आयुष्यभरासाठी निवडलेला जोडीदार बनला वैरी, कुऱ्हाडीने वार करून पत्नीची केली निर्घुण हत्त्या….
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AKOLA | CRIME NEWS | HUSBAND KILLED HIS WIFE WITH AN AX IN THE FIELD | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अकोला हत्येच्या घटनेने हादरले आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातल्या तळेगाव खुर्द गावात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. रेणुका ढोले असे मृत पत्नीचे नाव आहे. तर गजानन ढोले असे पतीचे नाव आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ढोले पती-पत्नीमध्ये वाद होते. शेतीच्या कारणावरून हे वाद सुरू होते तसेच गजानन हा पत्नी रेणुका हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता, त्यातून दोघांची भांडण झाली आणि त्या रागात पतीने पत्नीला घरातच वार करून तिची हत्या केली आहे. आयुष्यभरासाठी निवडलेला जोडीदार हाच वैरी बनला आणि मृत्यू काळ बनून आला.
स्त्रोत सोशल मिडिया
हल्ल्यात पत्नी जागीच ठार….
समोर आलेल्या माहितीनुसार, अकोल्यातील तळेगाव बाजार शेतशिवरात ही घटना घडली आहे. पत्नी रेणुका ढोले हि शेतात पेरणी करण्यासाठी आली असता तेथे पती गजानन पोहचला तिथे त्याने वाद घालण्यास सुरूवात केली होती. वाद सुरू झाल्यानंतर त्याने पत्नीला शेतात पेरणी करायला विरोध केला. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली आणि त्यांचा हा वाद विकोपाला गेला होता. गजाननने रागाच्या भरात थेट रेणुकाच्या अंगावर आणि हातावर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात रेणुका गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
अनेकदा पती पत्नी मध्ये वाद….
घटनेची माहिती मिळताच हिवरखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेचा पंचनामा करून मृतदेह वैद्यकीय तपासणी साठी रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान या प्रकरणात हिवरखेड पोलिसांनी खुनाचे गुन्हे दाखल केले असून अधिक तपास करीत आहे. मारेकरी गजानन ढोले हा सध्या फरार आहे. गजानन हा पत्नीच्या चारित्र्यावर घेत संशय होता. नेहमी त्यांच्यात किरकोळ गोष्टीवरून वाद व्हायचे. या वादादरम्यान रेणुकाच्या माहेरच्यांनी अनेकदा गजानन यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्यातले वाद कायम असायचे. तसेच गजाननने आपली शेती पत्नी रेणुकाच्या नावाने केलेली होती याच शेतीत ती पेरणी करण्यासाठी माहेरवरुन आली असता त्यांच्यात वाद होऊन प्रकरण विकोपाला गेले आहे.