By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: छत्रपतींच्या वंशजांना डावलून महापौरांचा श्रेयासाठी लोकार्पण सोहळा. ? कार्यकाळ संपल्यास श्रेय मिळणार नसल्याची भीती,नगरसेवकांचा खासगीत आरोप.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > राजकारण > छत्रपतींच्या वंशजांना डावलून महापौरांचा श्रेयासाठी लोकार्पण सोहळा. ? कार्यकाळ संपल्यास श्रेय मिळणार नसल्याची भीती,नगरसेवकांचा खासगीत आरोप.
राजकारण

छत्रपतींच्या वंशजांना डावलून महापौरांचा श्रेयासाठी लोकार्पण सोहळा. ? कार्यकाळ संपल्यास श्रेय मिळणार नसल्याची भीती,नगरसेवकांचा खासगीत आरोप.

TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR MUNICIPAL CORPORATION | MAYOR | DEPUTY MAYOR | POLITICS | CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ | DESCENDANT OF CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ | AHMADNAGAR POLITICS |

Last updated: 2023/12/21 at 1:57 PM
By BHAIYYASAHEB BOXER 7 Min Read
Share
SHARE

छत्रपतींच्या वंशजांना डावलून सर्वच अधिकारी पत्रिकेवर विराजमान !

श्रेय घेण्यासाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर ? महाराष्ट्राचे आराध्य  दैवताच्या लोकार्पण सोहळ्याचा खेळ

मांडण्याचा डाव कोणाचा ?

 

अहमदनगर महानगर पालिकेच्या महापौर आणि नगरसेवकांचा कार्यकाळ या महिन्याच्या अखेरीस संपूष्टात येणार आहे. नगरसेवकांची मुदत संपणार आहे.नगरसेवकांची मुदत  संपल्यानंतर मेंबर,नेते,साहेब,या मानपानाला विसरून नगरसेवकांना एक सर्वसाधारण व्यक्ती म्हणून जगावे लागेल हे जगणे कदाचित कठीण असल्याचे काही राजकीय विश्लेषक सांगतात.अचानक भेटलेल्या वस्तूचा आनंद,आणि अचानक गेलेल्या खुर्चीचे नैराश्य भरून काढायला अनेक दिवस ओलांडले जातात असे ही ते खासगीत सांगतात.महानगर पालिकेच्या निवडणुका २०२५ मध्ये होण्याची शक्यता दर्शवली जात आहे.हा मोठा कालखंड असल्याने साहेबांना आता एक वर्ष खुर्ची विरहित जगावे लागणार आहे.तर या एक वर्षभरात अनेक भावी नगरसेवक , नेते,भाऊ तयार होणार आहे.

अहमदनगर महानगरपालिका परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन  (१९ फेब्रुवारी) २०२३ रोजी संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले होते. या भूमिपूजनाला संभाजीराजेंची एंट्री झाली, स्टेजवर जाताच त्यांनी राजेशाही खुर्ची काढयला सांगितली. राजेशाही खुर्चीवर बसण्यास नकार दिल्याने संभाजीराजेंचा साधेपणा नगरकरांना भावला होता.

महापालिकेच्या प्रशासकीय‎ इमारतीच्या आवारामध्ये छत्रपती‎ शिवाजी महाराज यांचा पुतळा‎ बसवण्यात येणार आहे. १९‎ फेब्रुवारीला शिवजयंती दिनी‎ छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते‎ त्याचे भूमिपूजन झाले होते.‎ आमदार संग्राम जगताप व महापौर‎ रोहिणी शेंडगे यांच्या उपस्थितीत‎ हा कार्यक्रम झाला होता.प्रशासकीय इमारतीच्या‎ आवारामध्ये छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या सिंहासनावरील‎ आरूढ पुतळा बसवण्यासाठीच्या‎ कामाचे भूमिपूजन भव्य दिव्य‎ पद्धतीने करण्यात आले आहे.‎

 

एवढी गडबड श्रेय घेण्यासाठीच का. 

