By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: जरांगे फॅक्टर १०० टक्के चालणार,मतदारांनी आपले मत हे कुणाला द्यायचे, हे अगोदरच ठरवून ठेवले. ओबीसी नेते हेमंत पाटील यांचा दावा.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > राजकारण > जरांगे फॅक्टर १०० टक्के चालणार,मतदारांनी आपले मत हे कुणाला द्यायचे, हे अगोदरच ठरवून ठेवले. ओबीसी नेते हेमंत पाटील यांचा दावा.
राजकारण

जरांगे फॅक्टर १०० टक्के चालणार,मतदारांनी आपले मत हे कुणाला द्यायचे, हे अगोदरच ठरवून ठेवले. ओबीसी नेते हेमंत पाटील यांचा दावा.

Last updated: 2024/10/23 at 2:58 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR 

महाराष्ट्र राज्यातील ज्या मतदार संघांमध्ये मराठा उमेदवार निवडून येतील तिथे उमेदवार देण्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मराठा आंदोलकांच्या या भूमिकेमुळे नवीन सरकार निर्मितीत जरांगे किंगमेकर ठरतील. अशी भावना इंडिया अगेन्स्ट करप्शनचे आयएसी राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी बुधवारी (२३ऑक्टोबर) व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या मतदार संघात मराठा आंदोलनाचे समर्थन करीत आरक्षणाच्या विचाराशी सहमत असलेल्या उमेदवारालाच निवडणूक रिंगणात उतरवून मताधिक्याने निवडून आणण्याचे आदेश दिले आहेत.

Manoj Jarange Patil on Maharashtra tour, Maharashtra tour from today; Where are the programs? | मनोज जरांगे पाटील पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर​​​​​​​: मुंबई, पुणे, नाशिकमध्ये घेणार ...(संग्रहित दृश्य.)

यंदा ची निवडणूक सर्वच अर्थाने वेगळी ठरणार आहे.

जरांगेंच्या या भूमिकेमुळे एससी आणि एसटी बांधवांसह ओबीसींमध्ये देखील जरांगे फॅक्टर  प्रभावी ठरला असल्याचे पाटील म्हणाले. निवडणुकीत जरांगे फॅक्टर १०० टक्के चालणार, असा दावा पाटील यांनी केला आहे. भाजपला याचा मोठा फटका बसणार असून विदर्भातील ओबीसी मोठ्या प्रमाणात सत्ताधाऱ्यांविरोधात मतदान करतील. मराठा आणि ओबीसी बांधवांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र आता निवडणुकीत मतदार समाजभेद्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार, असा दावा देखील पाटील यांनी केला आहे. यंदाची निवडणूक सर्वच अर्थाने वेगळी ठरणार आहे. मतदारांनी आपले मत हे कुणाला द्यायचे, हे अगोदरच ठरवून ठेवल्याने जरांगे यांच्या बाजूने बरेच मतं स्विंग होतील, असा दावा पाटील यांनी केला. जिल्हा आणि विभागनिहाय उमेदवारांची चाचपणी जरांगे करीत आहेत. येत्या दोन दिवसात योग्य उमेदवारांची घोषणा करीत ते त्यांच्या पुढच्या फळीसही निवडणुकीचा बिगुल फुंकतील असे पाटील म्हणाले.

You Might Also Like

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

तर राजकारणात त्याचे कसे तुकडे करायचे ठरवू , उद्धव ठाकरेंचा मातोश्री वर यल्गार ?

अजित पवार दोषी असेल तर फासावर लटकवा, वैष्णवी हागवणे मृत्यूप्रकरणी अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया ; म्हणाले असले नालायक लोक मला……

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात? प्रभाग रचना प्रक्रियेला सुरुवात

आगामी महापालिका महायुती म्हणून एकत्र लढणार, पण… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितल…

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घराणेशाहीवर भर ? शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार ठरले.
Next Article आर्थिक फसवणूक झाल्याने व्यापाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या ; सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?