By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर विद्या गाडेकर यांचा संताप ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गडातच महिला सुरक्षित नसल्याचा गंभीर आरोप.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर विद्या गाडेकर यांचा संताप ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गडातच महिला सुरक्षित नसल्याचा गंभीर आरोप.
अहमदनगर

महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर विद्या गाडेकर यांचा संताप ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गडातच महिला सुरक्षित नसल्याचा गंभीर आरोप.

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | SHEVGAON CONSTITUENCY | VIDYA GADEKAR NEWS | PHOTOS USED IN THIS NEWS ARE ARCHIVAL FOOTAGE. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/08/29 at 10:40 AM
By BHAIYYASAHEB BOXER 4 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

अहमदनगर  : महाराष्ट्रात शाळकरी विद्यार्थिनीपासून ते महिलांना सुरक्षिततेची हमी देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिला व युवतींनी जोरदार निदर्शने करुन राज्य सरकारचा निषेध नोंदविला. भीक नको, संरक्षण द्या ! च्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला.

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या प्रदेश सचिव (संघटक) विद्या गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाची सुरुवात अहमदनगर महानगर  पालिका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन करण्यात आली. महिलांना संरक्षणाची मागणी करणारे व सरकारचा निषेध नोंदविणारे फलक हातात घेऊन महिला वर्ग मोर्चात सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरुन पायी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात जोरदार घोषणाबाजी करुन महिलांनी संरक्षणासाठी आक्रोश केला. या मोर्चात ओबीसी सेलच्या प्रदेश सचिव विद्या गाडेकर, प्रदेश सचिव विनोद साळवे, प्रियंका साळवे, फरीन शेख, शिवाजीराव मडके, विलासराव राहिंज, रुकय्या शेख, विमल गांगर्डे, अलका ससाणे, हिराबाई खरात, शामराव वाघस्कर, सतीश गंधाक्ते, श्रीधर शेलार, सागर गायकवाड, सुभाष ठाकरे आदींसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गडातच महिला सुरक्षित नसल्याची भावना

देशामध्ये विविध शहरात वारंवार महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. दुर्दैवाने या घटना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घडण्यास सुरुवात झाली आहे. बदलापूर येथील शाळेत एका चिमुकलीवर झालेला अत्याचार हा मनाला होरपळून लावणार आहे. याच महिन्यात पुणे, अकोला, मुंबई, लातूर, नाशिक, नागपूर, कोल्हापूर या ठिकाणी देखील महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. बदलापूर येथे जी घटना घडलेली आहे, त्या घटनेचा जिल्हा ठाणे आहे. ठाणे हा जिल्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड असल्याचे मानले जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गडातच महिला सुरक्षित नसल्याची भावना महाराष्ट्राच्या माता-भगीनींच्या मनात निर्माण झाली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील महिला सुरक्षित असल्याची हमी द्या.

सध्या महाराष्ट्रात घडणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमुळे विद्यार्थिनी महाविद्यालयांमध्ये जाण्यास घाबरत आहे. इतर महिला देखील बसने प्रवास करण्यास हिम्मत करत नसल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्ह्यासह राज्यातील महिलांना असुरक्षित असल्याचे जाणवत आहे. त्यांच्या मनातील भिती काढण्यासाठी जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय या ठिकाणी विद्यार्थिनींना एक तासाचे समुपदेशन करण्याच्या सूचना सर्व शाळा व महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना लेखी पत्राद्वारे द्याव्या. महिला सुरक्षित असल्याची हमी देण्यासाठी जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी संयुक्तरीत्या पत्रकार परिषद घेऊन महिलांना प्रशासन महिलांच्या सोबत सुरक्षिततेसाठी तैनात असून जिल्ह्यातील महिला सुरक्षित असल्याची हमी देण्याचे निवेदनात म्हंटले आहे.

महायुतीचा निर्णय होणार दिल्लीत; आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता  - Marathi News | Mahayuti will be decided seat shearing in Delhi; It is  likely to be sealed in today's meeting ...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना बांगड्या व साड्यांचा आहेर पाठवणार !

शाळा व महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्याचे लेखी सूचना त्वरित द्याव्या, शाळा व महाविद्यालयात भरोसा सेलची गाडी ही रोज न चुकता विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी तैनात करावी, या गाडीच्या तपासणीसाठी एक शिष्टमंडळ नेमावे, शाळा, महाविद्यालय व बस स्थानक येथे महिलांच्या सुरक्षिततेसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी करावा, बलात्कार व अत्याचाराच्या घटनेत पीडित असणाऱ्या महिलांना आर्थिक पुनर्वसनासाठी योजना राबवावी, जिल्ह्यातील अत्याचारग्रस्त महिलांच्या न्यायालयीन कामकाजासाठी वकिलांची एक समिती गठित करुन महिलांचे खटले मोफत चालवण्यास मदत करण्याचे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना देण्यात आले. याप्रकरणी आठ दिवसांमध्ये सकारात्मक निर्णय न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना बांगड्या व साड्यांचा आहेर पाठवून मंत्रालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महिलांना पैश्‍याची लालच देण्यापेक्षा संरक्षणाची हमी द्यावी.

राज्यात लहान मुलींपासून ते जेष्ठ महिला सुरक्षित नाही. त्यांच्यावर वारंवार अत्याचाराच्या घटना घडत आहे. राज्य सरकारने महिलांना पैश्‍याची लालच देण्यापेक्षा संरक्षणाची हमी द्यावी. बलात्कार प्रकरणाचे खटले तात्काळ फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशी द्यावी. बलात्कारींना फाशी मिळाल्यावर समाजात कायद्याचा धाक निर्माण होणार आहे. स्त्री, पुरुष समानता राहिली नसून, महिलांकडे वासनेच्या नजरेने पाहिले जाते, ही महाराष्ट्राला कलंकित करणारी गोष्ट आहे. शासन-प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अन्यथा महिलांना कायदा हातात घ्यावा लागणार. 

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article बदलापूर घटनेवरील आरोपाला उत्तर ; अशा प्रकारच्या घटना घडत असतात, मग आता काय मुख्यमंत्री राज्यातील शाळांमध्ये जाऊन पहारा देतील का ?
Next Article शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर नौदल व राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर ; शिवरायांचा पुतळा त्यांच्या लौकिकाला साजेसा हवा. यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?