By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: निवडणुकीच्या आदेशाचे शिवसेनेने केले स्वागत ; किरण काळेंच्या नेतृत्वात आता युवा पिढीला नवी संधी मिळणार !
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > निवडणुकीच्या आदेशाचे शिवसेनेने केले स्वागत ; किरण काळेंच्या नेतृत्वात आता युवा पिढीला नवी संधी मिळणार !
अहमदनगर

निवडणुकीच्या आदेशाचे शिवसेनेने केले स्वागत ; किरण काळेंच्या नेतृत्वात आता युवा पिढीला नवी संधी मिळणार !

Last updated: 2025/05/06 at 6:07 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF NAGAR

 गेली तीन वर्षे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोणत्याही निवडणुका संपन्न झाल्या नव्हत्या. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेली ३ वर्षे प्रशासकीय अधिकारी चालवत आहेत. ही एक प्रकारे लोकशाहीची हत्याच होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांची घोषणा एक महिन्याच्या आत करण्याचा आणि निवडणुक प्रक्रिया चार महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचा अंतरिम आदेश दिला आहे. या आदेशाचे अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही स्वागत करत असल्याचे प्रतिपादन शहर प्रमुख किरण काळे यांनी केले आहे. किरण काळे यांनी पुढे म्हटले आहे. ओबीसी आरक्षणा बाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन राहून या निवडणुका होतील असे न्यायालयाने म्हटले आहे. सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांसाठी या निवडणुका गरजेच्या आहेत. लोकशाही जिवंत राहण्यासाठी निवडणुका महत्त्वाच्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांतूनच नवीन नेतृत्व तयार होत असते. जरी सर्वोच्च न्यायालयाने आदेश देताना निवडणूक आयोगास आवश्यकता भासल्यास निवडणूक घेण्याबाबत मुदतवाढ घेण्याची मुभा दिलेली असली तरी राज्य सरकारने निवडणूक आयोगाच्या आडून निवडणुका घेण्यास चालढकल करू नये अशीच आमची अपेक्षा आहे. जनतेला देखील निवडणुका हव्या आहेत.

Ahmednagar Municipal Election 2018 : अहमदनगर महानगरपालिका पुन्हा त्रिशंकू? - Marathi News | Ahmednagar Municipal Election Result 2018 | Latest Ahilyanagar News at Lokmat.com(संग्रहित दृश्य.)

महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा…   

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी किरण काळे यांच्यावर शहर प्रमुख पदाची जबाबदारी सोपविली आहे. पदाचा पदभार स्वीकारल्यापासून किरण काळे यांनी नव्या जुन्या शिवसैनिकांचा मेळ घालत पक्षात नवचैतन्य आणण्याचे काम सुरू केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर कार्यकारिणी गठीत करण्याच्या हालचालींना वेग दिला जात असल्याचे समजत आहे. याबाबत बोलताना किरणकाळे म्हणाले जुन्या नव्या शिवसैनिकांचा मेळ घालत वरिष्ठांच्या मान्यतेने लवकरच कार्यकारणी जाहीर केली. जाईल. नगर मनपाचा कार्यकाळ संपून सुमारे दीड वर्षांचा कालावधी लोटला आहे. प्रशासकराज सुरू आहे. कचरा संकलन, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई, रस्त्यांची रखडलेली कामे, रंगभवनचे अपूर्ण काम, रुग्णालयाचे रखडलेले काम यासह शेकडो प्रश्न प्रलंबित आहेत. नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. लोकांनी लोकांसाठी निवडलेल्या प्रतिनिधींचे राज्य आल्याशिवाय नागरिकांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे आगामी मनपा निवडणूक शिवसेना ताकतीने लढणार आहे. याबाबतची जोरदार रणनीती आखरी आखणार असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे.

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article निवडणुकांवर सर्वोच्च निकाल ; अखेर महानगरपालिका निवडणुकींचा मुहूर्त ठरला…
Next Article शिवसेनेचे राज्यसहसचिव विक्रम राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; इंटरसिटीरेल्वे लवकरात लवकर सुरू करावी असे निवेदन देण्यात आले.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?