सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्या प्रेम प्रकरणावर सलीम खान म्हणाले ….. दोघांमध्ये जिच्यामुळे वाद झाले, तिला तर तिसराच घेऊन गेला.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | BOLLYWOOD | SALMAN KHAN AFFAIR | AISHWARYA RAI VIVEK OBEROI | ABHISHEK BACHCHAN | SALIM KHAN | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अभिनेता सलमान खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, घराबाहेर झालेल्या गोळीबारामुळे भरपूर चर्चेत आहे. गोळीबारानंतर सलमान खानच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आली आहे. शिवाय सहा जणांना पोलिसांनी अटक देखील केली आहे. याआधी देखील अभिनेत्याला अनेकदा जीवेमारण्याची धमकी देण्यात आली होती. यावर सलमान खान याचे वडील आणि लेखक सलीम खान यांनी मौन सोडलं होतं. आता देखील सलीम खान यांनी सलमानच लग्न, विवेक ओबेरॉय सोबत झालेले वाद यांवर मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र सलीम खान यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
दोघांमध्ये जिच्यामुळे वाद झाले, तिला तर तिसराच घेऊन गेला.
सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यामध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यामुळे वाद टोकाला गेला होता. सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात विवेकओबेरॉयची एन्ट्री झाली. त्यानंतर विवेक आणि सलमान यांच्यात अनेक वाद झाले. यावर सलीन खान यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सलीम खान म्हणाले काही विषय भावनात्मक असतात. त्यावर कोणतंही समाधान नसतं. सलमान आणि विवेक दोघे तेव्हा भावनात्मक होते. दोघांना नंतर जाणीव होईल की, कोणताच अर्थ नसलेल्या गोष्टीवर त्यांचे वाद झाले आहेत. दोघांमध्ये जिच्यामुळे वाद झाले, तिला तर तिसराच घेऊन गेला आणि दोघे तिथेच राहिले ऐश्वर्या राय हिचं नाव न घेता सलीम खान यांनी मोठा खुलासा केला.
स्त्रोत.सोशल मिडिया.
५८ व्या वर्षी देखील टायगर एकटाच आयुष्य जगत आहे.
सलीम खान यांनी सलमान खान याच्या लग्नावर देखील स्पष्टीकरण दिलं. २००९ च्या पूर्वी सलमान खान याचा कोणताच सिनेमा बॉक्स ऑफिस हीट ठरत नव्हता. तेव्हा देखील सलीम खान सलमानला म्हणाले होते, २००९ नंतर तुझ्या आयुष्यात खूप बदल होतील. २००९ नंतर टायगरचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर हीट ठरले. टायगरच्या लग्नाबद्दल देखील सलीम खान म्हणाले होते. पुढच्या एक दोन वर्षात सलमानचं लग् झालं तर होईल. असं नाही झालं तर, त्याच्या लग्नाच्या शक्यता फार कमी आहे. सलीम खान यांनी भाईजानबद्दल केलेली भविष्यवाणी खरी ठरली. २००९ नंतर सलमान खान याच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. पण टायगरच्या खासगी आयुष्यात मात्र कोणाची एन्ट्री झाली नाही. वयाच्या ५८ व्या वर्षी देखील टायगर एकटाच आयुष्य जगत आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
कोणत्याच अभिनेत्रीसोबत टायगरच नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.
अभिनेता सलमान खान याने आतापर्यंत अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत टायगरच नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अभिनेत्री संगीता बिजलानी हिच्यापासून अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यापर्यंत टायगरने अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे.टायगरच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, टायगर सिंकदर सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सर्वत्र टायगरच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील टायगर कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.