अहिल्यानगरमधील चौंडी गावात ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे. नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक बैठक पार पडली. ही बैठक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आली होती. या निमित्ताने चौंडी येथे पुढील महिनाभर विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ज्यामुळे अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव आणि स्थानिक विकासाला चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते. खालीलप्रमाणे प्रमुख निर्णय घेण्यात आले. चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस्थळाच्या संवर्धनासाठी ६८१ कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पातून स्मृतीस्थळाला अखिल भारतीय स्तरावरील प्रेरणास्थळ आणि तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्याचा सरकारचा मानस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात श्री क्षेत्र चौंडी, अहिल्यानगर येथील ऐतिहासिक राज्य मंत्रिपरिषद बैठकीनंतर पत्रकार परिषद पार पडली.
(संग्रहित दृश्य.)
अहिल्यादेवींच्या राज्यातील प्रमुख मंदिरांच्या आणि विकासासाठी तब्बल ५,५०३ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मान्यता…
अष्टविनायक गणपती मंदिरांचा जीर्णोद्धार : १४७ कोटी रुपये,
श्री क्षेत्र तुळजा भवानी मंदिर विकास : १,८६५ कोटी रुपये
ज्योतिबा मंदिर विकास : २५९ कोटी रुपये
श्री त्र्यंबकेश्वर विकास : २७५ कोटी रुपये
श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास : १,४४५ कोटी रुपये
श्री क्षेत्र माहुरगड विकास : ८२९ कोटी रुपये.
बहुभाषिक चित्रपट निर्मितीप्रेरणादायी जीवन आणि कार्याचा परिचय जगभरात करून देण्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित बहुभाषिक व्यावसायिक चित्रपट निर्मितीचा निर्णय घेण्यात आला. हा चित्रपट त्यांच्या कार्याचा गौरव करेल आणि त्यांच्या योगदानाला व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवेल. अहिल्यानगरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामुळे स्थानिकांना उच्च दर्जाच्या वैद्यकीय शिक्षणाची आणि आरोग्य सुविधांची उपलब्धता होईल. महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियानमहिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक समस्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘आदिशक्ती अभियान’ राबविण्याचे ठरविण्यात आले. या अभियानांतर्गत या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला आणि संस्थांना ‘आदिशक्ती पुरस्कार’ प्रदान केले जाणार आहेत. याशिवाय, मुलींसाठी अहिल्यानगरमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यातआला. यशवंत विद्यार्थी योजनाधनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी यशवंत विद्यार्थी योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत १०,००० विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध होईल. याशिवाय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृहाची निर्मितीही केली जाणार आहे.