By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: आता कुठलीही माघार नाही.अजित पवारांची चुलत्यांवर नाराजी कायम,शरद पवारांच्या विरोधात मोठा यल्गार ?
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > राजकारण > आता कुठलीही माघार नाही.अजित पवारांची चुलत्यांवर नाराजी कायम,शरद पवारांच्या विरोधात मोठा यल्गार ?
राजकारण

आता कुठलीही माघार नाही.अजित पवारांची चुलत्यांवर नाराजी कायम,शरद पवारांच्या विरोधात मोठा यल्गार ?

TIMES OF AHMEDNAGAR | SHARAD PAWAR | BALASAHEB THACKERAY | AJIT PAWAR | SUPRIYA SULE | NATIONALIST CONGRESS PARTY | AHMEDNAGAR | MAHARASHTRA | LATEST NEWS |

Last updated: 2023/12/22 at 7:35 PM
By BHAIYYASAHEB BOXER 6 Min Read
Share
SHARE

बंड केल्यानंतर अजित पवारांचा मिशन विश्वास ? 

 

राजकारणात जास्त स्पष्ट बोलून चालत  नाही. कार्यकर्त्यांची मने जपावी लागतात.कार्यकर्त्यांना घेऊन त्यांची कामे मार्गी लाऊनच आपली खुर्ची वाचवता येते. हा बाळकडू प्रत्येक राजकारण्याला लहानपणीच मिळालेला असतो. शरद पवार देखील याला अपवाद नाही,अनेक मोठ्या राजकीय घडामोडींना कुदळत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर अनेकवेळा आपल्या नावाचा झेंडा गाडणारा तरुण त्याकाळी महाराष्ट्राला मिळाला.विचार करून बोलणे,अभ्यासपूर्वक बोलणे,संयम बाळगणे अशा अनेक गोष्टींनी शरद पवारांना एक मोठी ओळख दिली,कार्यकर्त्यांच्या मनावर राज्य करण्याची संधी दिली. राजकारणात आपल्या पाठोपाठ आपल्या भावी पिढीने देखील सक्रीय व्हावे अशी इच्छा बाळगणारे शरद पवार यांनी लेक सुप्रिया शरद पवार (सुळे) अजित अनंतराव पवार यांना राजकारणात आणून एक ओळख दिली.

 

सुप्रिया सुळेंची राजकीय सुरुवात : 

सुप्रिया सुळे २००६ मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेल्या होत्या. २००९ मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघातून सार्वत्रिक निवडणूक लढविली आणि ३.३६ लाख मतांनी विजय मिळविला.पुढे त्यांनी १० जून २०१२ रोजी, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या १२ व्या स्थापना दिवसानिमित्त,तरुण मुलींना राजकारणात येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी मुंबईत “राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस” सुरू केली. २०१४ आणि २०१९ मध्ये त्या महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदार संघातून लोकसभेवर पुन्हा निवडून आल्या.

 

 

बाळासाहेब ठाकरे आणि सुप्रिया शरद पवार : 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शहरात पवार यांनी आपल्या लोक माझा सांगाती या पुस्तकामध्ये म्हंटल आहे कि,बाळासाहेब ठाकरे यांनी सुप्रिया सुप्रिया सुळेंच्या राजकीय एन्ट्रीला पाठिंबा दर्शवला होता. याबद्दल शरद पवार लिहितात, बाळासाहेबांनी एखाद्याला एकदा आपलं मानलं, की बाकी सारं त्यांच्यासमोर फिजूल असायचं. माझे आणि त्यांचे कौटुंबिक संबंध होतेच. माझ्यावर ते तुटून पडायचे. परंतु जेव्हा सुप्रियाला राज्यसभेत पाठवण्यासाठी उमेदवारी देण्याचा निर्णय झाला, तेव्हा बाळासाहेबांच्यातल्या उत्कट भावनाशील माणसाचं मला दर्शन झालं.

मी त्यांना सांगितलं, सुप्रिया राज्यसभेसाठी निवडणूक लढवते आहे. युतीतर्फे कोण उमेदवार असेल ?  बाळासाहेब उत्तरले, शरदबाबू, असं विचारताना तुम्हाला काही वाटत कसं नाही ? सुप्रिया सहा महिन्यांची असल्यापासून माझ्या अंगाखांद्यावर खेळलेली आहे. आज तिला संधी आल्यावर मी तिच्याविरोधात उमेदवार देईन, असं तुम्हाला कसं वाटलं ? मी प्रश्न केला, तुमचं ठीक आहे. पण भारतीय जनता पक्ष काय भूमिका घेईल ? यावर त्यांचं उत्तर होतं, कमळाबाईला कसं पटवायचं, ती माझी जबाबदारी.

