त करत नाह, मी शक्यता सांगतोय. हे आंदोलन सरकार पुरस्कृत असू शकते, अन्यथा असे अचानक घडले नसते. आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण मिळण्याच्या वेळीच असे कसे काय घडले ? परंतु मी १३ जुलैपर्यंत काही बोलणार नाही. मी माझे आंदोलन चालू ठेवेन. आम्ही कोणाला आंदोलन करण्यापासून रोखू शकत नाही. तेही आम्हाला रोखू शकत नाहीत. आमच्यावर दादागिरी केली जाते ती वेगळी गोष्ट. परंतु आम्ही कोणाला रोखणार नाही. कारण आंदोलन करण्याचा अधिकार लोकशाहीने सर्वांनाच दिला आहे.