By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: अहमदनगर शहरातील पेट्रोल पंपांवर एकच गर्दी,तर काही ठिकाणी पोलिसांवर हल्ला. हे आहे प्रकरण…..
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > अहमदनगर शहरातील पेट्रोल पंपांवर एकच गर्दी,तर काही ठिकाणी पोलिसांवर हल्ला. हे आहे प्रकरण…..
अहमदनगर

अहमदनगर शहरातील पेट्रोल पंपांवर एकच गर्दी,तर काही ठिकाणी पोलिसांवर हल्ला. हे आहे प्रकरण…..

TIMES OF AHMEDNAGAR | MOVEMENT AGAINST THE CENTRAL GOVERNMENT | MOVEMENT OF MOTORISTS| CROWD AT THE PETROL PUMPS |

Last updated: 2024/01/02 at 10:41 AM
By BHAIYYASAHEB BOXER 4 Min Read
Share
SHARE
http://timesofahmednagar.com/wp-content/uploads/2024/01/WhatsApp-Video-2024-01-02-at-10.41.01_99a022f6.mp4

TIMES OF AHMEDNAGAR

केंद्र शासनाने हिट ॲन्ड रन केस प्रकरणी १० वर्ष शिक्षा आणि ७ लाख रुपये दंड अशी तरतूद कायद्यात केली आहे.या कायद्याच्या विरोधात वाहन चालकांनी रास्तारोको आंदोलन केले आहे. हा कायदा अन्यायकारक असल्याचे सांगत वाहन चालकांनी रास्तारोको केला आहे.बंदोबस्ताला असलेल्या काही आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला देखील केला आहे.वाहन चालकांच्या आंदोलनामुळे पेट्रोल पुरवठा देखील बंद झाला असल्याने अहमदनगर शहरातील सगळ्याच पेट्रोल पंपांवर एकच गर्दी पाहायला भेटली.

 

काय आहे नवीन कायदा.

केंद्र शासनाने हिट ॲन्ड रन केस प्रकरणी १० वर्ष शिक्षा आणि ७ लाख रुपये दंड अशी तरतूद कायद्यात केली आहे. या कायद्याच्या विरोधात बस, ट्रक चालकांनी अनेक ठिकाणी आंदोलन पुकारले आहे. हा कायदा ड्रायव्हरांच्या हिताचा नाही, असं वाहन चालकांचे म्हणणे आहे. तसेच नवीन कायद्यानुसार रस्त्यावर अपघात होऊन एखाद्या व्यक्तीने पळून जाऊन जखमी व्यक्तीला रस्त्यावर सोडल्यास त्याला १० वर्षांची शिक्षा होणार आहे. मात्र, अपघात घडवून आणणाऱ्या व्यक्तीने जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेल्यास त्याची शिक्षा कमी होईल.

 

केंद्र शासनाच्या  या नवीन कायद्याच्या विरोधात नवी मुंबई मध्ये एनआरआय पोलीस ठाण्याच्या अंतर्गत जेएनपीटी रोड वर अंबुजा सिमेंट फॅक्टरी आहे. तेथील ड्रायव्हर लोकांनी रस्त्यांवर येऊन रास्ता रोको आंदोलन केलं. नवी मुंबईतील रेती बंदर येथे ४० ते ५० ट्रक चालकांनी रास्ता रोको केला. यावेळी या ट्रक चालकांनी पोलिसांवर लाठीचार्ज करत हाणामारी करण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळत आहे.रास्ता रोको करणाऱ्यांना एनआरआय पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच उलवे येथील अशाच प्रकारचा रास्ता रोको सुरू आहे. त्यामुळे रेतीबंदर आणि उलवे रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.उलवे साईडला गाडी फोडण्याचा इशारा ट्रक चालक आंदोलकांनी दिला आहे. सध्या अनेक ठिकाणी कडक पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला असून आता शांततेचं वातावरण पाहायला मिळत आहे. नवी मुंबई शहरात पुन्हा काही अघटित होऊ नये यासाठी जेएनपीटी, कलनबोली, उलवे येथे पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे.

कायदा अन्यायकारक असल्याचे वाहन चालकांचे मत.

केंद्र सरकारने वाहन चालकासाठी केलेल्या नवीन कायद्यामुळे ट्रक, टँकरसह सर्वच वाहन चालकामध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा कायदा अन्याय कारक असल्याचा आरोप करत राज्यातील अनेक भागात वाहनचालकांनी आंदोलन केलं. मनमा़डमध्ये इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीतुन इंधन आणि गॅस सिलेंडरची वाहतूक करणारे सुमारे २ हजार पेक्षा जास्त टँकर आणि ट्रक चालकांनी आज पासून काम बंद आंदोलन सुरु केले. या संपामुळे ऑइल कंपन्याच्या प्रकल्पातुन राज्यातील वेगवेगळ्या भागातील पेट्रोल पंपावर केला जाणारा पेट्रोल डिझेलसह गॅस सिलेंडर पुरवठा ठप्प ठप्प झाला आहे. संप जास्त लांबल्यास पंपावर इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र शासनाने अपघातांबाबत आणलेल्या या नव्या कायद्याच्या विरोधात आवाज उठवत महाराष्ट्रातील वाहनचालकांनी आज ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील काशिमिराचे घोडबंदर फाउंटन हॉटेलजवळ आणि विरारजवळ वाहनचालकांनी महामार्गावर वाहने उभी करून महामार्ग बंद केला. गोंदियात  रस्त्यावर उतरून टायर जाळत विरोध करण्यात आला. गोंदिया येथील गोंदिया बालाघाट रस्त्यावर कटंगी येथे टायर जाळून रस्ता रोको आंदोलन केलं आहे. गोंदिया बालाघाट रस्त्यावर मोठे वाहन ये-जा बंद करण्यात आले आहे. तर हा कायदा अन्याय कारक असल्याचा आरोप करत त्याच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन गॅस या कंपन्यांच्या प्रकल्पातुन डिझेल, पेट्रोल आणि गॅस सिलेंडर वाहतूक करणारे टँकर, ट्रक चालक रस्त्यावर उतरले आणि असून आज पासून बेमुदत संप सुरु केला आहे.

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love3
Sad1
Happy0
Sleepy1
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article आपल्या पत्नीकडे तिचा मोबाईल मागताय काय …… तर सावध व्हा तुमच्या सोबतही हे घडू शकत …..?
Next Article नगरकरांना आता पेट्रोल पंपावर पेट्रोलसाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही.पेट्रोल डिझेलला पोलीस बंदोबस्त ?
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?