प्रियकरासोबत मिळून पत्नीने रचला पतीच्या खुनाचा कट, झोपेतच केली पतीची हत्त्या आणि मृतदेह…..
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | YAVATMAL | AMRAVATI | CRIME NEWS | THE WIFE KILLED HER HUSBAND WITH THE HELP OF HER BOYFRIEND | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
यवतमाळ – पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केला व मृतदेह ब्लँकेटमध्ये बांधून अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे रेल्वे रुळावर टाकला आहे. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. गजानन राठोड (वय ४२, रा.पहुर (दाभा) ता.बाभूळगाव, जि. यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी दत्तापूर (ता. धामणगाव रेल्वे) पोलिसांनी पत्नी व तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे. धामणगाव रेल्वे येथील मध्य रेल्वेच्या रेल्वे रुळावर ब्लँकेटमध्ये बांधून असलेला संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीबरोबर अनैतिक संबध…..
पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवून घटना उघडकीस आणली आहे. पहूर (दाभा) येथील गजानन राठोड याचा विवाह तिवसा तालुक्यातील वीरगव्हाण येथील गंगाशी झाला होता. लग्नानंतर काही काळत कौटुंबिक कारणाने गंगा तीन वर्षे माहेरी होती. दरम्यानच्या काळात वीरगव्हाण येथील सचिन श्रावण राठोड (वय ३०) याचे गंगाशी सूत जुळले होते. कौटुंबिक कलह मिटल्याने गंगा पुन्हा सासरी आली होती. दरम्यान सचिन व गंगा यांच्या प्रेमसंबंधाची कुणकुण गजानन राठोड याला लागली होती. त्यामुळे सचिन राठोड व मृताची पत्नी गंगा यांनी संगनमत करून गजानन राठोड याला संपविण्याचा कट रचला होता.
स्त्रोत सोशल मिडिया
मृतदेह रेल्वे रुळावर…..
२० जून रोजी मध्यरात्री सचिन पहूर येथे गेला होता. गजाननच्या पत्नीने त्याला गुपचूप घरात घेतले होते. घरात शिरताच सचिनने झोपून असलेल्या गजाननचा गळा आवळला. सचिन व गंगा या दोघांनीही गजाननचा जीव गेल्याची खात्री केली. त्यांनतर शुक्रवारी पहाटे गजाननचा मृतदेह ब्लँकेटमध्ये बांधून दाभा पहूर येथून दुचाकीने धामणगाव रेल्वे येथे आणला होता. शहराबाहेरील बायपास रस्त्यावरील रेल्वे पुलावरून मृतदेह रेल्वे रुळावर फेकला. सकाळी या मार्गावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यास ब्लँकेटचे हे गाठोडे दिसले. त्याने रेल्वे पोलिसांना ही माहिती दिली आहे. पोलिसांनी हे गाठोडे उघडून बघितले असता त्यात मृतदेह आढळला आहे. त्यानंतर या खूनाची वाच्यता झाली आहे. मृताच्या खिशातील कृषी केंद्राच्या चिठ्ठीवरून मृतदेहाची ओळख पटली आहे. या तपासात खून झाल्याचे निष्पन झाले आहे. दत्तापूर व रेल्वे पोलीस आणि बाभूळगावचे पोलीस निरीक्षक एल.डी. तावरे यांच्या संयुक्त कार्यवाहीमधून आरोपींना अटक केली आहे. या घटनेने दाभा गावात खळबळ उडाली आहे.