“भुजबळांच्या नादाला लागू नका, हे बाद झालेले केस आहेत” मनोज जरांगे यांचा भुजबळांवर निशाणा…
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | YEVLA | FORMER MINISTER CHHAGAN BHUJBAL | MANOJ JARANGE PATIL | MANOJ JARANGE'S CRITICISM OF CHHAGAN BHUJBAL | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. सध्या उपोषण स्थगित केले असले तरीही १३ जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांनी पुन्हा एकदा ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. एक दोन जिल्ह्यांमध्ये बोगस नोंदी झाल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीवेळी हा प्रश्न समोर आला, असा आरोप केला जात आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
मनोज जरांगे यांचा सज्जड दम….
मनोज जरांगे म्हणाले कि संविधानाच्या पदावर बसूनही छगन भुजबळांना कळत नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी सर्वांना वेड्यात काढले. मी हैदराबाद गॅझेट आणले आहे. १८८४ ची जनगणना आहे. रेकॉर्डेड ओरिजिनल प्रिंट आहे. यात सर्व मराठा समाज कुणबी आहे. भूमि अभिलेख ३७ क्रमांकावर आहे. हे बोगस आहे का ? तुम्हाला दिलेले आरक्षणच सुरक्षित नाही. ओबीसी आणि धनगरांना सांगने आहे की छगन भुजबळांच्या नादाला लागू नका. राजकीय उदय होण्याची क्षमता आहे. हे बाद झालेले केस आहेत. तुम्ही तुमचे करिअर यांच्या नादाला लागून खराब करून घेऊ नका. आम्ही ओबीसीत आलो तरीही तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. मग मराठ्यांची नाराजी का पत्करत आहात ? एकसंघ राहा. तुमचे एसटीतील आरक्षण मिळेल. आतापर्यंत करोडो पोरांना आरक्षण मिळाले असते. आमचे भांडण तुमच्याशी नाही, सरकारशी आहे. येवलावाल्यांना नाही पालथे केले तर नाव सांगणार नाही. कितीही आडवे या तरीही ओबीसीतच जाऊन दाखवणार असा सज्जड दमही त्यांनी भरला आहे.