By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: पाकिस्तान भारताविरुद्ध जिंकला पाहिजे ; त्या भारतीय खेळाडूच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर खळबळ…..
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > क्रिडा > पाकिस्तान भारताविरुद्ध जिंकला पाहिजे ; त्या भारतीय खेळाडूच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर खळबळ…..
क्रिडा

पाकिस्तान भारताविरुद्ध जिंकला पाहिजे ; त्या भारतीय खेळाडूच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर खळबळ…..

Last updated: 2025/02/22 at 4:17 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF NAGAR 

 INDIA VS PAKISATAN CHAMPIONS TROPHY 2025 : ‘मला वाटत पाकिस्तान जिंकला पाहिजे…’ अस विधान कोणत्याही पाकिस्तानी क्रिकेटपटूने केलेलं नसून एका माजी भारतीय क्रिकेटपटूने केले आहे. भारताच्या माजी क्रिकेटपटूने अचानक केलेल्या विधानाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.अतुल वासन हे भारताचे माजी क्रिकेटपटू आहेत. ते म्हणाले की,रविवार (दि.२३) फेब्रुवारी रोजी होणारा हाय व्होल्टेज सामना भारताने नाही तर पाकिस्तानने जिंकावा अशी माझी इच्छा आहे. कदाचित त्यांचे हे विधान भारतीय संघाच्या चाहत्यांना सुईसारखे टोचू शकेल, पण त्यांनी त्यामागील कारण देखील सांगितले आहे. 

चैंपियंस ट्रॉफी 2025: दुबई में भारत बनाम पाकिस्तान मैच के लिए जल्दी खरीदें  टिकट, जानिए कितनी रखी गई है कीमत | Cricket Times - Hindi(संग्रहित दृश्य.)

पाकिस्तानने जिंकावे….

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या पहिल्याच सामन्यात यजमान पाकिस्तानला न्यूझीलंडकडून ६० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आता जर पाकिस्तान संघ भारताकडून हरला तर स्पर्धेच्या गट टप्प्यातून त्यांचे बाहेर पडणे निश्चित आहे. अतुल वासन यांनी एएनआयला सांगितले की, मला हा सामना भारताने नाही तर पाकिस्तानने जिंकावा असे वाटते. कारण ते जिंकले तर स्पर्धेत रंगत पाहायला मिळेल. जर तुम्ही पाकिस्तानला जिंकू दिले नाही तर स्पर्धेतील ट्विस्टच पाहायला मिळणार नाही. जर पाकिस्तानचा संघ जिंकला तर मजा येईल. बरोबरीची लढाई व्हायला हवी. यादरम्यान, अतुल वासन यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये खेळणाऱ्या भारतीय संघाचे विश्लेषण करताना, प्लेइंग इलेव्हनमधील फलंदाजीची खोली देखील अधोरेखित केली. यासोबतच, त्यांनी दुबईमध्ये फिरकी आक्रमणासोबत जाण्याच्या रणनीतीचेही समर्थन केले. ते म्हणाले की, भारताकडे खूप चांगले फलंदाज आहेत, शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली,अक्षर पटेल आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी करतो. तुम्ही ५  फिरकीपटू निवडले आहेत आणि हा संघ दुबईसाठी सर्वोत्तम आहे. अतुल वासन यांनी १९९० ते १९९१ दरम्यान भारतासाठी ४ कसोटी आणि ९ एकदिवसीय सामने खेळले आहेत. अतुल वासन म्हणाले, जोपर्यंत पाकिस्तान आपले क्रिकेट सुधारत नाही तोपर्यंत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यात उत्साह नाही. भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत एकूण १३५ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. भारताने पाकिस्तानविरुद्ध ५७ एकदिवसीय सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, पाकिस्तान संघाने ७३ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताला पराभूत केले आहे. याशिवाय ५ सामने अनिर्णीत राहिले आहेत.

You Might Also Like

विराट कोहलीवर गुन्हा दाखल, कोहलीच्या अडचणी वाढणार ?

आयपीएल (IPL) जिंकल्यानंतर आरसीबी टीमला चिअर अप करायला गेलेल्या तरुणांना चेंगराचेंगरीत गमवावा लागला जीव ; मृतांची यादी समोर.

आयपीएलचे नवे वेळापत्रक जाहीर १७ मे पासून पुन्हा सुरु होणार, बीसीसीआयचा मोठा निर्णय…

आयपीएलची स्पर्धा स्थगित; बीसीसीआयने जाहीर केला निर्णय…

ऑलिम्पिकसाठी विनेश फोगाटची अवैधरित्या निवड,५३ किलो वजनी गटात विनेशचा १०-० असा पराभव झाला होता. – बृजभूषण शरण सिंहांचा मोठा आरोप.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article छत्रपतींच्या छावात विकी कौशल पहिली पसंत नव्हता ; तर त्या दक्षिणात्य अभिनेत्याला होती प्रथम संधी परंतु अभिनेत्याने……
Next Article प्रेयसीच्या लग्नात तलवार घेऊन घुसला बिरजू ; मध्यस्ती करणाऱ्याचा लग्नमंडपात केला खून……
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?