By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: राज्याचं हित न पाहणाऱ्यांच्या हातून सत्ता काढून घ्यावी लागेल, मविआच्या उमेदवारांना विजयी करा : शरद पवार
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > राजकारण > राज्याचं हित न पाहणाऱ्यांच्या हातून सत्ता काढून घ्यावी लागेल, मविआच्या उमेदवारांना विजयी करा : शरद पवार
राजकारण

राज्याचं हित न पाहणाऱ्यांच्या हातून सत्ता काढून घ्यावी लागेल, मविआच्या उमेदवारांना विजयी करा : शरद पवार

Last updated: 2024/11/12 at 7:28 PM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE

TIMES  OF AHMEDNAGAR 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर आणि भुसावळ विधानसभा मतदारसंघातील मविआच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेत शरद पवार यांनी रोहिणी खडसे, धनंजय चौधरी आणि  राजेश मानवटकर यांना विजयी करण्याचं आवाहन केलं. शरद पवार यांनी या सभेत संविधान बदलण्याचा भाजपचा प्रयत्न, राज्यातील शेतकऱ्यांची दुरावस्था आणि महिला सुरक्षेच्या मुद्यावरुन सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. शरद पवार म्हणाले, ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. देशाच्या लोकसभेची निवडणूक काही महिन्यांपूर्वी पार पडली. राज्यात चांगला अनुभव आला. जळगाव जिल्हा थोडा मागं राहिला.  ती निवडणूक महत्त्वाची होती. देशाच्या कारभार कुणी कसा चालवायचा हा विचार होता. नरेंद्र मोदी ठिकठिकाणी जाऊन सांगत होते. आम्हाला चारशे जागा द्या. कारभार चालवण्यासाठी चारशे जागांची आवश्यकता नाही. मात्र नरेंद्र मोदींच्या मनात नक्की काय याची शंका अनेकांच्या मनात येत होती, असं शरद पवार म्हणाले.

पार्टी के नए सांसदों से मिले शरद पवार, चुनाव प्रदर्शन पर की चर्चा - sharad pawar met the new mps of the party-mobile(संग्रहित दृश्य.)

संविधानावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता….

ते सतत चारसो पार घोषणा देत होते. शंका ही होती या देशामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिली, त्या घटनेवर हल्ला होण्याची शंका अधिक संख्या कुणाच्याही हाती असली तर नाकारता येत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं. ही शंका अनेकांच्या मनात येत होती. त्याला कारणं आहेत. मोदी साहेब चारशे पारची गोष्ट करत होते. त्यांचा एक सहकारी मंत्री केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री होते. ते सहकारी कर्नाटकमधले होते. त्यांचं नाव हेगडे असं होतं. हेगडेंनी देशाच्या घटनेत परिवर्तन करायचं आहे. त्यासाठी ते चारशे जागांची गरज असल्याचं सांगत होते. राजस्थान, उत्तर प्रदेशमधील मोदींचे सहकारी हेच सांगत होते, असं शरद पवार म्हणाले. देशातील विरोधी पक्षांचे नेते आम्ही एकत्र बसलो आणि विचार केला. संविधानावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही घटना वाचवण्यासाठी एकत्र यावं लागेल. निवडणूक लढवावी लागेल. असा विचार करावा लागेल, असा विचार केल्याचं शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रात आम्ही एकत्र यायचं ठरवलं. उद्धव ठाकरेंची शिवसेना, राहुल गांधींची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.  लोकशाही,संविधानावर संकट येण्याची भूमिका मांडत होतो. त्याला महाराष्ट्राच्या जनतेनं पाठिंबा दिला. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी नवा कार्यक्रम हाती घ्यावा लागेल. शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्ज कमी करावं लागेल. शेतकऱ्यांना सन्मानानं जगण्याची संधी द्यावी लागेल. शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज माफ करण्याचा निकाल घ्यावा लागेल. देशात मोठे उद्योगपती आहेत. काही उद्योगपतींचं १६ लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं गेलं. महाविकास आघाडीचे लोक एकत्र बसले होतो. आज सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मविआच्यावतीनं महिलांसाठी एक कार्यक्रम हाती घ्यायचा आहे. महिलांवरील अत्याचार हे दुखणं अनेक ठिकाणी ऐकायला मिळतं. राज्यातील जवळपास ६ हजार मुली गायब झाल्या. त्यांचा पत्ता लागत नाही हे चित्र महाराष्ट्रात घडलं, असं शरद पवार म्हणाले.

You Might Also Like

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

तर राजकारणात त्याचे कसे तुकडे करायचे ठरवू , उद्धव ठाकरेंचा मातोश्री वर यल्गार ?

अजित पवार दोषी असेल तर फासावर लटकवा, वैष्णवी हागवणे मृत्यूप्रकरणी अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया ; म्हणाले असले नालायक लोक मला……

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात? प्रभाग रचना प्रक्रियेला सुरुवात

आगामी महापालिका महायुती म्हणून एकत्र लढणार, पण… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितल…

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article बॉलीवूड सुपरस्टार अभिनेता शाहरुख खान धमकी प्रकरणात मोठी अपडेट….
Next Article पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघ; महिलांना झाले अश्रू अनावर, संदेश कार्ले आमचा लाडका भाऊ.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?