By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: मंत्री नवाब मालिकांच्या बसण्यावरून राजकारण तापले.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > राजकारण > मंत्री नवाब मालिकांच्या बसण्यावरून राजकारण तापले.
राजकारण

मंत्री नवाब मालिकांच्या बसण्यावरून राजकारण तापले.

Last updated: 2023/12/13 at 11:23 AM
By BHAIYYASAHEB BOXER 6 Min Read
Share
SHARE

बराच काळ तुरुंगात राहिलेल्या नवाब मलिक यांच्या उपस्थितीमुळे वाद निर्माण झाला होता त्यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच मुद्द्यावर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी फडणवीसांना धारेवर धरले आहे.

बराच काळ तुरुंगात राहिलेल्या नवाब मलिक यांच्या उपस्थितीमुळे वाद निर्माण झाला होता त्यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 

उपमुख्यमंत्र्यांकडे दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचा फोन नंबर नाहीये का ? असा  सवाल जयंत पाटलांनी उपस्थित केला आहे.अशा मोठ्या अडचणी फडणवीसांनी फोनवर सांगायला पाहिजेत .त्यासाठी पत्र लिहावं लागणं हे आश्चर्य आहे. जी माहिती माझ्यामते फडणवीस फोन लावून अजित पवारांना देऊ शकले असते त्या माहितीसाठी पात्राच्या स्टंटबाजीची गरज नव्हती. पण त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करायला प्राधान्य दिलं आहे असं जयंत पाटील म्हणाले.

फडणवीसांच्या पत्रात नेमकं काय ?

देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांच्या उपस्थितीवरून अजित पवारांना पत्र लिहिलं आणि ते पत्र लगेच सोशल मीडियावरही पोस्ट केलं. नवाब मलिक यांना अजित पवार गटामध्ये समाविष्ट करून घेण्यावर देवेंद्र फडणवीसांनी आक्षेप नोंदवला आहे. तसेच, “सत्ता येते आणि जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा”, असा सूचक संदेशही त्यात दिला. शेवटी “आमच्या भावनांची आपण नोंद घ्याल”, असंही फडणवीसांनी पत्रात म्हटलं आहे. या पत्रावरून सध्या वाद निर्माण झाला असून फडणवीसांनी पत्र जाहीर करायला नको होतं, वैयक्तिक भेट घेऊन सांगायला हवं होतं अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे. त्यावर जयंत पाटलांनीही प्रतिक्रिया दिली होती.

असा प्रयत्न या पत्रात दिसतोय

हे पत्र म्हणजे फडणवीसांचा बाजू स्वच्छ करण्याचा प्रयत्न असल्याचं जयंत पाटील म्हणाले आहेत. त्यासाठी पत्र लिहायला लागणं हे आश्चर्य आहे. जी माहिती माझ्यामते ते फोन उचलून अजित पवारांना देऊ शकले असते. पण त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करायला प्राधान्य दिलं आहे असं जयंत पाटील म्हणाले.
मिटकरींचा देखील संताप.

एकीकडे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला असताना अमोल मिटकरींनी मात्र तीव्र संताप व्यक्त केला आहे. हे पत्र सार्वजनिक करण्याची गरज नव्हती. देवेंद्र फडणवीस स्वत: अजित पवारांना भेटून ती गोष्ट सांगू शकत होते की आम्हाला नवाब मलिक चालणार नाहीत. शेवटी नवाब मलिक पक्षाचे मोठे नेते आहेत. ते संकटाच्या काळात पक्षाच्या सोबत राहिले आहेत. तो आमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. नवाब मलिक आमच्यासोबत असावेत की नसावेत यावर त्यांनी भाष्य करू नये अशा शब्दांत मिटकरींनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

नवाब मलिक अधिवेशनात सत्ताधारी बाकांवर बसल्यानंतर ते अजित पवार गटात आल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर देशद्रोहाचे आरोप असलेले नवाब मलिक तुमच्यासह कसे ? असा आरोप महायुतीवर होऊ लागला. या सगळ्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे. नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप आहेत. सत्तेपेक्षा देश मोठा आहे त्यामुळे त्यांना महायुतीत घेऊ नका असं म्हटलं आहे. ज्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही व्हिडीओ पोस्ट करत तेव्हा कुठे गेला होता तुमचा विवेकवाद असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

