“हम दिल दे चुके सनम” नंतर सलमान खानचे “दिल” गायब.
बॉलिवूडचा विषय निघाला आणि टायगर जिंदा है. याचा विसर तरुनाईला पडावा हे शक्य नाही. बॉलिवूडचा टायगर ५७ वर्षाचा आहे,पण आजची त्याचे सिनेमातले काम पाहता तो तरुण बॉडीगार्ड असल्याचे भासवतो. सिनेमात टायगर ची एन्ट्री होणार असल्याच्या काही मिनिटे चित्रपट गृहात शांतता असते,आणि टायगर ची एन्ट्री होताच टाळ्या शिट्यांचा अंतिम नसतोच. टायगरचे जीवन राहत फतेहआली खान यांच्या गाण्यासाराखाच आहे “तेरी मेरी,मेरी तेरी,प्रेम कहाणी है मुश्कील,दो लाफ्जोमे बयाना हो पाये.” तसे तर अनेक अभिनेत्रींच्या सोबत सलमान खानच्या अफेयर्सच्या बातम्या येतात पण सलमान खानच्या प्रेमाची सुरुवात हि १९९९ झाली.
टायगरच्या जीवनात १९९९ ला विश्वसुंदरीची एन्ट्री.
सलमान खानच्या जीवनात विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय ची एन्ट्री १९९९ ला झाली. अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या रॉय हे ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकत्र आले होते. त्यानंतर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे बोलले जाते. पण त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या अभिनेता विवेक ओबेरॉयसोबत रिलेशनशीपमध्ये होती. पण ऐश्वर्या आणि विवेकचा ब्रेकअप झाला ब्रेकअप का झाला ? जाणून घेण्याची चाहत्यांची इच्छा होती. या मागचे कारण सर्वांना माहिती नव्हते. स्वत: विवेकने यावर प्रतिक्रिया दिली होती.
सलमान खानची कॉल रेकॉर्डिंग विवेक ओबेरॉयने केली व्हायरल.
सलमान खान सोबत पंगा घेत विवेकने आपले करियर स्वतःच्या हाताने उध्वस्त करून घेतले असा शब्दांत विवेकचे चाहते नाराजगी व्यक्त करतात. विवेक ओबेरॉय जरी चित्रपटसृष्टीपासून लांब असला तरी मीडियाशी संवाद साधायला तयार असतो. एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्या रायसोबत असलेल्या नात्याचा ब्रेकअप का झाला ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर विवेकने “कमिटमेंट आणि जबाबदारी झटकण्याची सवय मला नाही.. पण मला सर्वांनीच धोका दिला आहे. लोकांनी वचन दिले पण ते पूर्ण करण्याचा त्यांनी कधी प्रयत्नच केला नाही अशा शब्दांत विवेकने ऐश्वर्याचे नाव न घेता उल्लेख केला आहे. विवेक ओबेरॉय पुढे म्हणाला माझ्या अनेक गर्लफ्रेंड माझ्या लग्नातही उपस्थित होत्या.
ऐश्वर्या दोघांना सोडून बच्चनच्या घरी.
सलमान सोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या आणि अभिनेता विवेक ऑबेरॉय एकत्र आले होते. त्यात ऐश्वर्या ही विवेकसोबत सिरीयस रिलेशनशिपमध्ये होती. सगळे काही ठिक सुरु असतानाच एके दिवशी विवेकने प्रेस कॉन्फरन्स घेऊन सलमानवर आरोप केल्यामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली. कारण विवेक ऐश्वर्या यांच्या रिलेशनशिपमुळे सलमान विवेकवर रागावलेला होता. त्यामुळे त्यांच्यात भांडणे झाली आणि विवेकने दोघांचे कॉल रेकॉर्ड जगजाहिर केले. या सगळ्यामुळे ऐश्वर्या फार गोंधळलेली आणि संतापली होती. या घटनेनंतर बॉलिवूडमध्ये मोठा गदारोळ झाला होता. तेव्हापासून विवेकला चित्रपटांत काम मिळणे बंद झाले. त्याचबरोबर ऐश्वर्यानेही विवेकसोबतची रिलेशनशिप संपवली होती. आणि त्यानंतर काही वर्षांनी बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सोबत लग्न केले.
मागील काही दिवसांपासून अभिनेत्री ऐश्वर्या रॉय-बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली होती. एवढंच नाही तर, बच्चन कुटुंबात अनेक वाद सुरु आहेत… असा दावा करणाऱ्या बातम्या समोर आल्या होत्या. महानायक अमिताभ बच्चन यांनी जुहू येथील ‘प्रतीक्षा’ बंगला लेक श्वेता बच्चन हिच्या नावावर केला. तर दुसरीकडे अभिषेकचे साखरपुड्याची अंगठी काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. शिवाय ऐश्वर्या रॉय हिच्या वाढदिवसासाठी देखील बच्चन कुटुंब सूनेसोबत नव्हतं… अशा अनेक कारणांमुळे ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
अभिषेक बच्चन याची बहिण श्वेता बच्चन हिची एक पोस्ट सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. पोस्टमधील फोटो फार जुना वाटतो. फोटोमध्ये दोघे छान दिसत आहेत. पण श्वेता हिने लिहिलेल्या कमेंटवर अनेकांचं लक्ष येवून थांबलं आहे.अभिषेक याच्यासोबत फोटो पोस्ट करत श्वेता म्हणाली, ‘सर्वकाही ठिक आहे… आयुष्यात पुढे जा… मी कायम तुझ्यासोबत राहिल…’ सध्या सर्वत्र फक्त श्वेता हिने पोस्ट केलेल्या फोटोची आणि लिहिलेल्या कॅप्शनची चर्चा रंगली आहे. एवढंच नाही तर, बहिणीच्या पोस्ट कमेंट करत अभिषेक देखील ‘बेस्ट’ म्हणाला आहे.