By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएमनं केलंय? आदित्य ठाकरेंचा सवाल.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > राजकारण > महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएमनं केलंय? आदित्य ठाकरेंचा सवाल.
राजकारण

महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएमनं केलंय? आदित्य ठाकरेंचा सवाल.

Last updated: 2024/11/23 at 6:30 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR 

महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीए नं केलंय? असा सवाल उपस्थित करत यांनी दुसऱ्यांचा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे हे पुन्हा एकदा वरळीच्या मैदानातून लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. त्यांना महायुतीकडून मिलिंद देवरा आणि मनसेकडून संदीप देशपांडेंचं आव्हान होतं. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आदित्य ठाकरेंनी एबीपी माझासोबत संवाद साधताना विधानसभा निवडणुकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसेच त्यांनी वरळीकरांचे आणि मित्रपक्षांचेही आभार मानले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल समोर आला आहे. अनेक दिग्गज जागांवर महायुतीने वर्चस्व प्रस्थापित करत दिग्गजांना यंदाच्या निवडणुकांमध्ये पराभूत केलं आहे. आदित्य ठाकरेंनी एबीपी माझासोबत बोलताना म्हटलं, मी वरळीकरांचे आभार मानतो. मित्रपक्षांचेही आभार मानतो. आम्हाला ऑनग्राऊंड जो निकाल वाटत होता तो दिसला नाहीय. महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएनं केलंय? लोकसभेत याच महाराष्ट्रानं आम्हाला आशिर्वाद दिला, मात्र या निकालावर विचार, चर्चा होईल. पण आता तो निकाल लागला आहे, तो मान्य करुनच पुढे जावं लागेल. विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपासूनच वरळी मतदारसंघ विशेष चर्चेत राहिला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं. तर, आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेकडून संदीप देशपांडेंना तर, शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मिलिंद देवरांना उमेदवारी देण्यात आली होती. तिन्ही उमेदवारांमध्ये अत्यंत चुरस रंगली होती.  निकालामध्ये गडबड आहे, पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झालेला आहे. एकनाथ शिंदे सर्व आमदार कसे काय निवडून आणू शकतात. ज्यांच्या गद्दारीवर महाराष्ट्रात रोष आहे, त्या अजित पवारांच्या बेईमानीविरुद्ध महाराष्ट्रात प्रचंड रोष आहे. शरद पवारांच्या सभांना तुफान प्रतिसाद मिळत होता, हे वादळ तुम्हाला दिसत नाही. पण, आज जागा जिंकल्यावरती युतीचं वादळ, युतीचं वादळं म्हणताय. आता, मीडियाने स्वत:ला हा प्रश्न विचारावा, गडबड आहे की नाही? अशा शब्दात संजय राऊत यांनी हातील आलेल्या निकालवरुन तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

You Might Also Like

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

तर राजकारणात त्याचे कसे तुकडे करायचे ठरवू , उद्धव ठाकरेंचा मातोश्री वर यल्गार ?

अजित पवार दोषी असेल तर फासावर लटकवा, वैष्णवी हागवणे मृत्यूप्रकरणी अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया ; म्हणाले असले नालायक लोक मला……

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात? प्रभाग रचना प्रक्रियेला सुरुवात

आगामी महापालिका महायुती म्हणून एकत्र लढणार, पण… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितल…

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy1
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article तारीख ठरली, २५ नोव्हेंबरला शपथविधी,कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?
Next Article पराभवानंतर उमेदवार आक्रमक, भ्रष्ट ईव्हीएम विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?