TIMES OF AHMEDNAGAR
अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन अपयशी असल्याचे बोलले जाते. मात्र सुप्रिया सुळेंच्या प्रत्रकार परिषदेनंतर अहमदनगर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या कामावर प्रश्न चिन्ह उद्भवण्याचे कारणच येत नाही.त्याला कारणही तसेच आहे.कारण सुप्रिया सुळेंनी थेट गृहमंत्र्यांवरच आरोप केले आहेत.पत्रकार परिषदेत बोलतांना सुप्रिया सुळेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्याच्या कायदा सुव्यवस्था प्रकरणी आरोप केले आहेत.
अहमदनगर शहरात वारंवार खूनासारखे भयंकर गुन्हे घडत आहेत. खून झाला अशी बातमी जरी आली तरीही कदाचित नगरकरांना काही नवीन घडले असे वाटणार नाही. त्याला कारणही तसेच आहे. गुन्हेगारीने शहरात दहशत माजवली आहे.मात्र गुन्हेगारांना पोलीस आळा का घालत नाही असा सवाल सध्या शहरात चर्चेला उधान देत आहे. अवैध धंद्यांमुळे अवैध धंद्यांचे मालक वर्चस्वाच्या लढाईसाठी एकमेकांवर तुटून पडतात आणि या लढाईत एकाद्याचा जीव जातो.परंतु या अवैध धंद्यांच्या मालकांनी आपला मोर्चा काही गद्दार कर्मचाऱ्यांना हाताशी धरून सर्वसामन्यांवर व अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना देणाऱ्या काही सामाजिक भान असलेल्या नागरिकांवर दहशत माजवण्याकडे वळवला आहे. काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहरात एका वकिलावर प्राणघातक हल्ला झाला.आमच्या अवैध धंद्याची माहिती पोलिसांना देतो या कारणावरून काही गुंडांनी त्या वकिलावर हल्ला चडवला होता.त्या हल्ल्यात तो तरुण वकील गंभीर जखमी झाला होता.त्या वकिलाने दिलेल्या तक्रारीनुसार काही गुंडांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला होता.
सुळेंचा गृहमंत्र्यांवर आरोप.
देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हापासून महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली आहे तेव्हापासून राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. ही जबाबदारी स्वीकारण्यात देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या बदल्या सातत्याने केल्या जात आहेत. पोलिसांना पारदर्शकपणे काम करु दिलं जात नाही असाही आरोप सुप्रिया सुळेंनी केला आहे.सुळे पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
चावालांचा पोलिसांवर आरोप.
योगेश भिंगारदिवे व गणेश धोत्रे यांच्या कॉल डीटेल्स व सीडीआर तपासल्यास यांच्यामुळे माझ्यावर हल्ला झालेला असून इतर आरोपींना हे पाठींबा देत आहेत.व अटक न करण्यास त्यांना संरक्षण देत आहेत.हे पोलीस हवलदार कोतवाली पोलीस स्टेशनचे असून डी.बी मध्ये असून कलेक्शनचे काम बघतात.व त्यांनी आरोपींना संरक्षण दिले आहे.पैशांचे हित संबंध असून कोणतीही कारवाई केली नाही.व हे आरोपी दिवसभर त्यांच्या घरात लपलेले असतात व रात्र झाली कि हे सर्व आरोपी हॉटेल वैष्णवराजच्या मागे पत्त्याचा क्लब चालवतात असे आरोप चावला यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात केला आहे.
शहरातील काही पोलीस कर्मचारी आरोपींना आश्रय देत असल्याचा आरोप करत काही कर्मचारी हे केडगावातील हॉटेल वैष्णवराजला पार्टनर आहे.पोलिसच अवैध धंदे करत असल्याचा गंभीर आरोप चावला यांना केला आहे.काही पोलीस कर्मचाऱ्यांची तक्रार चावला यांनी राज्य पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे देखील केली आहे.न्याय न मिळाल्याने आत्मदहन करणार असल्याचे चावला यांनी मत व्यक्त केले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
वकील हर्षद चावला यांच्यावर हल्ला झाला मात्र आरोपी हे सर्रासपपणे आपला अवैध कारभार चालवत असून मोकाट फिरत असल्याचे समजते.केडगाव येथील वैष्णवराज या हॉटेलमध्ये अवैध धंद्यांचे काम सुरु असते त्या अवैध धंद्यांमुळे तरूणाई बिगडत असल्याचे कारण देत चावालांनी अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना दिली होती.काही पोलिसांनी गुप्त माहिती हल्लेखोरांना पुरविली आणि हल्लेखोरांनी माझ्यावर हल्ला केला असा आरोप चावला यांनी हल्यानंतर केला होता.आरोपी अटक होत नाहीत व मला न्याय मिळत नाही या कारणास्तव वकील चावलांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांचे दार न ठोठवता थेट राज्याचे मुख्यमंत्री व राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या दारी न्याय मागण्यासाठी पोहचले असल्याचे समजते. चावला यांनी एक व्हिडीओ व्हायरल करत काही पोलिसांवर देखील गंभीर आरोप केले आहेत
आरोपींच्या काळ्या कारनामांना कोणाचा दिवा.
शहरातील चावला नामक वकीलावर भ्याड हल्ला झाला.त्या हल्ल्यात वकील चावला गंभीर जखमी झाले होते.चावला यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हेल्लेखोरांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.मात्र एका वकिलावर झालेल्या हल्ल्याला पोलिसांनी गंभीरपणे घेतले नसल्याचे समजते.वकिलावर हल्ला करणारे अवैध धंद्यांचे राजे आजही शहरत बिनधास्तपणे मजा करत फिरत असल्याचे समजते.वकिलावर झालेल्या हल्ल्याला जर पोलीस गांभीर्याने घेत नसतील तर सर्वसामान्यांची काय परिस्थिती होईल अशी भीती सध्या नगरकरांच्या मनात घुसली आहे.आरोपी माउली सातपुते,प्रशांत पवार,कुमार कचरे यांनी माझ्यावर हल्ला करून देखील पोलिसांनी त्यांना अटक केली नाही असे चावालांनी म्हटले आहे.