मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आजपर्यंत अनेक भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल आहे. अभिनेत्रीपासून ते निर्मातीपर्यंतचा तेजस्वीचा प्रवास साधा-सोपा नव्हता. तेजस्विनी स्वतःच्या हिंमतीवर अभिनयक्षेत्रात नाव कमावलं आहे. तेजस्विनीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.तेजस्विनीने ‘अथांग’ या वेब सीरिजमध्ये काम केलं होतं. या वेब सीरिजनिमित्त तेजस्विनीने सौमित्र पोटेच्या पॉडकास्टला मुलाखत दिलेली आहे . या मुलाखतीदरम्यान तेजस्विनीने तिच्या संघर्षाचा काळ सांगितला आहे. एका नगरसेवकाने तेजस्विनीसोबत वाईट वागणूक केलेली, याबद्दल तिने भाष्य केलं आहे. तेजस्विनी म्हणाली की, मी सिंहगड रोडला राहायचे. तेव्हा सिंहगड रोड येथील नगरसेवकाच्या एका घरी मी भाड्याने राहत होते. घराचं भाडं देण्यासाठी त्या नगरसेवकाच्या ऑफिसला मी गेले होते. तेव्हा मला असं कळालं की, या लोकांचा आपल्या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोनच वेगळा असतो. कारण एक आंबा नासका निघाला की बाकी सगळे नासके आहेत असं म्हटलं जातं किंवा दुसरे आंबे नासके आहेत का ? हे बघितलं जातं.
(संग्रहित दृश्य )
मी घरभाडं द्यायला गेले आणि त्या व्यक्तीने मला थेट ऑफर केली. २००९ व २०१० च्या दरम्यान ही घटना घडली. त्याने जेव्हा मला ऑफर केली त्याक्षणी माझ्या समोर फक्त एक पाण्याचा ग्लास होता. मी त्याच ग्लासातलं पाणी त्या व्यक्तीच्या तोंडावर फेकलं. मी अशा गोष्टी करायला येथे आली नाही. अन्यथा मी भाड्याने राहिले नसते. कलाक्षेत्रामध्ये मला अशाच पद्धतीने पैसे कमवायचे असते तर मी गाड्या, घर असं काय काय खरेदी केलं असतं. तुमची परिस्थिती तसेच तुम्ही कलाक्षेत्रात काम करत आहात हे पाहून तुम्हाला अशाप्रकारच्या गोष्टी विचारल्या जातात. असं तेजस्विनी म्हणाली.