कॉंग्रेस पक्षाच्या एका नेत्याला मुख्यमंत्री शिंदेंचा मान….. तर दुसऱ्या नेत्याला उपमुख्यमंत्री पावरांचा उलट प्रश्नांचा बाण ……!
विध्यार्थी पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत ? अजित पवारांचा थेट सभागृहात सवाल
राज्यात मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे यासाठी अनेक ठिकाणी आंदोलने झाले,अनेक ठिकाणी आंदोलनाचा पाया घसरत जाळपोळ झाली,तर ओबीसी समाजाच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये यासाठी मंत्री.छगन भुजबळ यांनी देखील राज्याचे दौरे सुरु केले आहेत.विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित केला जात आहे. अशातच सारथीसारख्या संस्थेच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा पुरवता येतील यावर चर्चा झाली. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत म्हणाले, सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी फेलोशिप दिली जाते. परंतु केवळ २०० विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती दिली जाईल, असा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. ही संख्या वाढवण्यात यावी. सतेज पाटील यांची मागणी ऐकताच उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पीएचडी करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत ? अजित पवारांच्या या धक्कादायक वक्तव्याचं सतेज पाटलांसह अनेकांना आश्चर्य वाटलं.
अजित पवारांनी सतेज पाटील यांना डिवचण्याची हि पहिली वेळ नाही.
अजित पवार विरोधीपक्षनेते असतांना गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या नवीन हॉटेलच्या उद्घाटनासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून काँग्रेसचे नेते सतेज पाटील उपस्थित होते.अजित पवार यांनी सतेज पाटील यांना टोपणनावावरून चिमटे काढले. अजित पवार म्हणाले मीकितीतरी वेळा सांगतोय सतेज पाटील यांना आता बंटी बंटी म्हणणे बंद करा. बंटीला आता बंटी झालेत. ते काय आता लहान राहिले नाहीत, असं म्हणत सतेज पाटील यांना चिमटा काढला. यावेळी सतेज पाटील यांच्यासह सर्वच मंडळी हसू लागले.
काँग्रेस पक्षाच्या त्या नेत्याच्या प्रश्नाला मुख्यमंत्री शिंदेंची “मंजुरी”.
सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. सर्वच आमदार आपआपल्या परीने प्रश्न उपस्थित करत असतात राज्याचे माजी.महसूलमंत्री व कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरातांनी प्रश्न उपस्थित करत कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींना भेटायला निघालेल्या शिर्डी येथील वारकऱ्यांच्या दिंडीत ३ डिसेंबर रोजी नाशिक येथे महामार्गावर भरघाव कंटेनर घुसल्याने अपघात झाला होता. त्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या वारकऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी यासाठी मी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाशी संपर्क केला होता मात्र अध्यापही वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत शासनाने केली नाही असे थोरात सभागृहात बोलतांना म्हणाले होते. त्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागणी तत्काळ मान्य करून वारकऱ्यांना शासनाच्या वतीने प्रत्येकी पाच लाख रुपये आणि जखमी वारकऱ्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासन करेल असे आश्वासन दिले.
काँग्रेस पक्षाच्या त्या नेत्याच्या प्रश्नाला उपमुख्यमंत्री पवारांची “नामंजुरी”.
