गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नवाब मालिकांवर देशद्रोह्यांशी संबंध असल्याचे आरोप लावत नवाब मलिक सत्त्तेत समाविष्ट न करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र.
त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांनी मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री ( उद्धव ठाकरे ) आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही.
नवाब मलिक यांनी हिवाळी अधिवेशनात हजेरी लावत अजित पवार गटाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र नवाब मलिक महायुतीत आल्याने देवेंद्र फडणवीस नाराज आहेत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना तसं पत्र लिहिलं आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडल्यानंतर जेलमधून बाहेर आलेले माजी मंत्री नवाब मलिक नेमक्या कोणत्या गटाला पाठिंबा देणार याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात होते. दरम्यान नवाब मलिक यांनी हिवाळी अधिवेशनात हजेरी लावत अजित पवार गटाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र यानिमित्ताने नवाब मलिक महायुतीत सहभागी झाल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना तसं पत्रच लिहिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर हे पत्र शेअर केलं असून, सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा असल्याचं म्हटलं आहे.माजी मंत्री नवाब मलिकांवर ज्या पद्धतीचे आरोप आहेत ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही असं आमचं मत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी पात्रात म्हणाल आहे. सद्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा ………..
“सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा…” असे कॅप्शन देऊन देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटर आणि फेसबुकवर हे पत्र पोस्ट केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रात फडणवीस यांनी म्हटले माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे आज विधीमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रूता अथवा आकस अजिबात नाही हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतू ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही असे आमचे मत आहे.
मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा सहभाग करणे हे योग्य नाही असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे हा सर्वस्वी आपला अधिकार आहे हे मान्यच आहे. परंतु त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे अशी रोखठोक भूमिका गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पत्राद्वारे व्यक्त केली आहे.