अहमदनगर महानगर पालिकेच्या प्रशासकीय इमारत आवारात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती.शिवाजी महाराज यांचा सिंहासनावर बसलेल्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज गुरुवार दिनांक २१ डिसेंबर २०२३ सायंकाळी. ४:३० वाजता संपन्न होणार आहे. या कार्यायक्रमाचे उद्घाटन महापौर रोहिणी शेंडगे,आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार आहे,तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार सुजय विखे असणार आहे.या विशेष कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ,जिल्हा पोलीस अधीक्षक.राकेश ओला,मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,म.न.पा आयुक्त पंकज जावळे,उपमहापौर गणेश भोसले,स्थायी समिती सभापती गणेश कवडे,सभागृह नेता,विरोधीपक्षनेते,सभापती म.बा.क.समिती,उपसभापती म.बा.क.समिती आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.अहमदनगर शहरात घडणाऱ्या ऐतिहासिक क्षणाला एवढ्या गडबडीत आटपून घेण्याचे कारण काय असा सवाल सध्या नगरकरांच्या वतीने उपस्थित केला जात आहे.छत्रपतींच्या कोणत्याही वंशजाला आमंत्रित न करता हा कार्यक्रम याच महिन्यात अटपण्याच्या तयारीला नगरकरांनी राजकारणाचे वळण दिले आहे.

 

 

१९ फेब्रुवारीला शिवजयंतीनितीम कार्यक्रम ठेवायला पहिजे होता – शिवप्रेमी 

इतिहासाच्या दृष्टीने प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते.  फेब्रुवारी महिन्यातील १९ तारीख ही अनेक महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार आहे. यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे १९ फेब्रुवारीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवनेरी किल्यावर जन्म झाला.  छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा शिवाजी महाराजांनी रचला आणि त्यापुढे जाण्याची कोणाची टाप नाही.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपतींच्या सिंहासनावर बसलेल्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आयोजित करायला पाहिजे होता,एवढ्या चांगल्या दिवशी जर पालिका करू शकत नाही हे अहमदनगर महानगर पालिकेचे दुर्दैव असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन देखील शुभदिन 

२६ जानेवारी १९५० रोजी या दिवशी संविधान लागू करण्यात आले, ज्याची अनेक कारणे होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. त्याच वेळी २६ जानेवारी १९५० रोजी लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आले. या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त अहमदनगर महानगर पालिकेमध्ये कार्यक्रमांचे आयोजन असतेच,फेब्रुवारी मध्ये जर आचार संहिता लागू झाली तर आपल्याला श्रेय भेटणार नाही या संतापातच कदाचित हे नेते असावेत. खरच  छत्रपतींचा आदर या नेते मंडळींना असता तर या नेते मंडळींनी शिवजयंती दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले असते.आणि १९ फेब्रुवारी पर्यंत जर पुतळ्याचे काम पूर्ण झाले नसते तर  प्रजासत्ताक हा देखील अत्यंत सुभ दिवस आहे त्यावेळी देखील कार्यक्रमाचे नियोजन आखता आले असते. 

 

 

ऐतिहासिक क्षणाला छत्रपतींच्या वारसांना आमंत्रण नाही.?

अहमदनगर महानगरपालिका परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन  (१९ फेब्रुवारी) २०२३ संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले होते. या भूमिपूजनाला संभाजीराजेंची एंट्री झाली, स्टेजवर जाताच त्यांनी राजेशाही खुर्ची काढयला सांगितली. राजेशाही खुर्चीवर बसण्यास नकार दिल्याने संभाजीराजेंचा साधेपणा नगरकरांना भावला होता.मात्र आज अहमदनगर महानगर पालिकेच्या प्रशासकीय इमारत आवारात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती.शिवाजी महाराज यांचा सिंहासनावर बसलेल्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज गुरुवार दिनांक २१ डिसेंबर २०२३ सायंकाळी. ४:३० वाजता संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्याही वंशजाला महापालिकेने आमंत्रण दिले नाही शहरातील व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या नावाची पत्रिका काल रात्री प्रसारित करण्यात आली.भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला छत्रपती संभाजी राजे भोसले यांना आमंत्रित करण्यात आले होते पण या वेळेस त्यांना देखील लोकार्पण सोहळ्यापासून लांब ठेवण्यात आले आहे.ते जर कार्यक्रमाला आज हजर असते तर श्रेय घेण्यासाठी धडपड करणाऱ्या नेत्यांची गोची झाली असती.

