By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: भाजपच्या खासदारांनी दिले पास …… अन आरोपी घुसले आत….! संसदेचे वातावर चिघळवनाऱ्यासाठी सरोदे लढणार तर सरकारने माफ करण्याची आंबेडकरांची मागणी
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > देश-विदेश > भाजपच्या खासदारांनी दिले पास …… अन आरोपी घुसले आत….! संसदेचे वातावर चिघळवनाऱ्यासाठी सरोदे लढणार तर सरकारने माफ करण्याची आंबेडकरांची मागणी
देश-विदेशविशेष व महत्वाचे

भाजपच्या खासदारांनी दिले पास …… अन आरोपी घुसले आत….! संसदेचे वातावर चिघळवनाऱ्यासाठी सरोदे लढणार तर सरकारने माफ करण्याची आंबेडकरांची मागणी

Last updated: 2023/12/15 at 12:59 PM
By BHAIYYASAHEB BOXER 7 Min Read
Share
SHARE

भाजपच्या खासदारांनी दिले पास …… अन आरोपी घुसले आत….!

संसदेचे वातावर चिघळवनाऱ्यासाठी सरोदे लढणार तर सरकारने माफ करण्याची आंबेडकरांची मागणी

  • संसदेत गोंधळ घालून प्रसिद्ध होण्याचा तरुणांना डाव असल्याचे संकेत आहेत.संसदेचे वातावरण तापवणे,आणि मंत्र्यांना घाम फोडणे बेरोजगार तरुणांना  चांगलेच महागात पडले आहे. घटनेतील चारही आरोपी तरूणांवर दहशतवादाचा आरोप ठेवत आज न्यायालयाने त्यांना ०७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

भाजपच्या खासदारांनी दिले पास,अन घुसले आत ? 

धक्कादायक बाब म्हणजे खासदाराच्या प्रताप सिम्हा यांच्या पासवर हे दोन्ही तरुण सभागृहात शिरले. संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, संसदेची सुरक्षा कमकुवत होती. संसदेसाठी विशेष सुरक्षा व्यवस्थेची आवश्यकता असताना ती दिल्ली पोलिसांकडे का दिलीय ?  जुनी सुरक्षा व्यवस्था मजबूत होती. उद्या आणखी काही घटना घडल्यास आश्चर्य वाटणार नाही. कोणत्या घटनेला किती महत्व द्यायचं हे सरकारनं ठरवावं. त्यामुळे सरकारने या तरुणांना माफ करावे आणि हा इश्यू क्लोज करावा. असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.

 

बुधवारी लोकसभेत संसदीय कामकाज सुरू असताना देशातील चार तरुण अचानक संसदेत सुरक्षा मोडून घुसले. एकाने तर चक्क संसदेत उडी मारली. पिवळा, पांढरा, लाल रंगाचा धूर पसरवला तर त्याच्या काही जोडीदारांनी  बाहेरही धूर पसरवून घोषणाबाजी केली होती.

तरुणांनी हे पाउल का उचलले ?

संसदेत घुसणारे तरुण हे सारे अत्यंत सामान्य व गरीब कुटुंबांतून आल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. बेरोजगारीमुळे त्यांनी एकत्र येऊन लोकसभेत घुसून प्रतिकात्मक आंदोलन करण्याची योजना आखली व तडीस नेली, असे सांगितले जाते.

लोकसभेत घुसलेल्या दोघांपैकी सागर शंकरलाल शर्मा हा लखनौच्या आरामबागेत राहणारा आहे. तो बॅटरीवरील रिक्षा चालवतो. त्याचे आई-वडील लखनौतच मोलमजुरी करतात. मनोरंजन गौडा हा मैसूरचा राहणारा आहे. तोही गरीब घरातील आहे. ‘माझ्या मुलाने काही चुकीचे काम केले असेल, तर त्याला फाशीच दिली पाहिजे,’ असे त्याचे वडील देवराज गौडा म्हणतात. गौडा याने मैसूरच्या विवेकानंद महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेतली.

