TIMES OF AHMEDNAGAR
विखे कुटुंबाने गेली पन्नास वर्ष अहमदनगर जिल्ह्यावर अक्षरशः राज्य केले. मात्र एवढी वर्ष राज्य करून देखील विखे कुटुंबियांना जिल्ह्यामध्ये साधं एक शासकीय मेडिकल कॉलेज आणता आले नाही. विखेंनी विकासाच्या केवळ पोकळ गप्पा मारल्या असल्या घणाघाती आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी केला आहे. जिल्ह्यामध्ये उत्तमोत्तम शिक्षणसंस्थांचे जाळे असायला हवे पण विखेंच्या नाकर्तेपणामुळे होतकरुन व हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जिल्ह्याच्या बाहेर जावे लागत असल्याची खंतही लंके यांनी यावेळी व्यक्त केली.
स्त्रोत.सोशल मिडिया.
जनतेच्या हक्काच्या पाण्यासाठी विखे अपयशी – निलेश लंके.
विखे कुटुंबियांना जिल्ह्यातील सिंचनाचे प्रश्न देखील सोडवता आले नाही. आला असा आरोप देखील माजी आमदार निलेश लंके विखे कुटुंबावर केले आहे. लंके पुढे बोलत होते. ते म्हणाले की गेली पाच वर्षे मी आमदार असताना जवळपास प्रत्येक कालवा समितीच्या बैठकीला उपस्थित राहिलो आहे. परंतु विद्यमान खासदार महोदय कधीही या बैठकीला हजर राहिल्याचे मला दिसले नाही. तुमच्या पक्षाचे कितीही आमदार-खासदार जिल्ह्यामध्ये असो परंतु जेंव्हा आपापल्या भागाचा पाणीप्रश्न येतो तेंव्हा प्रत्येकजण आपापल्या भागाच्या पाण्यासाठी कालवा समितीत आपली बाजू मांडत असतो. नगरच्या जनतेच्या हक्काच्या पाण्यासाठी त्यांची बाजू मांडण्यासाठी विद्यमान खासदार महोदय कधीही उपलब्धच झाले नाहीत.
स्त्रोत.सोशल मिडिया.
विखेंनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वेदना केंद्रापर्यंत मांडल्याच नाहीत.
आजघडीला शेतकऱ्यांची मोठी दयनीय अवस्था आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा. त्यांच्या कष्टाचे चीज व्हावे यासाठी खासदारांनी शेतकऱ्यांची बाजू संसदेत मांडणे अपेक्षित असते. परंतु खासदारांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वेदना केंद्रापर्यंत मांडल्याच नाहीत. त्यांनी फक्त डाळ-साखर वाटण्याचे काम केले. केवळ डाळ-साखर वाटून मते मिळतील असा त्यांचा समज असेल तर तो चुकीचा आहे,जिल्ह्यातील अनेक गावांचा पाणीप्रश्न विखेंच्या उदासीनतेमुळे ‘जैसे थे’ आहे आरोप देखील लंके यांनी केला.
स्त्रोत.टाईम्स ऑफ अहमदनगर.
लंकेंचे चाहते पहाटेपर्यंत वाट पाहतात !