मी कधी बोललोय का मला उठून बाथरुमला ने, भुजबळांनी केलेल्या टीकेवर मनोज जरांगेंचा भुजबळांना मिश्कील टोला…
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | STATE GOVERNMENT | MANOJ JARANGE PATIL | CHHAGAN BHUJBAL | MANOJ JARANGE CRITICIZES CHHAGAN BHUJBAL | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी सरकारला १३ जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. १३ जुलैपर्यंत मराठा आरक्षणाचा अध्यादेश न निघाल्यास आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे. दरम्यान, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यावरून ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी याविरोधात षड्डू ठोकला असून जरांगे आणि भुजबळ यांच्या सातत्याने शाब्दिक वाद होत असतात. आता यावरूनच मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळांवर टीका केली आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
भुजबळांनी केलेल्या टीकेवर जरांगेंचा त्यांना सवाल….
ओबीसी आरक्षण संरक्षणार्थ उपोषणास बसलेले लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घेताना छगन भुजबळ यांनी शेरोशायरी केली होती. यावरून मनोज जरांगे म्हणाले, येवलेवाल्यापेक्षा बेक्कार शेरोशायरी आपल्याला येते. आपल्या मराठ्यांचे चार-पाच नेते बेक्कार आहेत. ते तरी कागद बघून वाचतात. आपल्या मराठ्यांचे नेते तर असे आहेत की त्यांना शायरीशिवाय दुसरे काही येतच नाही. ते टिकूच शकत नाहीत यांच्यासमोर. दरम्यान, मनोज जरांगेंच्या अंगाद ताकद आहे का ? अशी टीका छगन भुजबळांनी केली होती. त्यावर, जरांगे म्हणाले, ते म्हणतात की अंगात ताकद नाही. तुला काय लग्न करायचे आहे का माझ्यासंग. तुला करायचे काय ? तू मोजतोच का ? डॉक्टर मोजतात मला मी कधी बोललोय का मला उठून बाथरुमला ने, असेही मनोज जरांगे म्हणाले आहेत. कोणता तरी नेता सांगतोय म्हणून आपण बिघडायचे आणि रोष व्यक्त करायचा. आपल्याला एकमेकांचे चेहरे बघायचे आहेत, रामराम घालायचा आहे, शेतात एकमेकांना काही अडचण आली तर मदतीला जायचे आहे याच भूमिकेत आपल्याला राहायचे आहे, असे आवाहन तुम्ही आमची भूमिका समजून घ्या, आम्ही १५० वर्षांपासून आरक्षणात आहोत, पण आम्हाला हे माहिती नव्हते की आम्ही आहोत. आता आम्हाला माहिती झाले आहे, त्यामुळे नोंदी पाहून तुम्हीही म्हटले पाहिजे की द्या मराठा समाजाला आरक्षण. असेही मनोज जरांगे म्हणाले आहेत.
स्त्रोत सोशल मिडिया
मरणाच्या शेवटच्या घटकासोबत मी समाजासोबतच राहणार – मनोज जरांगे
मनोज जरांगेंनी राज्य सरकारला सगे सोयऱ्यांसह मराठा समाजाच्या आरक्षणासाठी १३ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. त्याबाबतही त्यांनी भाष्य केले आहे. मनोज जरांगे म्हणाले १३ जुलैनंतर सरकारचे काहीही ऐकून घेणार नाही, तुम्ही पलट्या मारल्या तर तुमचे सरकार मी पलटी केलेच समजायचे हे इतके दिवस बोललो नव्हतो. पण आता बोलने आवश्यक आहे असेही मनोज जरांगेंनी म्हंटले आहे. उपोषणानंतर रुग्णालयात उपचार घेत असलेले मनोज जरांगे आज अंतरवाली सराटी गावात आले, त्यावेळी गावकऱ्यांना उद्देशून भाषण केले. मी अंतरवलीत येण्यासाठी आसूसलेलो होतो, मरणाच्या शेवटच्या घटकासोबत मी समाजासोबतच राहणार असल्याचेही जरांगेंनी पुन्हा एकदा म्हटलं आहे.