 परिवहन भवनासमोर निदर्शने करणाऱ्या नीलम आणि अनमोल शिंदे यांनीही पिवळ्या पावडरची हवेत फवारणी केली. ते दोघे पोलिसांनी पकडल्यावरही ‘भारत माता की जय,’ ‘हुकूमशाही (तानाशाही) नही चलेगी’ अशा घोषणा देत होते. यातील नीलम ही हरियाणाच्या हिस्सार जिल्ह्यातल्या घोसी कला या गावातील रहिवासी आहे. दिल्लीच्या सीमांवर झालेल्या शेतकरी आंदोलनासह अनेक सामाजिक आंदोलनात ती सक्रिय सहभागी होते. ती पदवीधर असल्याचे समजते.

माजी मुख्यमंत्री यांच्या गावाचा अमोल ? 

अमोल धनराज शिंदे लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील झरी बुद्रुक गावचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे. तो पदवीधर असून तो पोलिस, सैन्य दलात भरती होण्याची तयारी करीत होता. त्याचे आई-वडील मोलमजुरी व गावातील खंडोबा मंदिरात साफसफाईचे काम करतात. त्याचा एक भाऊ मुंबईत मिस्त्रीकाम करतो. ‘मी दिल्लीला कामासाठी जाणार असल्याचे त्याने घरी सांगितले,’ अशी माहिती आहे. अमोल हा हुशार विद्यार्थी असून, पदवीधर झालेला आहे. गावातील सिद्धेश्‍वर माध्यमिक विद्यालयातून त्याने दहावीची परीक्षा दिली. त्याला चांगले गुण मिळाले होते. म्हणून ग्रामस्थांनी त्याचा सत्कार करून पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत केली होती, अशी आठवण झरीचे माजी सरपंच दयानंद सुरवसे यांनी सांगितली. त्याच्या आई-वडिलांची पोलिस चौकशी करीत असून लातूरच्या पोलिस अधिकाऱ्यांसोबतच नांदेड येथील एटीएसचे पथकही गावात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. झरीत सध्या मोठ्या प्रमाणावर पोलिस आहेत.

 रिक्षा चालकाणे इंजिनियर ला घेऊन घडवला प्रकार.

सागर शर्मा, नीलम आझाद, मनोरंजन डी, अमोल शिंदे अशी या आरोपींची नवे असून यातील काहीजण इंजिनियर, रिक्षा चालक आहे तर अमोल शिंदे हा मूळचा महाराष्ट्रातील आहे.

  • चौघांवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल.

संसदेत घुसखोरी करणाऱ्या चौघांवर आज  बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा म्यूहणजे एपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं ही माहिती दिली.

असीम सरोदे म्हणतात या घटनेला समर्थन नाही, पण त्या तरुणासाठी मी लढणार. 

बुधवारी(१३ डिसेंबर) रोजी लोकसभेचं कामकाज सुरु असताना तरुणांनी संसदेत तसंच संसदेच्या बाहेर गोंधळ घातला. यातील एक तरुण अमोल शिंदे हा  महाराष्ट्राचा असून लातूरच्या चाकूर तालुक्यातील झरी गावाचा आहे. दिल्ली पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून त्याच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.अमोल शिंदेची कायदेशीर बाजू वकील असीम सरोदे हे लढवणार आहेत. दरम्यान,तरुणांच्या कृत्याचं समर्थन नाहीच परंतु तरुणांचं गुन्हेगारीकरण करु नये, अशी प्रतिक्रिया असीम सरोदे यांनी दिली आहे.

 

असीम सरोदे काय म्हणतात. ?

असीम सरोदे म्हणाले की, अमोल शिंदे आणि त्याच्या सहकाऱ्यांचा उद्धेश गुन्हेगारी स्वरुपाचा नव्हता. गरिबी आणि बेरोजगारीचा मुद्दा प्राधान्याने विचारात घ्यावा, असं त्याचं मत होतं.अर्थात तरुणांचं आंदोलन समर्थनीय नाही. तरुणांनी संसदेत घुसून धुराच्या नळकांड्या फोडल्या. ही आंदोलनाची पद्धत होऊ शकत नाही. पण, त्यांचा उद्धेश कुणालाही जीवितहानी पोहचवण्याचा नव्हता, तर सरकारला जागे करण्यासाठी होता. त्या उद्देशाने तरुण संसदेत गेले असतील, तर गुन्हेगारीकरण करणारी प्रक्रिया वापरु नये.

असीम सरोदे यांनी फेसबुक वर काय लिहिलंय ?

