गेल्या काही वर्षांत पती-पत्नीमध्ये वाद होऊन हत्येचे प्रकार वाढले आहेत. शुल्लक कारणावरून जोडीदाराची हत्या केली जात आहे. आणि ही हत्या इतकी क्रूर आणि निर्दयी असते की ऐकणाऱ्याच्या भुवया उंचावल्या जातात. पत्नीने रात्रीचं जेवण दिलं नाही म्हणून  एकाने त्याच्या पत्नीची निर्घूण हत्या केली आहे. या हत्येप्रकरणी कर्नाटकातील शिवाराम नामक व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपी पती करवतीवर काम करतो. त्याने पत्नीबरोबर झालेल्या भांडणात तिच्या डोक्यावर वार केला आणि नंतर तिची कातडी सोलून काढली. एका प्रसारमाध्यमाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

डोके कापून तिच्या शरीराचे काही भाग विलग केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिची त्वचा कापल्याने तिच्या नसा आणि आतड्या दिसत होत्या. तिच्या शरीराशेजारी तिचं कापलेलं डोकं ठेवलं होतं. कुनिगल तालुक्यातील हुलीयुरुदुर्गा शहरात सोमवारी रात्री ही घटना घडली आहे.आरोपी शिवरामाचे पत्नी पुष्पलथा (३५) हिच्याशी नियमित वाद सुरु होते. सोमवारी रात्री पुष्पलथाने पतीला जेवण न दिल्याने दोघांमध्ये वाद झाले. शिवरामाच्या नोकरीवरून त्यांच्यात भांडण झाले होते. त्यामुळे संतापलेल्या शिवारमाने तिच्यावर चाकूने वार केले. नंतर डोके कापून तिच्या शरीराचे काही भाग विलग केले. मंगळवार पहाटेपर्यंत तो तिच्या शरीराची कातडी काढत होता. दरम्यान, या हत्येविषयी त्यांच्या घरमालकाला कळल्याने त्याने पोलिसांशी संपर्क साधला.

तुमकुर हत्याआरोपी शिवरामला पोलीसांनी  ताब्यात घेतले आहे.

त्याने पत्नीची हत्या करून त्याच्या मालकाला कळवले.

पत्नीची हत्या केली तेव्हा त्यांचा आठ वर्षांचा मुलगा गाढ झोपेत होता. तुमकूरचे पोलिस अधीक्षक अशोक व्यंकट म्हणाले घटनास्थळी एका ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला. तिचा नवराही घटनास्थळी होता. चौकशीदरम्यान त्याने हत्येची कबुली दिली.आम्ही आरोपीला ताब्यात घेतले आहे. शिवराम आणि पुष्पा यांचा १० वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता. त्यांच्यात किरकोळ भांडण झाले होते. काल त्यांच्यात नोकरीच्या मुद्द्यावरून भांडण झाले होते. त्याने पत्नीची हत्या करून त्याच्या मालकाला कळवले. त्यांनी लगेच आम्हाला कळवले. आम्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाअसं पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.