By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: नरेंद्र मोदींच्या निर्णयानंतर पाकिस्तानची झोप उडाली ; पाकिस्तानचे माहितीमंत्री अत्तातुल्लाह तारार यांनी मध्यरात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेतली…
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > देश-विदेश > नरेंद्र मोदींच्या निर्णयानंतर पाकिस्तानची झोप उडाली ; पाकिस्तानचे माहितीमंत्री अत्तातुल्लाह तारार यांनी मध्यरात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेतली…
देश-विदेश

नरेंद्र मोदींच्या निर्णयानंतर पाकिस्तानची झोप उडाली ; पाकिस्तानचे माहितीमंत्री अत्तातुल्लाह तारार यांनी मध्यरात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेतली…

Last updated: 2025/04/30 at 3:25 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
APP32-270223 ISLAMABAD: February 27 - Special Assistant to Prime Minister Atta Tarar addressing an important press conference. APP/TZD/FHA
SHARE

TIMES OF NAGAR 

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. पूर्वानुभव लक्षात घेता भारत आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता असल्याने पाकिस्तान भीतीच्या सावटाखाली आहे. त्याला भारताकडून लष्करी हल्ल्याची भीती आहे. म्हणूनच मंगळवारी (दि.२९ ) मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास पाकिस्तानचे माहितीमंत्री अत्तातुल्लाह तारार यांनी घेतली. भारत २४ ते ३६ तासांत पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई करणार असल्याची विश्वासार्ह माहिती गुप्तचर विभागाकडून पाकिस्तानला मिळाली आहे. असा दावा या पत्रकार परिषदेत आत्तातुल्लाह तारार यांनी केला.आत्तातुल्लाह तरार यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील व्हिडीओसह याबाबत पोस्ट केली आहे. पहलगाम घटनेत सहभाग असल्याच्या निराधार आणि खोट्या आरोपांच्या बहाण्याने भारत येत्या २४ ते ३६ तासांत पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई करण्याचा विचार करत आहेत. अशी गुप्तचर विभागाकडे विश्वासार्ह माहिती आहे. तथपि अशा सहभागीचे  आरोप पाकिस्तान स्पष्टपणे नाकारत असून कोणत्याही प्रकारच्या आक्रमणाला निर्णायक प्रत्युत्तर देण्यात येईल असे त्यांनी म्हटले आहे. खुद्द पाकिस्तान दहशतवादाचे लक्ष्य असल्याचे सांगत भारत आता स्वत:ला जजज्युरी आणि जल्लाद समजत असून ही एक धोकादायक आणि बेजबाबदार वृत्ती आहे. असे  अत्तातुल्लाह तरार यांनी म्हटले आहे. पहलगाम हल्ल्याची स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्यासाठी न्यूट्रल एक्स्पर्ट कमिशन नेमण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने ठेवला होता. पण भारताने तो स्वीकारला नाही. तपास टाळण्यावरून भारताचा हेतू शुद्ध नसल्याचे सिद्ध होते. असा दावा करून केवळ राजकीय फायद्यासाठी जनतेच्या भावना भडकवून लष्करी निर्णय घेतले जात आहेत. असा आऱोप तारार यांनी केला. भारताने लष्करी कारवाई केली तर त्याची संपूर्ण जबाबदारी भारतावर असेल. पाकिस्तान अशा कोणत्याही आक्रमणाच्या कारवाईला पूर्ण आत्मविश्वासाने आणि दृढतेने प्रत्युत्तर देईल. देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आम्ही कोणतीही किंमत मोजण्यास तयार आहोत. अशी दर्पोक्तीही अत्तातुल्लाह तरार यांनी केली.

You Might Also Like

एअर इंडियाचं लंडनला जाणारं एआय १७१ हे विमान कोसळलं ; विमान कोसळलं तिथं मुलगा लंच ब्रेकमध्ये गेला होता, सगळं संपलं असं वाटलं पण मुलगा वाचला आई ढसाढसा रडत म्हणाली…..

चक्क दात घासण्याच्या ब्रशमुळे पतीचं लफडं उघड ; दर शुक्रवारी प्रेयसी घरी घेऊन…

चार विवाहित मुलांची आई सुनांचे दागिने घेऊन ३० वर्षांच्या प्रियकरासोबत फरार…..

….तर बलात्काराचा खटला करता येणार नाही ; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. !

मदरशांमध्ये ऑपरेशन सिंदूर शिकवले जाणार मदरसा बोर्डाच्या अध्यक्षांची घोषणा ; यापूर्वी हिंदू महाकाव्ये, महाभारत आणि रामायण शिकवण्याची केली होती मागणी…….

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्र्यांसह ५४ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल…
Next Article पत्नी नांदावयास येत नसल्याच्या रागाने नवऱ्याने केला पोटच्या मुलाचा खून ; मेहुन्याला दारूची बाटली आणायला पाठवले अन मृतदेह मेहुणीच्या घरी सोडून…..
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?