नवाब मलिक अजित पवार गटासह येण्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र अजित पवार यांना लिहिलं आहे. ज्यामध्ये नवाब मलिकांवर देशद्रोहाचे आरोप असल्याने त्यांना बरोबर घेऊ नये असं म्हटलं आहे. हा सगळाच गंमतीदार भाग आहे. गुरुवारी दिवसभरातल्या घडामोडी पाहिल्या तर देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल झाल्यानंतर पत्र लिहिण्याची उपरती झाली आहे. पत्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेपेक्षा देश मोठा असंही म्हटलं आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांना साधा प्रश्न आहे की सत्ते पेक्षा देश मोठा असं  आपल्याला वाटत असेल तर मग आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांवर भाजपाने आरोप केले त्यांना सत्तेत सामावून घेताना हा विवेकवाद कुठे गेला होता? देवेंद्र फडणवीस यांना आणखी एक विचारायचं आहे ते म्हणजे आपण ज्या अजित पवारांना पत्र लिहिलं आहे त्याच अजित पवारांवर सन्मानीय नरेंद्र मोदींनी ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता. इतका गंभीर आरोप झाल्यानंतर ४८ तासांच्या आत त्यांना (अजित पवार) सत्तेत सामावून घेणं हे तुमच्या नैतिकतेत बसलं का? त्यावेळी सत्तेपेक्षा देश मोठा हे तत्त्वज्ञान तुम्हाला का सुचलं नाही? अजित पवारांना सत्तेत सामावून घेणं चुकीचं आहे हे सांगणारं पत्र आपण भाजपाच्या कोणत्या नेत्याला लिहाल? ” हे प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले आहेत.

नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर आणि..

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्यावरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने डिवचल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून मलिकांना महायुतीत घेणे योग्य ठरणार नाही, असे सांगितले. त्यामुळे अजित पवार यांची कोंडी झाली असून महायुतीमध्ये सारे आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

नवाब मलिक यांच्यावर काय आरोप ?

दाऊद इब्राहिमच्या बहिणीची मदत घेऊन जमीन बळकविल्याप्रकरणी ईडीने मलिक यांना अटक केली होती. भाजपने मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप केले आहेत. अजित पवार महायुतीत येताच काही दिवसांनी मलिक यांना जामीन मिळाला. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गुरूवारी मलिक हे विधान भवनात दाखल होताच अजित पवार गटाच्या कार्यालयात गेले. तेव्हाच ते अजितदादांबरोबर असल्याचे स्पष्ट झाले. सभागृहातही ते सत्ताधारी बाकांवर बसले.नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्याच्या कृतीनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी फडणवीस यांना डिवचले. याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलेलो नाहीत. देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर ते जेलमध्ये असताना तुम्ही त्यांना मंत्रीपदावरून का काढले नाही याचे उत्तर आधी द्या मग आम्हाला प्रश्न विचारा. त्याच वेळी त्यांनी अजित पवार यांना पत्रही पाठवले व मलिक यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही असे स्पष्ट केले. हे पत्र लगोलग प्रसार माध्यमांकडे पाठविण्यात आल्याने पवार गटातून नाराजी प्रकट झाली. फडणवीस अजितदादांना हे खासगीत सांगू शकले असते. पत्र माध्यमांकडे पाठविण्याची आवश्यकता नव्हती असा सूर पवार गटातून उमटला आहे.

You Might Also Like

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

तर राजकारणात त्याचे कसे तुकडे करायचे ठरवू , उद्धव ठाकरेंचा मातोश्री वर यल्गार ?

अजित पवार दोषी असेल तर फासावर लटकवा, वैष्णवी हागवणे मृत्यूप्रकरणी अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया ; म्हणाले असले नालायक लोक मला……

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात? प्रभाग रचना प्रक्रियेला सुरुवात

आगामी महापालिका महायुती म्हणून एकत्र लढणार, पण… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितल…

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article नवाब मालिकांचे देशद्रोह्यांशी संबंध मलिक महायुतीत नको गृहमंत्री फडणवीसांचं उपमुख्यमंत्री पवारांना जाहीर पत्र.
Next Article महिला पंतप्रधानांना थेट स्वीटी म्हणणे,लष्कर प्रमुखांना महिलांचा आदर नव्हता का ?
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?