काँग्रेस पक्षाचे माजी.मंत्री आमदार सतेज पाटील हे सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासावेळी सारथी सस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या फेलोशिपच्या मुद्द्यावर बोलत होते. सतेज पाटील म्हणाले, पीएचडी करू इच्छिणारे विद्यार्थी आशेवर होते की त्यांना सारथीकडून फेलोशिप मिळणार आहे. त्यावर अजित पवार म्हणाले,फे लोशिप घेऊन ते काय करणार आहेत ? त्यावर सतेज पाटील म्हणाले, हे विद्यार्थी पीएचडी घेतील. पाटील यांचं उत्तर ऐकल्यावर अजित पवार म्हणाले, पीएचडी करून काय दिवा लावणार आहेत ? अजित पवारांच्या या प्रश्नाचा सतेज पाटलांना आधी धक्का बसला. सतेज पाटील यांच्या शेजारी बसलेल्या आमदार भाई जगतापांनी तर डोक्याला हात लावला. त्यानंतर ते म्हणाले, दादा असं काय म्हणताय तुम्ही या योजनेमुळे राज्यात पीएचडीधारकांची संख्या वाढेल. बार्टी, सारथी किंवा महाज्योतीसारख्या संस्थांमुळे पीएचडीधारकांची संख्या वाढेल आणि याचा राज्याला फायदाच होईल. त्याने काही नुकसान होणार नाही.
सतेज पाटील म्हणाले, केवळ २०० विद्यार्थ्यांना फेलोशिप देणार अशी अट तुम्ही (राज्य सरकारने) नंतर लावली. विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याआधी तुम्ही हे सांगायला हवं होतं. सर्व विद्यार्थ्यांनी तयारी केली, तुम्ही कट ऑफ डेट जाहीर केली आणि आता राज्य सरकार केवळ २०० फेलोशिपची अट ठेवत आहे. त्यामुळे यामध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे. तसेच आमची मागणी आहे की, तुम्ही ही अट पुढच्या वर्षीपासून लागू करा.
नेमकं अजित पवार काय म्हणाले ?
सतेज पाटलांच्या मागणीवर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, आम्ही यावर फेरविचार करू. त्यांची मागणी मान्य होईल असं सांगता येत नाही. गरजेचं असेल तर सहानुभूतीपूर्वक विचार करू. मला असं वाटतं की, या विद्यार्थ्यांनी फेलोशिपऐवजी एमपीएससीसह, आयएएस, आपीएस, आयआरएस, आयएफएससह इतर स्पर्धा परिक्षांमध्ये प्रयत्न केले पाहिजेत. यंदा एमपीएसी, यूपीएससीत आपल्या पोरांनी मोठं यश मिळवलं. या परिक्षांवर विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रीत करावं. छत्रपती संभाजीनगर, लातूर, नागपूर,अमरावती,कोल्हापूर, खारघर (नवी मुंबई) आणि नाशिकमध्ये आपण सारथीचं केंद्र उभं करणार आहोत.
अजित पवार यांनी विधान परिषदेत केलेल्या वक्तव्यामुळे समाजमाध्यमांवरून त्यांच्यावर टीका होत आहे. पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पीएच. डी. संदर्भात केलेल्या वक्तव्याचा राज्यभरातील संशोधक विद्यार्थ्यांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. बुधवारी पुण्यात बालगंधर्व जवळील झाशी राणी चौकात नॅशनल स्टुडन्ट युनियन ऑफ इंडियासह विविध विद्यार्थी संघटनांनी अजित पवार यांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या वक्तव्याचा घोषणा देत निषेध नोंदवला . तसेच सारथी, बार्टी ,महाज्योती आदी संस्थांमध्येतर्फे पीएचडी धारक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्यात यावी, अशी मागणी केली.सारथी संस्थेच्या माध्यमातून पीएचडी धारक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप दिली जात होती. मात्र, राज्य शासनाने केवळ २०० विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक विद्यार्थी फेलोशिप पासून वंचित असून या विद्यार्थ्यांना फेलोशिप द्यावा, अशी मागणी सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केली. त्यावर अजित पवार यांनी उत्तर देताना विद्यार्थी ‘पीएचडी करून काय दिवा लावणार आहे ?’ असा उलट सवाल केला. त्यामुळे राज्यभरातील संशोधक विद्यार्थी व विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. संशोधन केल्यामुळेच शास्त्रज्ञांनी दिव्याचा शोध लावला, असे खोचक वक्तव्य काही विद्यार्थी करत आहेत. तसेच अजित पवार यांनी आपले शब्द मागे घ्यावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.