नेमकं काय आहे प्रकरण?
कल्याणमध्ये ३२ वर्षीय तरुणीने कल्याणमधील ४० वर्षाच्या तरुणासोबत लग्न केलं. सरकारी नोकरी मिळविण्यासाठी विवाहाला विलंब झाल्याचे या तरुणाने विवाहापूर्वी बायकोला सांगितले. नवरा शिकलेला असल्याने तक्रारदार महिलेने त्याला पसंत केले. दोघांचं इगतपुरीत थाटामाटात लग्न पार पडलं. लग्नानंतर नवरा विक्षिप्तपणे वागत असल्याचे तक्रारदार महिलेला आढळले. तिने नवऱ्याला भावनिक साद घालण्याचाही प्रयत्न केला. मात्र नंतर तक्रारदार महिलेला नवऱ्यामध्ये काही दोष आढळले. त्यानंतर ती माहेरी गेली. पुढे नवरा आणि सासरच्या आग्रहामुळे पुन्हा सासरी आली. त्यावेळी नवरा लपून औषध घेत असल्याचे आढळले. त्यामुळे महिलेने गुपचूप संबंधित डॉक्टरकडे जाऊन विचारणा केली. त्यावेळी डॉक्टरने नवऱ्यात भावनिक दोष असल्याचे सांगितले. त्यानंतर महिलेने तातडीने पोलिसांत धाव घेतली. भावनिक दोष असल्याने नवरा शरीर सुखापासून वंचित ठेवत असून विश्वासघात आणि फसवणूक करत असल्याची तक्रार महिलेने नवऱ्याविरोधात खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये केली.