TIMES OF AHMEDNAGAR
भाग – ३
अहमदनगर जिल्ह्यात गुंडांची दहशत कायम आहेच त्यात शंका व्यक्त करण्याचे एकही कारण नाही. मात्र पोलिसांच्या भूमिकेवर देखील वारंवार संशय घेतला जात आहे. गुन्हे घडतात पोलीस गुन्हेगारांना अटक करतात. मात्र गुन्हेगारांचा व त्या गुन्ह्यांचा पूर्णपणे तपास होत नाही. असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी पत्रकार परिषदेत केला होता. गुन्हेगारांना कोणतीही जात किंवा धर्म नसतो हे जरी खरे असले तरी त्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळनाऱ्या पोलिसांना धर्म असतो.
तो धर्म म्हणजे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत.
स्त्रोत.सोशल मिडिया.
सज्जन खोट्या गुन्ह्यात दुर्जन लक्ष्मीच्या नाण्यात …..
अहमदनगर जिल्ह्यात अवैध धंद्यांनी धुमाकूळ घातला आहे. अवैध धंद्यांमुळे अनेक निष्पाप लोकांचा बळी जात आहे. मात्र या निष्पाप लोकांच्या बळीचा कोणताही परिणाम प्रशासनावर होत नसल्याचे चित्र आहे. त्याला कारण देखील तसेच आहे. अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील काही अवैध धंद्यांना प्रशासनातील काही लोक पार्टनर असल्याचे स्थानिक प्रतीस्पर्धींकडून समजते. अनेक ठिकाणच्या झोपडपट्ट्यांमध्ये, सार्वजनिक शौचालयांमध्ये अवैध धंद्यांचे जाळे पसरले आहेत,या झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या गोर-गरिबांना हाताशी धरून शहरातला कारभार चालला आहे. या अवैध धंद्यामधून मोठी कमाई होत आहे. होत असलेल्या कमाईचा एक हिस्सा आपल्या बॉसला दिला कि बॉस गार होतो आणि हे बहाद्दूर टूकारांना हाताशी धरून स्वतःच अवैध धंद्यांचे कारभारी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
शहरात आज “रविराज”
कोठला हा परिसर शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. या परिसरात “राविराज” आहे. रविराज्यात या परिसरातील अवैध धंद्यांचे मिशन कलेक्शन हा एक उपक्रम राबवला जातो. या मिशन कलेक्शनला नियंत्रित करण्यासाठी “रविराज्यात” एक सांड नेमलेला आहे. बाहुबली या सिनेमात जसा एक रेडा सांड भाल्लालदेवच्या अंगावर सोडला गेला होता,तसाच एक सांड अवैध धंदे करणाऱ्या लोकांच्या अंगावर मिशन कलेक्शनची तलवार घेऊन सोडला गेला आहे. या मिशन कलेक्शनचे मुख्यालय कोठला झोपडपट्टी येथे असल्याची माहिती रविराज्यात अभिमानाने सांगितली जाते.
स्त्रोत.सोशल मिडिया.
कलेक्टर हा , अधीक्षकांचे तोड बंद का ?
जिल्ह्याचा कारभार सांभाळण्यासाठी जिल्हाधिकारी असतात त्यांना इंग्रजीभाषेत आपण कलेक्टर म्हणतो. कलेक्टर यांची भूमिका सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची असते. मात्र शहरात कलेक्टर म्हणून मिरवणारा हा नवीन कलेक्टर कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. अवैध धंद्यांची मलाई खाणारा हा कलेक्टर प्रशासनाला परिचित आहे. अनेक तरुणांना हाताशी धरून सर्वसाधारण लोकांवर गुन्हे दाखल करणे,अवैध धंद्यांना प्रोत्साहन देणे,खोट्या गुन्ह्यांसाठी महिलांचा गैरवापर करून घेणे असे प्रकार सत्ता टिकवण्यासाठी या राविराज्यात केले जात आहे. लक्षी दर्शन अंतिम टार्गेट असल्याचे राविराज्यात स्पष्ट होत आहे.