प्रियकराने प्रियसीचा गळा दाबून खून केला. खून करतांना म्हणाला पिल्लू तुला दोन मिनिट त्रास होईल पण ………
TIMES OF AHMEDNAGAR | MUMBAI | MUMBAI POLICE | CRIME NEWS | THE BOYFRIEND KILLED THE GIRLFRIEND | MURDER BY STRANGULATION|THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.|
आपण चित्रपटांमध्ये लव स्टोरी पहातो प्रियकर अभिनेता प्रियसी अभिनेत्रीसाठी काहीही करतो.तिच्या साठी गुंडांना तलवारीणे चिरतो. मात्र व्यवहारिक जीवनात या गोष्टी शक्य नसतात.मात्र काही तरुणांवर चित्रपटाचा प्रभाव पडतो आणि ते काल्पनिक जीवनाला अंगीकार करण्याचा प्रयत्न करतात.
प्रियकराने प्रियसिला संपवले,माझी झाली नाही तर कुणाचीही होऊ देणार नाही…..
वैभवचे आणि वैष्णवीचे प्रेम संबंध होते. वैष्णवीच्या घरच्यांनी दोघांच्या नात्याला नकार दिल्याने हे प्रेम प्रकरण टोकास गेले. पिल्लू तुला आता दोन मिनिटं त्रास होईल. पण दुसऱ्या जन्मात नक्की भेटू, प्रियकराने प्रियसिला संपवलं आणि नंतर स्वत:ही ट्रेन खाली उडी मारली. ही गोष्ट कोणत्या चित्रपटाची किंवा वेब सीरीजची नाहीये,हि गोष्ट क्राईम पेट्रोल किंवा सीआयडी मधली देखील नाही. तर मुंबईच्या खारघरमध्ये ही घटना घडली आहे. वैभव बुरुंगले आणि वैष्णवी बाबरचं एकमेकांवर प्रेम होतं. पण घरच्यांच्या विरोधामुळे वैष्णवी वैभवला टाळाटाळ करत होती. त्यामुळे वैभवने वैष्णवीला संपवून स्वत: आत्महत्येचा निर्णय घेतला. वैष्णवी माझी झाली नाही तर तिला कुणाचीच होवू देणार नाही, या भावनेतून त्याने तिला मारुन टाकलं. या गुन्ह्याने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. वैभवने खारघरच्या टेकडी परिसरात वैष्णवीला भेटायला बोलावलं. दुपारी तिची हत्या केली आणि संध्याकाळी जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे खाली उडी मारुन स्वत:ही आत्महत्या केली.आत्महत्येपूर्वी त्याने व्हाईस नोट रेकॉर्ड केली. ज्याच्या आधारे या घटनेचा छडा लागला.
पोलिसांचा तपास ….घरच्यांचा विरोध.
वैष्णवी आणि वैभवच्या लग्नाला होत असलेला विरोध पाहता वैभवने हे पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासात समोर आले आहे. एवढंच नाहीतर प्रियकरानं प्रेयसीला संपवून स्वतःही रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली आहे. आता ती आपली होणारच नाही माझी नाहीतर मग ती दुसऱ्या कोणाचीच होऊ शकत नाही या रागातून वैभवाने वैष्णवीला संपवलं आहे.
गळा आवळून खून.
वैभव बुरूंगले हा चोवीस वर्षांचाच होता. तो नवी मुंबईतील कळंबोली येथे राहायचा, त्याची प्रेयसी वैष्णवी बाबर हि एकोणवीस वर्षांची होती.वैभव आणि वैष्णवी यांचं एकमेकांवर प्रेम होतं. दोघेही जवळच राहणार असल्यानं प्रेमाचं रूपांतर दोघांना लग्नात करायचं होतं. मात्र त्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे दोघांनी भेटू नये, असा समज घरच्यांनी दिला होता. यामुळे वैष्णवी हिनं वैभवला टाळण्यास सुरुवात केली असल्याचं लक्षात आल्यानं वैभवनं तिची हत्या करण्याचा निर्णय घेतला. वैष्णवी माझी होणार नसेल तर कोणाचीच होणार नाही या भावनेतून वैभवने तिला १२ डिसेंबर रोजी खारघर डोंगराच्या निर्जनस्थळी आणून तिचा खुन केला. गळा आवळताना पिल्लू दोन मिनिट त्रास होईल. मात्र आपण दुसऱ्या जन्मात प्रवेश करून भेटू असे म्हणत वैभवने तिचा गळा आवळला. ही व्हाईसनोट पोलीसांना वैभवच्या मोबाईलमध्ये मिळाली.