TIMES OF AHMEDNAGAR
फायनान्स कंपनीच्या कर्जाने कमी आणि त्यांच्या मानसिक त्रासाने कर्जदार जास्त त्रस्त होतात. फायनान्स कंपनीच्या त्रासाला कंटाळून काही नागरिक आपले जीवन संपवतात. आर्वी तालुक्यातील खरांगना येथील हरिदास काशिनाथ इवनाथे या युवकाने एका फायनान्स कंपनीकडून गटाच्या माध्यमातून कर्ज घेतले होते. ते परत करण्यास तो असमर्थ ठरत होता. कर्जाने त्रस्त झाल्याने तो सतत चिंतेत असायचा.त्यातच व्याजासह कर्ज परत घेण्यासाठी कंपनीच्या वसुली अधिकाऱ्यांनी ससेमिरा लावला. शेवटी राहत्या घरी त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. त्याच्या मागे पत्नी, आई, मुलगा, मुलगी आहे.