 

 

 

कोहीही हस्तक्षेप घेऊन नये म्हणून पत्रिका उशिरा जाहीर केली.?

आज होणाऱ्या छत्रपती.शिवाजी महाराज यांचा सिंहासनावर बसलेल्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा कार्यक्रमाला कोणी सल्लादेखील देऊ नये,किंवा कोणीही हस्तक्षेप करू नये यासाठी श्रेयासाठी धडपड करणाऱ्या नेत्यांनी कोणाच्याही कानाला खबर लागू दिली नाही, कार्यक्रमाचे कोणतेही आमंत्रण आम्हाला देण्यात आले नाही.काल २० डिसेंबर रोजी आम्हाला पत्रिका सोशल मिडीयावर प्राप्त झाल्या असल्याचे काही नगरसेवकांनी खासगीत सांगितले.महापौरांनी कमी कालावधीचा विचार करता विकासकामांवर लक्ष देणे,विकासकामांचे उद्घाटन करणे,नागरिकांच्या समस्या सोडवण्यात भर देणे, आज आवश्यक असल्याचे नगरसेवकांनी मत व्यक्त केले आहे.

श्रेय घेण्यासाठी धडपड : 

छत्रपती.शिवाजी महाराज यांचा सिंहासनावर बसलेल्या पुतळ्याचे काम अध्यापही पूर्ण झालेले नाही तरी देखील काही नेत्यांकडून या कार्यक्रमाला लवकर निपटवून कोनशीलेवर आपले नाव कसे येईल यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे आरोप नगरसेवकांनी लावला आहे.कोनशीला अजूनही लावलेली नाही.ती कोनशीला आणून उद्घाटन करून आपले नाव छापण्याच्या तयारीत काही नेते आहे.उद्घाटन करून झाल्यावर छत्रपतींच्या पुतळ्याचे काम करून नंतर त्यावर कोनशीला बसवण्याचे नियोजन आहे अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

या कार्यक्रमाला संघर्षयोद्धा मनोज जरांगेंना बोलवा :

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे,मनोज जरांगे यांना छत्रपती.शिवाजी महाराज यांचा सिंहासनावर बसलेल्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याला आमंत्रित करा असे मत महानगर पालिकेच्या महासभेत नगरसेविका शीला दीप चव्हाण यांनी मांडले आहे. 

You Might Also Like

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

तर राजकारणात त्याचे कसे तुकडे करायचे ठरवू , उद्धव ठाकरेंचा मातोश्री वर यल्गार ?

अजित पवार दोषी असेल तर फासावर लटकवा, वैष्णवी हागवणे मृत्यूप्रकरणी अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया ; म्हणाले असले नालायक लोक मला……

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात? प्रभाग रचना प्रक्रियेला सुरुवात

आगामी महापालिका महायुती म्हणून एकत्र लढणार, पण… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितल…

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love1
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article शाररीक संबंधाच्या मागणीसाठी पतीने घेतली कोर्टात धाव.पत्नी महिन्यातून फक्त दोनदाच भेटते.
Next Article तारकपूरच्या कॉलनीला इंदिरा गांधीचे नाव काढून मटका बुकीचे नाव,कोण तो मटका बुकी ? बारस्कर,वाकळे,बोरुडे तिन्ही नगरसेवकांचे शहरात कौतुक
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?