By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: सिंधू नदीतून आमचं पाणी वाहिलं नाही, तर भारतीयांचे नदीत रक्त सांडू; बिलावल भुट्टो यांची भारताला युद्धाची धमकी…
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > देश-विदेश > सिंधू नदीतून आमचं पाणी वाहिलं नाही, तर भारतीयांचे नदीत रक्त सांडू; बिलावल भुट्टो यांची भारताला युद्धाची धमकी…
देश-विदेश

सिंधू नदीतून आमचं पाणी वाहिलं नाही, तर भारतीयांचे नदीत रक्त सांडू; बिलावल भुट्टो यांची भारताला युद्धाची धमकी…

Last updated: 2025/05/02 at 5:01 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF NAGAR 

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. भारताने लष्करी आणि राजनैतिक पातळीवर कठोर पावले उचलली आहेत. भारतीय नौदलाने अरबी समुद्रात युद्ध सराव सुरू केला आहे. सिंधू पाणी कराराबाबत पाकिस्तानमधील राजकीय तापमान तापलं आहे. दरम्यान पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे अध्यक्ष आणि माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो-झरदारी यांनी भारताविरुद्ध युद्धाची धमकी दिली आहे. ते म्हणाले की जर मोदी सरकारने सिंधू करार मोडला तर आम्ही नदीत रक्त सांडू. पाकिस्तानला युद्ध नको आहे. पण सक्तीने मागे हटणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी काल (गुरुवारी दि.१ मे) सिंध प्रांतातील मीरपूर खास येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी म्हटलं की जर भारताकडे पहलगाम हल्ल्याचे पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावेत अन्यथा आरोप करणे थांबवावे. आम्ही आमच्या सिंधूला मरू देणार नाही. यापूर्वी भुट्टो यांनी एका ब्रिटिश वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अणुहल्ल्याची धमकी दिली होती. बिलावल भुट्टो म्हणाले की पाकिस्तानचे सैन्य नौदल आणि हवाई दल भारताच्या कोणत्याही आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत.

बिलावल भुट्टो ने भारत को दी गीदड़भभकी, कहा- सिंधु में हमारा पानी बहेगा, उनका खून - bilawal bhutto threatened our water will flow in indus their blood will flow-mobile(संग्रहित दृश्य.)

सिंधू पाणी करारावरील वाद हा दहशतीचे एक प्रमुख कारण.

भारत सरकारने सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पाकिस्तानची प्रतिक्रिया तीव्र होत आहे. सिंधू नदी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून वाहते जी त्या ठिकाणाची जीवनदायीनी मानली जाते. बिलावल यांनी याला नैतिक अधिकार म्हटले आणि भारतावर अतिक्रमणाचा आरोप केला. भारताने आतापर्यंत सिंधू पाणी कराराचे पूर्णपणे पालन केले आहे. परंतु पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामुळे भारतात त्याला एक धोरणात्मक शस्त्र म्हणून पाहण्याची मागणी वाढली आहे. बिलावल भुट्टो यांच्यापूर्वी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ, माजी मंत्री हनीफ अब्बास आणि अनेक जनरल यांनीही अशीच प्रक्षोभक विधाने केली आहेत. यावरून हे स्पष्ट होते की सध्या पाकिस्तानी नेतृत्वात घबराटीचे आणि अस्थिरतेचे वातावरण आहे. यामुळेच पाकिस्तानने लाहोर, कराची, पेशावर सारख्या शहरांमध्ये सायरन सिस्टम बसवली आहे. नियंत्रण रेषेपासून शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या खैबर पख्तूनख्वासारख्या जिल्ह्यांमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सीमावर्ती गावांमध्ये बंकर बांधण्याचे आदेशही देण्यात आले आहे.

You Might Also Like

एअर इंडियाचं लंडनला जाणारं एआय १७१ हे विमान कोसळलं ; विमान कोसळलं तिथं मुलगा लंच ब्रेकमध्ये गेला होता, सगळं संपलं असं वाटलं पण मुलगा वाचला आई ढसाढसा रडत म्हणाली…..

चक्क दात घासण्याच्या ब्रशमुळे पतीचं लफडं उघड ; दर शुक्रवारी प्रेयसी घरी घेऊन…

चार विवाहित मुलांची आई सुनांचे दागिने घेऊन ३० वर्षांच्या प्रियकरासोबत फरार…..

….तर बलात्काराचा खटला करता येणार नाही ; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. !

मदरशांमध्ये ऑपरेशन सिंदूर शिकवले जाणार मदरसा बोर्डाच्या अध्यक्षांची घोषणा ; यापूर्वी हिंदू महाकाव्ये, महाभारत आणि रामायण शिकवण्याची केली होती मागणी…….

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article सावत्र बापाकडून घरात झोपलेल्या १५ वर्षीय मुलीवर लैगिक अत्याचार;
Next Article मासिक पाळीत स्वयंपाक केला नाही, सासू आणि नणंदेंच्या मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या…
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?