राज्यातील २७ हजार ९२० ग्रामपंचायती मधील कर्मचाऱ्यांचा २८ जून रोजी विधानभवनावर आक्रोश मोर्चा….
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | MUMBAI | VIDHAN BHAVAN | MLA BACHU KADU | MORCHA ON VIDHAN BHAVAN ON BEHALF OF MAHARASHTRA STATE GRAM PANCHAYAT EMPLOYEES UNION FOR JUSTICE DEMANDS OF EMPLOYEES IN THE STATE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
राज्यातील २७ हजार ९२० ग्रामपंचायती मधील ६० हजार कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने शुक्रवार, २८ जून रोजी विधानभवनावर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. कर्मचारी युनियनचे प्रदेशाध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय भोईर यांनी भिवंडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा….
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मंजुर करावी. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करावे. किमान वेतनाच्या अनुदानाची १९ महिन्यांची थकीत रक्कम तात्काळ मिळावी. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनाबाबत असलेली वसुलीची अट रद्द करावी. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधात सुधारणा करावी. ग्रामपंचायत कर्मचारी दहा टक्के आरक्षणानुसार भरती करत असताना दरवर्षीच्या रिक्त पदावर अनुकंपाचे धर्तीवर करावी अशाप्रकारच्या विविध मागण्यांसाठी विधानभवनावर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.