By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading:  घोषणा देऊन कुणी मुख्यमंत्री होत नाही त्यासाठी खूप उठा-बशा काढव्या लागतात, जयंत पाटील यांचं वक्तव्य चर्चेत.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > राजकारण >  घोषणा देऊन कुणी मुख्यमंत्री होत नाही त्यासाठी खूप उठा-बशा काढव्या लागतात, जयंत पाटील यांचं वक्तव्य चर्चेत.
राजकारण

 घोषणा देऊन कुणी मुख्यमंत्री होत नाही त्यासाठी खूप उठा-बशा काढव्या लागतात, जयंत पाटील यांचं वक्तव्य चर्चेत.

Last updated: 2024/10/17 at 3:58 PM
By BHAIYYASAHEB BOXER 4 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR 

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता संघर्षासाठी तयार झाला आहे. आमचा पक्ष फुटला तेव्हा आम्हाला हिणवलं जात होतं की कुणी राहिलं नाही तुम्हाला प्रचाराला तरी माणसं मिळतील का ? अशी अवहेलना केली जात होती. मात्र शरद पवार या नावाचं वलयच असं आहे की अनेक गोष्टी पुढे घडत गेले. असा जिल्हा आणि तालुका नाही जिथे शरद पवारांना मानणारा कार्यकर्ता नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच मुख्यमंत्री जयंत पाटील अशा घोषणा देऊ नका त्यासाठी खूप उठा-बशा काढव्या लागतात असंही वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे.

मी आदरणीय शरद पवार साहेबांच्या सोबतच'; जयंत पाटील यांची ठाम भूमिका(संग्रहित दृश्य.)

आमदारच गोळीबार करत आहेत, गुंडांची गरजच उरली नाही.

आमच्या पक्षाकडून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून लढण्यासाठी अनेक जन इच्छुक आहेत. एक मतदारसंघ तर असा आहे जिथे ३० जणांनी सांगितलं आहे आम्हाला उमेदवारी द्या. महाराष्ट्रातलं सरकार बदलण्याची महाराष्ट्राची मानसिकता आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा बोजवारा उडाला आहे. कृषी क्षेत्रात महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर गेला आहे. आठ लाख कोटींचं कर्ज झालं आहे. महायुतीचे लोक सत्तेतून जातील तेव्हा महाराष्ट्रावर सव्वा नऊ लाख कोटींचं कर्ज ठेवून जातील. कायदा आणि सुव्यवस्था याची अवस्था तर वाईट आहे. आमदारच गोळीबार करत आहेत  गुंडांची गरजच उरली नाही. पोलिसांची मानसिकता या सरकारने बिघडवली. माझा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे असं सारखं पोलिसांना धमकावलं जातं आहे. असाही आरोप जयंत पाटील  यांनी केलाय. एक फुल आणि दोन हाफ करतात काय ? असा प्रश्न जनतेला पडला आहे. असाही टोला जयंत पाटील  यांनी लगावला आहे.

जयंत पाटील यांच्या 'या' ट्विट ची जोरदार चर्चा !(संग्रहित दृश्य.)

माझ्याविरोधात कुणी शिव्या दिल्या की कार्यभाग साधला जातो.

लाडकी बहीण  लाडका भाऊ या सगळ्या योजना म्हणजे महायुती सरकारचं पुतण्या मावशीचं प्रेम आहे. २० नोव्हेंबरपर्यंत संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या योजना चालणार आहे. असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. मला भाजपा आणि आमच्या पक्षातलेच लोक सांगत होते की तिकडे चला, मी त्यांना दिवारच्या संवादाप्रमाणे उत्तर दिलं तिकडे सगळं असेल आमच्याकडे शरद पवार आहेत. महाराष्ट्रातल्या तरुणाईला त्यांची भुरळ आजही पडली आहे. असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. शिवस्वराज्य यात्रेची ही शेवटची सभा आहे. तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे. ते सगळ्या घरांत जाऊन सांगा. आपल्या सगळ्यांना चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार रायगडावर आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी हे चिन्ह ठेवलं. छत्रपती शिवरायांच्या विचारांवरचा महाराष्ट्र घडवा अशी शपथ आम्ही सगळ्यांनी घेतली होती. महाराष्ट्रात असा मतदारसंघ मिळणार नाही मला प्रचाराची सभा न घेता मला महाराष्ट्राने सातवेळा निवडून दिला आहे. माझ्याविरोधात कुणी शिव्या दिल्या की कार्यभाग साधला जातो. असंही जयंत पाटील म्हणाले.

Sharad Pawar – Page 7(संग्रहित दृश्य.)

शरद पवारांसारखा नेता भारतात नाही.

आपण सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या राजकारणात इथपर्यंत मला आणलं. गॉडफादर मिळाला की प्रगती होते. माझा गॉडफादर माझ्या मागे (शरद पवार) बसला आहे. मला इतकं शिकायला मिळालं की विचारु नका. वागायचं कसं ? बोलायचं कसं ? शरद पवारांसारखा नेता भारतात नाही. आज शरद पवार या ठिकाणी आले आहे. मी त्यांचे आभार मानतो असंही जयंत पाटील म्हणाले. मी जेव्हा मुहूर्त पाहतो तेव्हा शरद पवारांना आवडत नाही. २४ ऑक्टोबरला मी अर्ज भरेन तेव्हा आपण सगळे पुन्हा भेटू. त्यानंतर महाराष्ट्रात फिरावं लागणार आहे. महाराष्ट्रातून अनेक लोक माझ्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी येणार आहे. असं जयंत पाटील म्हणाले तेव्हा जयंत पाटील मुख्यमंत्री अशा घोषणा देण्यात आल्या. त्यावर जयंत पाटील  म्हणाले अशा घोषणा देऊन कुणी मुख्यमंत्री होत नाही त्यासाठी खूप उठा-बशा काढव्या लागतात. 

You Might Also Like

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

तर राजकारणात त्याचे कसे तुकडे करायचे ठरवू , उद्धव ठाकरेंचा मातोश्री वर यल्गार ?

अजित पवार दोषी असेल तर फासावर लटकवा, वैष्णवी हागवणे मृत्यूप्रकरणी अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया ; म्हणाले असले नालायक लोक मला……

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात? प्रभाग रचना प्रक्रियेला सुरुवात

आगामी महापालिका महायुती म्हणून एकत्र लढणार, पण… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितल…

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article आमदार संग्राम जगताप यांच्यातला नम्रपणा आम्हाला नेहमीच भावत असतो, आ.जगतापांचे कौतुक करत ब्राह्मण समाजाच्या वतीने आमदार जगतापांना नगर भूषण पुरस्काराने सन्मानित.
Next Article तो रात्र-बेरात्री फोन करायचा, विश्रामगृहात मिटिंग आहे म्हणून बोलवायचं, अन माझ्या सोबत ……..
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?