By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: अहिल्यानगरमध्ये चौंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय….
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > अहिल्यानगरमध्ये चौंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय….
अहमदनगर

अहिल्यानगरमध्ये चौंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय….

Last updated: 2025/05/07 at 3:09 PM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE

TIMES OF NAGAR 

अहिल्यानगरमधील चौंडी गावात ज्याची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे. नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक ऐतिहासिक बैठक पार पडली. ही बैठक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आली होती. या निमित्ताने चौंडी येथे पुढील महिनाभर विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ज्यामुळे अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव आणि स्थानिक विकासाला चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते. खालीलप्रमाणे प्रमुख निर्णय घेण्यात आले. चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस्थळाच्या संवर्धनासाठी ६८१ कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पातून स्मृतीस्थळाला अखिल भारतीय स्तरावरील प्रेरणास्थळ आणि तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्याचा सरकारचा मानस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात श्री क्षेत्र चौंडी, अहिल्यानगर येथील ऐतिहासिक राज्य मंत्रिपरिषद बैठकीनंतर पत्रकार परिषद पार पडली.

Mumbai News: अहिल्यानगर के चोंडी में मंत्रिमंडल की बैठक में फडणवीस के सभी 42 मंत्री होंगे शामिल | All 42 ministers of Fadnavis will attend the cabinet meeting at Chondi in Ahilyanagar(संग्रहित दृश्य.)

 अहिल्यादेवींच्या राज्यातील प्रमुख मंदिरांच्या आणि विकासासाठी तब्बल ५,५०३ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मान्यता…

 अष्टविनायक गणपती मंदिरांचा जीर्णोद्धार : १४७ कोटी रुपये,

 श्री क्षेत्र तुळजा भवानी मंदिर विकास :  १,८६५ कोटी रुपये

  ज्योतिबा मंदिर विकास : २५९ कोटी रुपये

 श्री त्र्यंबकेश्वर विकास : २७५ कोटी रुपये

 श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास : १,४४५ कोटी रुपये

 श्री क्षेत्र माहुरगड विकास : ८२९ कोटी रुपये.

बहुभाषिक चित्रपट निर्मितीप्रेरणादायी जीवन आणि कार्याचा परिचय जगभरात करून देण्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित बहुभाषिक व्यावसायिक चित्रपट निर्मितीचा निर्णय घेण्यात आला. हा चित्रपट त्यांच्या कार्याचा गौरव करेल आणि त्यांच्या योगदानाला व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवेल. अहिल्यानगरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामुळे स्थानिकांना उच्च दर्जाच्या वैद्यकीय शिक्षणाची आणि आरोग्य सुविधांची उपलब्धता होईल. महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियानमहिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक समस्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘आदिशक्ती अभियान’ राबविण्याचे ठरविण्यात आले. या अभियानांतर्गत या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला आणि संस्थांना ‘आदिशक्ती पुरस्कार’ प्रदान केले जाणार आहेत. याशिवाय, मुलींसाठी अहिल्यानगरमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था  आयटीआय  स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यातआला. यशवंत विद्यार्थी योजनाधनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी यशवंत विद्यार्थी योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत १०,००० विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध होईल. याशिवाय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृहाची निर्मितीही केली जाणार आहे.

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry1
Dead0
Wink1
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून तरुणीची घरात घुसून हत्या, आई वडील गंभीर जखमी; पाच जणांना अटक…
Next Article पाकिस्तान बिथरला; सीमेवरील अंदाधुंद गोळीबारात १५ जणांचा मृत्यू, एक जवान शहीद…  
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?