अमोल शिंदेला कायदेशीर मदत करणार.अमोल शिंदे याने काल संसदेत घुसून बेरोजगारीचा प्रश्न धुराचे नळकांडे फोडून मांडला. त्याने वापरलेली भगतसिंग स्टाईल लोकशाहीला साजेशी नाही. पण मग संसदेतील लोकही असे कोणते काम करीत आहेत ज्यातून अनेक हातांना रोजगार मिळेल, महागाई कमी होईल.अमोल चा उद्देश जर कुणाला दुखावण्याचा व इजा करण्याचा नव्हता आणि त्याला केवळ बेरोजगारीचा मुद्दा त्याला मांडायचा होता तर त्याचे गुन्हेगारीकरण न करता बेरोजगारीचा प्रश्न समजून घेतला पाहिजे. आणि त्याने वापरलेल्या चुकीच्या मार्गाबद्दल जाणीव देऊन त्याला सकारात्मक शिक्षा जरूर करावी असे मला वाटते.

त्यामुळे मला Dhananjay RamKrishna Shinde यांनी लिहिलेले खालील विचार पटले.
लातूरच्या २५ वर्षीय अमोल शिंदे याने संसदेत प्रवेश केला कारण तो बेरोजगार आहे. त्याला रोजगार हवाय.तो दहशतवादी किंवा गुन्हेगार नसून राज्यातील तसेच केंद्रातील असंवेदनशील धोरण प्रक्रियेच्या तो विरोधात आहे.त्या असहाय्य, पीडित, बेरोजगार तरुणाला संसदेतील खासदारांनी मारणे मला योग्य वाटत नाही. बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यात मारहाण करणारे खासदार नापास झाले आहेत. कमजोर बेरोजगारास मारणाऱ्या या मारकुट्या खासदारांची इभ्रत काय राहिली ? संसदेच्या अभेद्य मानल्या जाणाऱ्या सुरक्षा यंत्रणेला गुंगारा देण्यात यशस्वी होऊन लोकसभेत घुसखोरी करणारे दोघे व बाहेर पिवळ्या धुराची तशीच पावडर हवेत उडवणारे आणखी दोन तरुण हे सारे अत्यंत सामान्य व गरीब कुटुंबांतून आल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. बेरोजगारीमुळे त्यांनी एकत्र येऊन लोकसभेत घुसून प्रतिकात्मक आंदोलन करण्याची योजना आखली व तडीस नेली, असे सांगितले जाते.

बेरोजगार तरुणांची  सरकारने शिक्षा माफ करावी अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी मोठी मागणी केली आहे. न्यायालयाने शिक्षा दिल्यानंतर सरकारने तरूणांची शिक्षा माफ करावी, असे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी सरकारला केले आहे. सरकार नोकऱ्या देऊ शकलं नाही. त्यामूळे त्या मुलांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी कायदा मोडला. हे बरोबर आहे, मात्र त्याची शिक्षा द्यायची की माफ करायाची, हे सरकारनं ठरवलं पाहिजे.असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

 

You Might Also Like

एअर इंडियाचं लंडनला जाणारं एआय १७१ हे विमान कोसळलं ; विमान कोसळलं तिथं मुलगा लंच ब्रेकमध्ये गेला होता, सगळं संपलं असं वाटलं पण मुलगा वाचला आई ढसाढसा रडत म्हणाली…..

चक्क दात घासण्याच्या ब्रशमुळे पतीचं लफडं उघड ; दर शुक्रवारी प्रेयसी घरी घेऊन…

चार विवाहित मुलांची आई सुनांचे दागिने घेऊन ३० वर्षांच्या प्रियकरासोबत फरार…..

….तर बलात्काराचा खटला करता येणार नाही ; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. !

मदरशांमध्ये ऑपरेशन सिंदूर शिकवले जाणार मदरसा बोर्डाच्या अध्यक्षांची घोषणा ; यापूर्वी हिंदू महाकाव्ये, महाभारत आणि रामायण शिकवण्याची केली होती मागणी…….

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article मथुरेतल्या शाही ईदगाह मशिदीचं वैज्ञानिक सर्वेक्षण होणार.
Next Article महाराष्ट्राच्या कोट्यावधी जनतेच्या मेंदूला मुंग्याच…! पहाटेच्या शपथ विधीपासून आज पर्यंत जनता ह्यांग ?
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?