 

अजित पवारांची राजकीय एन्ट्री : 

१९८२ साली अजित पवार यांची पॉलिटिकल इनिंग सुरु झाली. साखर कारखाना, सहकारी संस्थांच्या निवडणुकीत त्यांची राजकारणात एन्ट्री झाले. त्यावर्षी ते सहकारी साखर कारखान्याच्या मंडळावर निवडुन आले. सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याला सुरवात केली. पुढे १९९१ मध्ये संसदीय राजकारणाला प्रारंभ केल्यानंतर आजतागायत त्यांनी सहकारी संस्थांच्याच राजकारणावर आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे.१९९१ साली अजित पवार पुणे जिल्हा सहकारी बँकेवर निवडून गेले. ते बँकेचे अध्यक्षही झाले. पुढचे जवळपास १६ वर्ष ते सातत्याने बँकेच्या अध्यक्षपदी राहिले. त्याचवर्षी ते बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. मात्र शरद पवार यांना मुख्यमंत्री सोडून केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून जावं लागल्याने अजित पवार यांनी त्यांच्यासाठी राजीनामा देऊन मतदारसंघ रिकामा करुन दिला. त्याचवेळी शरद पवार यांच्या विधानसभेच्या जागी अजित पवार विधानसभेवर निवडून गेले. पुढे अवघ्या दिवसातचं त्यांच्याकडे राज्याचे मंत्री म्हणून जबाबदारी आली. ते जून १९९१ ते नोव्हेंबर १९९२ आणि नोव्हेंबर १९९२ ते फेब्रुवारी १९९३ या दरम्यान ते कृषी, फलोत्पादन, जलसंधारण, ऊर्जा, नियोजन अशा खात्याचे राज्यमंत्री झाले. त्यानंतर अजित पवार यांनी मागं वळून पाहिलं नाही. १९९१ ते आजपर्यंत ते बारामती विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांना राज्यातील सर्वाधिक मताधिक्याचा इतिहास घडविणारे नेते म्हणून ओळखलं जातं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल १ लाख ६५ हजार मतांच्या मताधिक्याने अजित पवार निवडून आले आहेत.या दरम्यान १९९५ ते १९९९ हा काळ युतीचे शासन सत्तेत होते. तो अपवाद वगळता १९९९ पासून २०१४ पर्यंत अजित पवार यांनी सातत्याने विविध खात्यांच्या मंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली. ते राज्याचे उपमुख्यमंत्रीही झाले. काँग्रेस, भाजप आणि शिवसेना अशा राज्यातील तिन्ही प्रमुख पक्षांच्या मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी अजित पवार यांना मिळाली. २०१० पासून काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री होते.

 

काका शरद पवार यांचे एवढ वाय वाढलय तरी देखील ते थांबत नाहीत,आम्हाला तरुण पिढीला संधी देत नाही.असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार घेऊन आपणच राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा ठोकून सत्तेत सहभागी होऊन उपमुख्यमंत्री होऊन काकाला झटका दिलेले अजित पवार अत्यंत स्पष्ट वक्ते आहेत. कोणाचाही विचार न करता थेट बोलणारा नेता म्हणून अजित पवार यांची ओळख आहे.अजित पवार यांनी पक्ष कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये अजित पवारांनी शरद पवारांसोबतच्या नेहमीच्या भेटीवरुन होत असलेल्या चर्चांना उत्तर दिलं.

 

आमच्यात कुठेच मॅच फिक्सिंग नाहीये,मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो :

अजित पवार यांनी पक्ष कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये अजित पवारांनी शरद पवारांसोबतच्या नेहमीच्या भेटीवरुन होत असलेल्या चर्चांना उत्तर दिलं. आपल्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांना आपण कधीच फसवणार नाही.अजित पवार म्हणाले की, लोकसभेच्या निडणुका तोंडावर आहेत. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होतील. इंडिया आघाडी भाजपसमोर तग धरु शकणार नाही. लोक मोदींना मतं देणार की खर्गेंना ? तुम्हीच सांगा ? असं म्हणत अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयासोबत ठाम असल्याचं स्पष्ट केलं.आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आलो की कार्यकर्त्यांना वाटतं हे एकच आहेत. परंतु तसं काही नाहीये. आता नवीन भूमिका घेतलेली असून त्यात बदल होणार नाही. मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की, आमच्यात कुठेच मॅच फिक्सिंग नाहीये.

अजित पवार काय म्हणाले.

  • लोक मोदींना मत देणार की खर्गेंना, तुम्हीच सांगा ?

  • माझ्यासोबत आलेल्यांना कधीही फसवणार नाही

  • मार्चमध्ये लोकसभेची आचारसंहिता लागणार आहे

  • संघटनेत चांगलं काम करा, लोकसभेनंतर विधानसभेची निवडणूक लागणार आहे.

 पुण्यात एका उद्योगपतींच्या निवासस्थानी गुप्त बैठक झाली. त्यानंतर दिवाळीमध्ये कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये तीन भेटी झाल्या. शिवाय दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये काका-पुतणे एकाच मंचावर उपस्थित होते.अजित पवारांनी भाजपशी घरोबा केल्यानंतर त्यांची शरद पवार यांच्याशी साधारण चार वेळेस भेट झालेली आहे.

You Might Also Like

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

तर राजकारणात त्याचे कसे तुकडे करायचे ठरवू , उद्धव ठाकरेंचा मातोश्री वर यल्गार ?

अजित पवार दोषी असेल तर फासावर लटकवा, वैष्णवी हागवणे मृत्यूप्रकरणी अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया ; म्हणाले असले नालायक लोक मला……

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात? प्रभाग रचना प्रक्रियेला सुरुवात

आगामी महापालिका महायुती म्हणून एकत्र लढणार, पण… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितल…

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article तारकपूरच्या कॉलनीला इंदिरा गांधीचे नाव काढून मटका बुकीचे नाव,कोण तो मटका बुकी ? बारस्कर,वाकळे,बोरुडे तिन्ही नगरसेवकांचे शहरात कौतुक
Next Article अजित पवारांची बहिणीला साथ नाहीच ? बहिणीच्या निलंबनावर परखड मत, म्हणाले ……
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?