By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: शिवसेनेचे राज्यसहसचिव विक्रम राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; इंटरसिटीरेल्वे लवकरात लवकर सुरू करावी असे निवेदन देण्यात आले.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > शिवसेनेचे राज्यसहसचिव विक्रम राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; इंटरसिटीरेल्वे लवकरात लवकर सुरू करावी असे निवेदन देण्यात आले.
अहमदनगर

शिवसेनेचे राज्यसहसचिव विक्रम राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; इंटरसिटीरेल्वे लवकरात लवकर सुरू करावी असे निवेदन देण्यात आले.

Last updated: 2025/05/06 at 6:38 PM
By BHAIYYASAHEB BOXER 4 Min Read
Share
SHARE

TIMES OF NAGAR 

शहराचा विकास, बेरोजगारी, शिक्षण व्यापार या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या नगर पुणे शटल इंटरसिटी रेल्वेसाठी शिवसेना युवा सेनेचे राज्यसहसचिव विक्रम राठोड यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अहिल्यानगर येथे स्वागत करून भेट घऊन निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की शहराच्या दृष्टीने अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेला व अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरु होण्यासाठी आम्ही वारंवार सेंट्रल रेल्वेचे महाप्रबंधक- यांची भेट घेऊन निवेदन दिले. मागील १४  वर्षापासून ४० हजार पेक्षा जास्त नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन रेल्वे विभागाकडे पाठपुरावा सुरु असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सध्या दौंडमध्ये कॉर्ड लाईन विद्युतिकरण आणि रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. शटल ट्रेनसाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे. इतकेच नव्हे तर लहान तालुका असलेल्या दौडमधून पुण्यासाठी एक दैनंदिन शटल ट्रेन आहे. नगर हा एक प्रमुख स्थान असून भारतातील एक मोठे आर्मी बेस आहे. अहिल्यानगर व पुणे दरम्यान दररोज २० हजार हून अधिक प्रवासी प्रवास करतात तर आठवड्‌याच्या शेवटी ही संख्या ४० हजार पर्यंत पोहोचते. अहिल्यानगर-पुणे दैनंदिन इंटरसिटी ट्रेनमुळे इंधन बचत प्रदूषण आणि अपघात कमी होतील. दररोज २०.०००  पेक्षा अधिक प्रवासी या सोयीचा लाभ घेऊ शकतील. नागरिकांसह सेना दल, रेल्वे पोलिस यांनाही याचा फायदा होईल. रेल्वे उत्पन्नात वाढ होईल दरवर्षी सुमारे ५ कोटी रुपये मिळू शकणार. अहिल्यानगर येथून सकाळी ६.०० वाजता शटल ट्रेन आणि पुण्याहून सायंकाळी ६.३० वाजता अहिल्यानगरकडे इंटरसिटी ट्रेन चालवावी पर्यायी सर्व पैसेंजर गाड्या बंद असल्याने पुणे- निजामाबाद आणि दौंड-नांदेड या दोन डेमू रेल्वेला प्रत्यक स्थानकावर थांबा देण्याची मागणी करण्यात येत आहे. 

(संग्रहित दृश्य.)

रेल्वेएक्स्प्रेस सुरु करण्यात यावी – विक्रम राठोड 

मंत्रालयाने महतप्रयासाने आष्टी नगर रेल्वे सुरु केली. मात्र या रेल्वेला मिळालेला अत्यल्प प्रतिसाद पाहता या रेल्वेचा फ्लॉप शो झाला आहे. प्रत्यक्षात ही रेल्वे आष्टी-नगर-दौंड कॉडलाईन-पुणे आणि पुढे मुंबई अशी धावायला हवी होती. आपल्या नगर स्थित रेल्वे कर्मचाऱ्यांचे ड्युटीचे तास पूर्ण व्हावेत आणि त्यांना परत नगर मुक्कामी येता यावे या माफक उ‌द्देशाने ही रेल्वे सकाळी नगरहून आष्टीला सोडली आणि ती दुपारी २ पर्यंत परत नगरला आणली. आता या शटलची दुसरी फेरी दुपारी परत नगरहून आष्टीकडे सोडण्यात येणार आहे. आणि सायंकाळी आष्टीहून निघून ती नगरला आणण्यात येणार आहे. पण या रेल्वेला प्रवाशांचा अतिशय अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. तरीदेखील या फ्लॉप शोचा रिपीट टेलिकास्ट करण्याचा घाट रेल्वेने घातला आहे. ही रेल्वे जर आष्टी नगर-दौंड-पुणे-मुंबई अशी सुरु झाली तर तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल. बीड, आष्टी, जामखेड आणि नगरहून पुण्याला दिवसाला पाच लाखाहून अधिक लोक ये-जा करीत असतात. नगर पुणे रोडवरील सूप टोल नाक्यावर याची नोंद आहे तसेच नगर-पुणे मार्गावर दररोज २ हजाराहून अधिक एसटी आणि खासगी ट्रॅव्हल्सची वाहतूक होते. नगरमधील शेकडो वि‌द्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात राहतात. त्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. थेट रेल्वे सुरू झाल्यास दीड तासात ते पुण्याला पोहोचू शकतील. आपल्या घरी राहूनच शिक्षणासाठी ये-जा करू शकतील. रेल्वेअभावी प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल. त्यामुळे लवकरात लवकर आष्टी नगर-दौंड क्वाडलाईन-पुणे-मुंबई रेल्वे चालू करावी अशी विनंती राठोड यांनी केली आहे. आष्टी-नगर-पुणे-मुंबई रेल्वे शटल एक्स्प्रेस सुरु करण्यात यावी अशी मागणी युवा सेनेचे राज्यसहसचिव विक्रम राठोड यांनी केली आहे. ही मागणी करण्यात आली आहे. यावेळी दिलदारसिंग बीर, महेश शेळके, अक्षय राठोड,अमोल निस्ताने, जिग्नेश जग्गड, अमित लड्डा, विनोद गुंडू, अक्षय नागपुरे, शुभम मिरांडे, पंकज राठोड, आदि मंडळी उपस्थित होते.

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article निवडणुकीच्या आदेशाचे शिवसेनेने केले स्वागत ; किरण काळेंच्या नेतृत्वात आता युवा पिढीला नवी संधी मिळणार !
Next Article भारताचे पाकिस्तानमधली ऑपरेशन सिंदूर सक्सेसफूल दहशतवाद्यांचे नऊ कॅम्प उद्ध्वस्त, मध्यरात्री १.२८ वाजता पाकिस्तानात घुसले १.५१ वाजता मिशन पूर्ण …
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?