TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | CHIEF MINISTER EKNATH SHINDE | HOME MINISTER DEVENDRA FADNAVIS | VIDHAN SABHA SPEAKER RAHUL NARVEKAR | SHIV SENA UDDHAV BALASAHEB THACKERAY GROUP | SUSHMA ANDHARE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
ठाणे हा निष्ठावंत शिवसैनिकांचा बालेकिल्ला आहे. योगायोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे राहतात असं म्हणत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना ठाकरे गटाची जनसंवाद यात्रा ठाण्यात पोहचली. त्यावेळी अंधारे यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच आपल्या भाषणात सुषमा अंधारे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही टीका केली.
स्त्रोत.सोशल मिडिया
मला कशाला माकडांची भीती वाटेल ?
फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे. सगळ्यात जास्त गुन्हेगारी हि ठाणे आणि कल्याण मध्ये आहे. मी हा आरोप माझ्या मनाने करत नाही. मला हे विविध जिल्ह्यातील बार असोसिएशनच्या वकिलांनी सांगितलं आहे. हे चित्र अत्यंत दुर्दैवी आहे. त्यादिवशी माझ्या सभेत माकड आलं त्याची बातमीही झाल्याचं मी वाचलं. मला कुणीतरी विचारलं माकडांची भीती वाटते का? मी त्यांना म्हटलं माकडचाळे करणारे लोक आजूबाजूला असताना मला कशाला माकडांची भीती वाटेल? असं म्हणत सुषमा अंधारे यांनी ठाण्यात टोलेबाजी केली.
स्त्रोत.सोशल मिडिया
१० पक्ष फिरून आलेल्या माणसाने आम्हाला निष्ठेचं प्रमाणपत्र वाटण्याची गरज नाही
सध्या श्रीरामाचा फार बोलबाला आहे. मात्र श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम होते. जे श्रीरामांचं राजकीय वापर करु पाहात आहेत त्यांना राम कळलेले नाहीत. त्यांना राम कळले असते तर मर्यादेचा गुण त्यांना कळला असता. भाजपा आणि शिंदेंच्या भक्तुल्यांनी मर्यादा नावाची गोष्टच ठेवलेली नाही. सगळ्या मर्यादा त्यांनी ओलांडल्या आहेत. दिलेला शब्द हे लोक अजिबात पाळत नाहीत हे रोज स्पष्ट होतं आहे. यावेळी सुषमा अंधारे यांनी मोदींची नक्कल देखील केली. या लोकांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या लोकांना पक्षात घेतलं आहे. प्रभू रामाचे खरे अनुयायी उद्धव ठाकरे आहेत. इतक्या गोष्टी घडून गेल्या तरीही त्यांनी मर्यादा सोडलेली नाही. त्यांचा राज्यकारभार व्हाया गुवाहाटी आणि सुरत यांनी हिरावून घेतला. मुख्यमंत्री शिंदेनी हे सभागृहात आणि अमृता फडणवीस यांनी बाहेर हे सांगितलं आहे. तसेच राहुल नार्वेकर यांच्यासारख्या १० पक्ष फिरून आलेल्या माणसाने आम्हाला निष्ठेचं प्रमाणपत्र वाटण्याची गरज नाही हे लोकांना आम्ही सांगितलं आहे. लोकही सध्या निवडणुकीची वाट बघत आहेत असंही अंधारे यांनी म्हटलं आहे. आपल्या भाषणात राजन विचारे यांचा उच्चार २०२४ ते २०२९ चे खासदार असा केला आहे. निष्ठेने काम करणं हेच इथे असलेल्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात आहे. निष्ठेने वागणाऱ्या प्रत्येकाने आमची यात्रा यशस्वी केली.
स्त्रोत.सोशल मिडिया
फडणवीस मुंडेंची बॅग घेऊन फिरायचे …
फडणवीस यांनी मराठा आंदोलनाची एसआयटी चौकशी लावण्यापेक्षा अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केलं जात होतं त्या प्रकरणाची एसआयटी चौकशी लावली पाहिजे अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. तसंच मराठा आणि ओबीसी अशी भांडणं लावू नका. समृद्धी महामार्गावर आजवर हजारो जीव गेले त्याला जबाबदार कोण,त्याचीही एसआयटी चौकशी लावा. कालपर्यंत भाजपाने हिंदू-मुस्लीम दंगल घडवण्याचा प्रयत्न केला. यांच्याकडे सगळे भक्त आहेत. नेते यांनी केव्हाच संपवले. ज्या मुंडेंची बॅग घेऊन फडणवीस फिरायचे त्या मुंडेंच्या कन्या पंकजा मुंडे यांचं राजकारण संपवण्याचं काम फडणवीस यांनी केलं आहे. तुम्ही ओबीसींचेही नाहीत हे आम्हाला कळलं आहे. तसं असतं तर विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यांचं राजकारण तुम्ही संपवलं नसतं. कधी काळी तुमच्या गळ्यातला ताईत असलेल्या आशिष शेलारांना साईडलाईन केलं नसतं. तुमच्या लाडक्या गँगमध्ये प्रसाद लाड आणि नवीन लोकांची भरती तुम्ही केली आहे. असंही सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया
खोटी शपथ घेणारे मुख्यमंत्री आहेत…
हिंदू आणि मुस्लीम अशी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला. मला आनंद वाटतो की मुस्लीम बांधवांनी दंगल घडू दिली नाही. भाजपाला जेव्हा हे समजलं की हिंदू-मुस्लीम दंगल होऊ शकत नाही तेव्हा मराठा विरुद्ध ओबीसी राजकारणाचा डाव रचला गेला. सगळे गुण्यागोविंदाने नांदत होते, मात्र यांच्यात फूट पाडण्यात आली. एकीकडे खोटी शपथ घेणारे मुख्यमंत्री आहेत. शिवछत्रपतींची शपथ घेऊन तुम्ही अधिसूचना मनोज जरांगेंच्या हाती देता, दुसरीकडे भुजबळ आणि पडळकर इशारे देतात. हे सगळे एकाच सरकारमध्ये आहेत पण परस्परविरोधी विधानं करुन नुरा कुस्ती करत होते. त्यामुळे हा वाद वाढला असाही आरोप सुषमा अंधारे यांनी केला.म्हणूनच हे लोक रामाचा वापर राजकीय टूलकिट म्हणून करत आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची एसआयटी लावत आहात, फडणवीस यामागे तुम्ही शरद पवार आणि राजेश टोपे यांना लक्ष्य करत आहेत. तुमचा खरा निशाणा मुख्यमंत्री शिंदेंवर आहे हे आम्हाला माहीत आहे असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.