बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीने बॉलीवूड सोडून काही महिन्यांपूर्वी साध्वी बनली आहे. ममता कुलकर्णी तिच्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. नुकतेच तिने पाकिस्तान आणि मुस्लिमांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ममताने सांगितलं की, मला पाकिस्तानातून रोज ५० लेटर येतात.अलीकडेच ममता कुलकर्णी दिल्लीमध्ये आलेली पाहायला मिळाली. तेव्हा ममता कुलकर्णीने आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, मुसलमानांबद्दल माझ्या मनात खूप प्रेम आहे. त्यांनीसुद्धा मला खूप प्रेम दिलं आहे. विशेषतः दुबईमध्ये. तिथे माझी अध्यात्मिक साधना २५ वर्ष चालली होती. त्या काळात मला खूप शांतता मिळाली आणि प्रेम मिळालं.
(संग्रहित दृश्य.)
दहशतवाद्यांबद्दल मात्र माझ्या मनात अजिबात प्रेम नाही.
ममता कुलकर्णी पुढे म्हणाल्या की जेव्हा मी बॉलिवूडमध्ये सुपरस्टार होते, तेव्हा मला पाकिस्तानमधून दररोज ५० पत्रं यायची. त्यामुळेच माझ्या मनात मुसलमानांबद्दल खूप प्रेम आहे. पण दहशतवाद्यांबद्दल मात्र माझ्या मनात अजिबात प्रेम नाही.सध्या भारत-पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ममतांचं हे विधान चर्चेचा विषय ठरत आहे.गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव सुरू आहे. हे तणाव काश्मीरमधील पहलगाम येथे काही दहशतवाद्यांनी निरपराध पर्यटकांवर हल्ला केल्यानंतर सुरू झाले. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत प्रत्युत्तर दिलं आणि पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळं पूर्णपणे उद्ध्वस्त केले. या कारवाईनंतर पाकिस्तानने भारतावर काही भ्याड हल्लेही केले.