अर्चना अमोल गायकवाड या विवाहित महिलेने ज्या दिवशी आत्महत्या केली असे बोलले जाते त्या दिवशी तीचे पती अमोल गायकवाड देखील त्याच घरात उपस्थित होते.मात्र नागरिकांची व नातेवाईकांची वाढलेली गर्दी पाहता अमोल गायकवाडने घटनास्थळावरून पळ काढला होता. जर अमोल गायकवाड यांनी चूक केली नाही तर त्यांनी तेथे उपस्थित राहणे अपेक्षित होत. मात्र त्यांनी पळ काढताच संशयाची चक्री अमोल यांच्या भोवती फिरू लागली होती. पोलिसांनी अमोलला ताब्यात देखील घेतले मात्र काही वेळातच पोलिसांनी अमोलला सोडून दिल्याने मयतेच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली होती. परंतु पोलीस अधीक्षकांकडून देखील न्याय न मिळाल्याने न्यायासाठी वणवण फिरावे लागत असल्याची खंत मयत अर्चना गायकवाडचे नातेवाईक व्यक्त करत आहेत.