By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: नवाब मालिकांचे देशद्रोह्यांशी संबंध मलिक महायुतीत नको गृहमंत्री फडणवीसांचं उपमुख्यमंत्री पवारांना जाहीर पत्र.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > राजकारण > नवाब मालिकांचे देशद्रोह्यांशी संबंध मलिक महायुतीत नको गृहमंत्री फडणवीसांचं उपमुख्यमंत्री पवारांना जाहीर पत्र.
राजकारण

नवाब मालिकांचे देशद्रोह्यांशी संबंध मलिक महायुतीत नको गृहमंत्री फडणवीसांचं उपमुख्यमंत्री पवारांना जाहीर पत्र.

Last updated: 2023/12/07 at 8:38 PM
By BHAIYYASAHEB BOXER 4 Min Read
Share
SHARE

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नवाब मालिकांवर देशद्रोह्यांशी संबंध असल्याचे आरोप लावत नवाब मलिक सत्त्तेत समाविष्ट न करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र.

 

त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांनी मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री ( उद्धव ठाकरे ) आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही.

नवाब मलिक यांनी हिवाळी अधिवेशनात हजेरी लावत अजित पवार गटाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र नवाब मलिक महायुतीत आल्याने देवेंद्र फडणवीस नाराज आहेत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना तसं पत्र लिहिलं आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडल्यानंतर जेलमधून बाहेर आलेले माजी मंत्री नवाब मलिक नेमक्या कोणत्या गटाला पाठिंबा देणार याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात होते. दरम्यान नवाब मलिक यांनी हिवाळी अधिवेशनात हजेरी लावत अजित पवार गटाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र यानिमित्ताने नवाब मलिक महायुतीत सहभागी झाल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना तसं पत्रच लिहिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर हे पत्र शेअर केलं असून, सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा असल्याचं म्हटलं आहे.माजी मंत्री नवाब मलिकांवर ज्या पद्धतीचे आरोप आहेत  ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही असं आमचं मत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी पात्रात म्हणाल आहे. सद्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा ………..

“सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा…”  असे कॅप्शन देऊन देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटर आणि फेसबुकवर हे पत्र पोस्ट केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रात फडणवीस यांनी म्हटले  माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे आज विधीमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रूता अथवा आकस अजिबात नाही हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतू ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही असे आमचे मत आहे.
मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा सहभाग करणे हे योग्य नाही असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे हा सर्वस्वी आपला अधिकार आहे हे मान्यच आहे. परंतु त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे अशी रोखठोक भूमिका गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

 

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे काय म्हणाले? 


अंबादास यांनी विधानपरिषदेत बोलताना म्हटले खालच्या सभागृहात एक सदस्य बसले आहेत ज्याविषयी मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) आणि उपमुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) सातत्याने अशी भूमिका घेत होते की आम्ही देशद्रोह्याच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही. त्यांच्याविरोधात काय गुन्हे होते हे माहित आहे.अंबादास दानवेंनी हा प्रश्न उपस्थित करताच सभागृहात गोंधळ सुरू झाला. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही हा प्रश्न उद्या उपस्थित करण्याची विनंती केली. परंतु, अंबादास दानवे आपल्या प्रश्नावर ठाम राहिले. यावर अंबादास दानवे म्हणाले, “एक सभासद सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसले आहेत. त्यांच्याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी वारंवार जाहीर वक्तव्य केलं की एका देशद्रोह्याच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही. उघड उघड दाऊद इब्राहिमची वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिक व्यवहार जाहीर केले. त्यामुळे याबाबत सरकारची भूमिका काय हे कळलं पाहिजे.

You Might Also Like

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

तर राजकारणात त्याचे कसे तुकडे करायचे ठरवू , उद्धव ठाकरेंचा मातोश्री वर यल्गार ?

अजित पवार दोषी असेल तर फासावर लटकवा, वैष्णवी हागवणे मृत्यूप्रकरणी अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया ; म्हणाले असले नालायक लोक मला……

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात? प्रभाग रचना प्रक्रियेला सुरुवात

आगामी महापालिका महायुती म्हणून एकत्र लढणार, पण… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितल…

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article पद्मावती चित्रपटाला विरोध करून निर्माते संजय लीला भन्साळी यांना मारहाण करणारे नेते गोगामोडी यांचा खून का झाला ? कोण होते करणी सेनेचे अध्यक्ष गोगामोडी.
Next Article मंत्री नवाब मालिकांच्या बसण्यावरून राजकारण तापले.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?