केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवारी (दि २९) या संदर्भात बैठक घेतली होती. राज्याच्या पोलिस महासंचालक पदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावांची यादी पाठवण्यात आली होती. यात रश्मी शुक्ला यांचे देखील नाव होते. दरम्यान, त्यांना महासंचालकपद किंवा मुंबई पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक केली जाणार या बाबत संभ्रम होता. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नेमणूक केली आहे. मुंबईचे महासंचालक रजनीश शेठ यांच्या जागी आता रश्मी शुक्ला या नव्या महासंचालक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
कोण आहेत रश्मी शुक्ला ?
रश्मी शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्या पुणे पोलिस आयुक्त असतांना वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा तयांच्यावर आरोप होता. या प्रकरणी तयांच्यावर गुन्हा देखील दाखल करत चौकशी सुरू करण्यात आली होती. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार पडल्यावर त्यांच्यावरील चौकशी थांबवण्यात आली होती. एवढेच नाही पुणे पोलिसांनी रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात ‘क्लोजर रिपोर्ट’ देखील सादर करत त्यांना निर्दोष मुक्त केले होते.राज्यात सत्तांतर झाल्यानंतर फोन टँपिंगच्या प्रकऱणातील त्यांच्या विऱोधातील चौकशी बंद झाली होती. मुंबई उच्च न्यायालयाने दोन महिन्यांपूर्वी शुक्ला यांच्या विरोधातील फोन टॅपिंगचे दोन बेकायदेशीर खटले फेटाळून लावले होते.
माजी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने आता त्यांच्या जागी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या डीजीपीपदी नियुक्ती झाली आहे.राज्याच्या पोलीस महासंचालकपदी १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला या फोन टॅपिंग प्रकरणांमुळे वादात सापडल्या होत्या.
कोण-कोणत्या नेत्यांच्या फोन टॅपिंगचे आरोप.?
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या काळातील कथित फोन टॅपिंग प्रकरणी महाविकास आघाडी सरकारनं त्यांची चौकशी सुरु केली होती. एकनाथ खडसे, संजय राऊत, नाना पटोले, आशिष देशमुख आणि बच्चू कडू यांचे फोन टॅप करण्यात आल्याची माहिती तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत देखील दिली होती. दरम्यान राज्यात सत्तांतर झाल्यानंतर फोन टँपिंगच्या प्रकऱणातील त्यांच्या विऱोधातील चौकशी बंद झाली होती. मुंबई उच्च न्यायालयाने दोन महिन्यांपूर्वी शुक्ला यांच्या विरोधातील फोन टॅपिंगचे दोन बेकायदेशीर खटले फेटाळून लावले होते. मुंबईतील पहिल्या एफआयआरमध्ये शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे बेकायदेशीररीत्या फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.पुण्यातील दुसऱ्या एफआयआरमध्ये त्यांनी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप झाला होता. इतकंच नाही तर काही पोलिस अधिकाऱ्यांच्या पैशासाठी बदल्या आणि पोस्टिंग ऑफर करणारे मध्यस्थ यांच्यातील संबंध उघड करणारा एक वर्गीकृत अहवाल लीक केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. तसेच २०२० मध्ये SID च्या आयुक्त असताना त्यांनी एक गोपनीय अहवाल लीक केला होता. रश्मी शुक्ला यांनी हे आरोप फेटाळून लावत राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सेवेच्या हितासाठी काम केल्याचा दावा केला होता.