मुंबई : मुस्लिम धर्माविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप नेते नितेश राणे आणि रामगिरी महाराज यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी एमआयएम पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर ते मुंबई तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलं. ही रॅली काल सोमवार (दि.२३ नोहेंबर) रात्री उशिरानं मुंबईत दाखल झाली होती. मात्र काही मुस्लीम समाजाच्या युवकांनी आझाद मैदान येथे या घटनेचा निषेध दर्शवला, नितेश राणे यांची भूमिका मुस्लीम समाजाच्या भावना दुखावणारी असल्याचे मत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेश सचिव (ओबीसी सेल) विद्या गाडेकर व्यक्त केले. आझाद मैदान येथे गाडेकर यांनी या मोर्चाला भेट देऊन त्यांनी महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली आहे.
(स्त्रोत. विद्या गाडेकर सोशल मिडिया.)
मुख्यमंत्र्यांना हे शोभत नाही,विद्या गाडेकर यांची टीका.
मुस्लिम धर्मविरोधी वक्तव्यांवर आधारित ५८ गुन्हे दाखल असतानाही, अद्यापहि कोणतीही कारवाई झाली नसल्याचे विद्या गाडेकर यांनी म्हंटले आहे. त्या पुढे बोलत होत्या जातीच्या धर्माच्या नावाखाली दोन समाजात भांडण लावणं सुरु आहे. दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. रामगिरी महाराजांनी पैगंबरांवर केलेल्या विधानाबाबत मुस्लीम समाजाने नाराजी व्यक्त केली होती. तरीदेखील रामगिरी महाराजांवर व नितेश राणेंवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. कारवाई करणे अपेक्षित असतांना रामगिरी महाराजांच्या केसाला हात लावू देणार नाही, काहीही बोलायचं असलं तरी बोला,तुमचं संरक्षण करु अशी भूमिका घेणं चुकीचं आहे अस वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शोभत नसल्याची टीका देखील विद्या गाडेकर यांनी केली आहे.
Video Player
00:00
00:00
(स्त्रोत. विद्या गाडेकर सोशल मिडिया.)
महाराष्ट्रात कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्यास खपवून घेणार नाही.
महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, फुले, शाहू आंबेडकरांचा इतिहास आहे. मात्र, वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई होत नाही. भाजपचा पिल्लू नेता मुस्लीम समाजाच्या लोकांना मशिदीत घुसून मारेन, असं म्हणतो त्यावेळी त्याला अटक करायला पाहिजे होती असं विद्या गाडेकर म्हणाल्या, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते या प्रश्नी भूमिका घेत नसल्याचं पाहायला मिळतं या प्रश्नावर उत्तर देत गाडेकर म्हणल्या मी एक हिंदू महिला असून देखील मुस्लीम समाजाला धीर देण्यासाठी येथे आले आहे. महाविकास आघाडीला या महाराष्ट्रात सर्वधर्म समभाव आहे. महाराष्ट्रात कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्यास खपवून घेणार नसल्याचे देखील त्यांनी म्हंटल आहे.
Video Player
00:00
00:00